शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

मुस्लिम समुदायात स्थान निर्माण करण्यासाठी आरएसएसच्या बैठकीत होणार मंथन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 10:53 IST

लोकसंख्या नियंत्रणावरही चर्चा : १२ ते १४ मार्चदरम्यान हरयाणात बैठक

संजय शर्मानवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक १२ ते १४ मार्च या कालावधीत हरयाणातील समालखा येथे होणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांपर्यंत संपर्क वाढविणे हा बैठकीचा उद्देश आहे. देशातील ३५ कोटी मुस्लिमांमध्ये स्थान निर्माण करणे. तसेच, देशाची वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी देशात चर्चा सुरू करण्यावर भर देण्यात येणार आहे. 

१२ ते १४ मार्च या कालावधीत हरयाणातील समालखा येथे आरएसएसच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, सर्व सहसरकार्यवाह, आरएसएसच्या सर्व संघटना, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष हेही यावेळी उपस्थित राहतील. देशातील सर्व प्रांतीय प्रचारक, प्रादेशिक प्रचारक, विभाग प्रचारक, अखिल भारतीय कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांसह सुमारे १४०० प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार आहेत.

तीन दिवसीय बैठकीत तीन ते पाच ठराव मंजूर केले जातील. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देशाच्या कानाकोपऱ्यात स्थिती मजबूत करणे हा बैठकीचा उद्देश आहे. देशात सुमारे एक लाख नवीन ठिकाणी शाखा उघडण्याचीही योजना आहे. 

आरएसएसचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील अंबेकर यांनी सांगितले की, देशातील ३५ कोटी मुस्लिमांना संघाशी जोडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सरसंघचालक मोहन भागवत हेही मुस्लिम समुदायातील लोकांच्या भेटी घेत आहेत. त्यांच्याशी चर्चाही सुरू आहे. लोकसंख्या नियंत्रणाचा प्रस्तावही बैठकीत येऊ शकतो. विजयादशमीच्या संबोधनात मोहन भागवत म्हणाले होते की, वाढती लोकसंख्या हे देशावरचे ओझे आहे आणि संपत्तीही आहे. २०२५ मध्ये आरएसएसच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. संघाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत आरएसएसमध्ये कोणतेही मोठे बदल होणार नाहीत. जे काही मोठे बदल घडणार आहेत ते २०२४  नंतरच होतील.  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत