शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
3
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
4
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
5
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
6
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
7
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
8
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
9
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
10
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
11
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

...तर पाकिस्तानच्या विमानांचे मोठे नुकसान झाले असते; संरक्षण दलाचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 10:21 IST

26 फेब्रुवारीला बालाकोट एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याच्या इराद्याने 27 ला अमेरिकेने दिलेली एफ -16 विमाने घुसविली होती. या घडामोडींचे विश्लेषण संरक्षण विभागाने केले आहे.

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केलेली. भारताकडे यावेळी जर उच्च क्षमतेची विमाने असती तर पाकिस्तानचे मोठे नुकसान करता आले असते, असे संरक्षण विभागाने एका अहवालामध्ये म्हटले आहे. 

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, 26 फेब्रुवारीला बालाकोट एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याच्या इराद्याने 27 ला अमेरिकेने दिलेली एफ -16 विमाने घुसविली होती. या घडामोडींचे विश्लेषण संरक्षण विभागाने केले आहे. यामध्ये भारताने पुलवामा हल्ल्याविरोधात बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या ठिकाण्यांवर हवाई हल्ला केला होता. या पुलवामा हल्ल्यांमध्ये भारताचे 40 जवान शहीद झाले होते. तर भारताच्या हवाई हल्ल्यामध्ये बालाकोटमधील दहशतवादी तळांना उद्धवस्त करण्यात आले होते. 

भारतीय वायुसेनेने या घटनांचा अभ्यास केला आहे. पाकिस्तानी हवाई दल 1999 च्या कारगील युद्धानंतर सातत्याने सैन्याची ताकद वाढवत आहे. दहशतावादाचा बिमोड करण्याच्या नावावर अमेरिका, चीन यांच्याकडून नवनवीन तंत्रज्ञान घेत आहे. या तुलनेत भारताला हवाई युद्धासाठी आपली ताकद वाढविण्याची गरज आहे, असे या अहवालात म्हटले आहे. 

अमेरिकेने दिलेल्या एफ -16 विमानांमुळे पाकिस्तान भारतापेक्षा पुढे आहे. कारण त्या विमानांमध्ये एम्राम मिसाईल लावलेल्या आहेत. भारताकडे हवेतून हवेत मारा करता येऊ शकणारी बीवीआरएएएम मिसाईल आणि एस-400 सुरक्षा प्रणालीने युक्त असलेले राफेल विमान आल्यास भारताला पाकिस्तावर मात करणे सोपे जाणार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाairforceहवाईदलPakistanपाकिस्तानTerror Attackदहशतवादी हल्लाindian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक