शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

मुस्लिम समुदायात स्थान निर्माण करण्यासाठी आरएसएसच्या बैठकीत होणार मंथन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 10:53 IST

लोकसंख्या नियंत्रणावरही चर्चा : १२ ते १४ मार्चदरम्यान हरयाणात बैठक

संजय शर्मानवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक १२ ते १४ मार्च या कालावधीत हरयाणातील समालखा येथे होणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांपर्यंत संपर्क वाढविणे हा बैठकीचा उद्देश आहे. देशातील ३५ कोटी मुस्लिमांमध्ये स्थान निर्माण करणे. तसेच, देशाची वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी देशात चर्चा सुरू करण्यावर भर देण्यात येणार आहे. 

१२ ते १४ मार्च या कालावधीत हरयाणातील समालखा येथे आरएसएसच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, सर्व सहसरकार्यवाह, आरएसएसच्या सर्व संघटना, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष हेही यावेळी उपस्थित राहतील. देशातील सर्व प्रांतीय प्रचारक, प्रादेशिक प्रचारक, विभाग प्रचारक, अखिल भारतीय कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांसह सुमारे १४०० प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार आहेत.

तीन दिवसीय बैठकीत तीन ते पाच ठराव मंजूर केले जातील. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देशाच्या कानाकोपऱ्यात स्थिती मजबूत करणे हा बैठकीचा उद्देश आहे. देशात सुमारे एक लाख नवीन ठिकाणी शाखा उघडण्याचीही योजना आहे. 

आरएसएसचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील अंबेकर यांनी सांगितले की, देशातील ३५ कोटी मुस्लिमांना संघाशी जोडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सरसंघचालक मोहन भागवत हेही मुस्लिम समुदायातील लोकांच्या भेटी घेत आहेत. त्यांच्याशी चर्चाही सुरू आहे. लोकसंख्या नियंत्रणाचा प्रस्तावही बैठकीत येऊ शकतो. विजयादशमीच्या संबोधनात मोहन भागवत म्हणाले होते की, वाढती लोकसंख्या हे देशावरचे ओझे आहे आणि संपत्तीही आहे. २०२५ मध्ये आरएसएसच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. संघाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत आरएसएसमध्ये कोणतेही मोठे बदल होणार नाहीत. जे काही मोठे बदल घडणार आहेत ते २०२४  नंतरच होतील.  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत