शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

...तर पाकिस्तानच्या विमानांचे मोठे नुकसान झाले असते; संरक्षण दलाचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 10:21 IST

26 फेब्रुवारीला बालाकोट एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याच्या इराद्याने 27 ला अमेरिकेने दिलेली एफ -16 विमाने घुसविली होती. या घडामोडींचे विश्लेषण संरक्षण विभागाने केले आहे.

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केलेली. भारताकडे यावेळी जर उच्च क्षमतेची विमाने असती तर पाकिस्तानचे मोठे नुकसान करता आले असते, असे संरक्षण विभागाने एका अहवालामध्ये म्हटले आहे. 

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, 26 फेब्रुवारीला बालाकोट एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याच्या इराद्याने 27 ला अमेरिकेने दिलेली एफ -16 विमाने घुसविली होती. या घडामोडींचे विश्लेषण संरक्षण विभागाने केले आहे. यामध्ये भारताने पुलवामा हल्ल्याविरोधात बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या ठिकाण्यांवर हवाई हल्ला केला होता. या पुलवामा हल्ल्यांमध्ये भारताचे 40 जवान शहीद झाले होते. तर भारताच्या हवाई हल्ल्यामध्ये बालाकोटमधील दहशतवादी तळांना उद्धवस्त करण्यात आले होते. 

भारतीय वायुसेनेने या घटनांचा अभ्यास केला आहे. पाकिस्तानी हवाई दल 1999 च्या कारगील युद्धानंतर सातत्याने सैन्याची ताकद वाढवत आहे. दहशतावादाचा बिमोड करण्याच्या नावावर अमेरिका, चीन यांच्याकडून नवनवीन तंत्रज्ञान घेत आहे. या तुलनेत भारताला हवाई युद्धासाठी आपली ताकद वाढविण्याची गरज आहे, असे या अहवालात म्हटले आहे. 

अमेरिकेने दिलेल्या एफ -16 विमानांमुळे पाकिस्तान भारतापेक्षा पुढे आहे. कारण त्या विमानांमध्ये एम्राम मिसाईल लावलेल्या आहेत. भारताकडे हवेतून हवेत मारा करता येऊ शकणारी बीवीआरएएएम मिसाईल आणि एस-400 सुरक्षा प्रणालीने युक्त असलेले राफेल विमान आल्यास भारताला पाकिस्तावर मात करणे सोपे जाणार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाairforceहवाईदलPakistanपाकिस्तानTerror Attackदहशतवादी हल्लाindian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक