शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

शेतकऱ्यांवरील लाठीमाराची होणार चौकशी; धरणे आंदोलन घेतले मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 06:47 IST

चर्चेच्या चौथ्या फेरीत दोन्ही बाजूंना मान्य होईल असा तोडगा निघाला.

चंदीगड : नव्या कृषी कायद्याविरोधात हरियाणातील कर्नाल येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर २८ ऑगस्ट रोजी पोलिसांनी केलेल्या लाठीमार प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिल्यानंतर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन मागे घेतले आहे. लाठीमारात मरण पावलेल्या सुशील काजल या शेतकऱ्याच्या कुटुंबातील दोघा व्यक्तींना जिल्हा प्रशासनामध्ये नोकरी देण्याचेही राज्य सरकारने मान्य केले.

चर्चेच्या चौथ्या फेरीत दोन्ही बाजूंना मान्य होईल असा तोडगा निघाला. त्यानंतर शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात केेलेले धरणे आंदोलन मागे घेतले आहे. २८ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराची निवृत्त न्यायाधीशाच्या समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. तसेच या लाठीमार प्रकरणी आयएएस अधिकारी आयुष सिन्हा यांनी निभावलेल्या भूमिकेचीही चौकशी केली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आयुष सिन्हा हे रजेवर असतील.

नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या हरियाणातील शेतकऱ्यांनी भाजप नेत्यांचा एकही कार्यक्रम राज्यात होऊ द्यायचा नाही, असा निर्धार केला होता. कर्नाल येथे २८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर भाजप बैठकीसाठी कर्नाल येथे येणार होते. खट्टर यांचा निषेध करण्यासाठी शेतकरी बस्तरा टोलनाक्याजवळ जमा झाले. त्यावेळी त्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्यात एक शेतकरी मरण पावला व १० शेतकरी जखमी झाले होते. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनHaryanaहरयाणा