शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

श्रद्धेच्या नावाखाली कायदा हातात घेणा-यांविरोधात कठोर पावलं उचलणार, देशात कोणत्याच प्रकारच्या हिंसेला थारा नाही: पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2017 12:10 IST

भारत हा महात्मा गांधी आणि भगवान बुद्धांचा देश; देशात कोणत्याच प्रकारच्या हिंसेला थारा नाही: पंतप्रधान

नवी दिल्ली , दि. 27 - प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आज 35 व्यांदा  'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशाला संबोधित केलं. कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच हरियाणामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवर चिंता व्यक्त केली. श्रद्धेच्या नावाखाली हिंसा खपवून घेणार नाही, सरकार असो किंवा देश हिंसा खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला.    

दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी 11 वाजता पंतप्रधान रेडीओच्या माध्यमातून देशाला संदेश देत असतात. आज कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  हरियाणातील हिंसाचाराच्या घटनेवर चिंता व्यक्त केली.  भारत हा महात्मा गांधी आणि भगवान बुद्धांचा देश आहे, या देशात कोणत्याच प्रकारच्या हिंसेला थारा नाही. धर्म, श्रद्धा राजकारण किंवा इतर कोणत्याही कारणाखाली हिंसाचार अथवा कायदा हातात घेतला जाऊ दिला जाणार नाही. दोषी असलेल्यांना कायदा शिक्षा देणारच आणि सर्वांना कायद्यासमोर झुकावं लागेल अशा शब्दात पंतप्रधानांनी खडेबोल सुनावले.  

25 ऑगस्ट रोजी डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टान दोषी ठरवलं. त्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात हिसाचार उफाळला. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर  त्यांना सोमवारी 28 ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. पंचकुला सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी हा निकाल दिला. या प्रकरणात त्यांना सात ते दहा वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

हिंसाचाराच्या या घटनेच्या पार्श्वभूमिवर मोदींनी चिंता व्यक्त केली आहे. श्रद्धेच्या नावाखाली कायदा हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही, असं ते म्हणाले.