शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

श्रद्धेच्या नावाखाली कायदा हातात घेणा-यांविरोधात कठोर पावलं उचलणार, देशात कोणत्याच प्रकारच्या हिंसेला थारा नाही: पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2017 12:10 IST

भारत हा महात्मा गांधी आणि भगवान बुद्धांचा देश; देशात कोणत्याच प्रकारच्या हिंसेला थारा नाही: पंतप्रधान

नवी दिल्ली , दि. 27 - प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आज 35 व्यांदा  'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशाला संबोधित केलं. कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच हरियाणामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवर चिंता व्यक्त केली. श्रद्धेच्या नावाखाली हिंसा खपवून घेणार नाही, सरकार असो किंवा देश हिंसा खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला.    

दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी 11 वाजता पंतप्रधान रेडीओच्या माध्यमातून देशाला संदेश देत असतात. आज कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  हरियाणातील हिंसाचाराच्या घटनेवर चिंता व्यक्त केली.  भारत हा महात्मा गांधी आणि भगवान बुद्धांचा देश आहे, या देशात कोणत्याच प्रकारच्या हिंसेला थारा नाही. धर्म, श्रद्धा राजकारण किंवा इतर कोणत्याही कारणाखाली हिंसाचार अथवा कायदा हातात घेतला जाऊ दिला जाणार नाही. दोषी असलेल्यांना कायदा शिक्षा देणारच आणि सर्वांना कायद्यासमोर झुकावं लागेल अशा शब्दात पंतप्रधानांनी खडेबोल सुनावले.  

25 ऑगस्ट रोजी डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टान दोषी ठरवलं. त्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात हिसाचार उफाळला. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर  त्यांना सोमवारी 28 ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. पंचकुला सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी हा निकाल दिला. या प्रकरणात त्यांना सात ते दहा वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

हिंसाचाराच्या या घटनेच्या पार्श्वभूमिवर मोदींनी चिंता व्यक्त केली आहे. श्रद्धेच्या नावाखाली कायदा हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही, असं ते म्हणाले.