शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम समुदायात स्थान निर्माण करण्यासाठी आरएसएसच्या बैठकीत होणार मंथन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 10:53 IST

लोकसंख्या नियंत्रणावरही चर्चा : १२ ते १४ मार्चदरम्यान हरयाणात बैठक

संजय शर्मानवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक १२ ते १४ मार्च या कालावधीत हरयाणातील समालखा येथे होणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांपर्यंत संपर्क वाढविणे हा बैठकीचा उद्देश आहे. देशातील ३५ कोटी मुस्लिमांमध्ये स्थान निर्माण करणे. तसेच, देशाची वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी देशात चर्चा सुरू करण्यावर भर देण्यात येणार आहे. 

१२ ते १४ मार्च या कालावधीत हरयाणातील समालखा येथे आरएसएसच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, सर्व सहसरकार्यवाह, आरएसएसच्या सर्व संघटना, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष हेही यावेळी उपस्थित राहतील. देशातील सर्व प्रांतीय प्रचारक, प्रादेशिक प्रचारक, विभाग प्रचारक, अखिल भारतीय कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांसह सुमारे १४०० प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार आहेत.

तीन दिवसीय बैठकीत तीन ते पाच ठराव मंजूर केले जातील. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देशाच्या कानाकोपऱ्यात स्थिती मजबूत करणे हा बैठकीचा उद्देश आहे. देशात सुमारे एक लाख नवीन ठिकाणी शाखा उघडण्याचीही योजना आहे. 

आरएसएसचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील अंबेकर यांनी सांगितले की, देशातील ३५ कोटी मुस्लिमांना संघाशी जोडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सरसंघचालक मोहन भागवत हेही मुस्लिम समुदायातील लोकांच्या भेटी घेत आहेत. त्यांच्याशी चर्चाही सुरू आहे. लोकसंख्या नियंत्रणाचा प्रस्तावही बैठकीत येऊ शकतो. विजयादशमीच्या संबोधनात मोहन भागवत म्हणाले होते की, वाढती लोकसंख्या हे देशावरचे ओझे आहे आणि संपत्तीही आहे. २०२५ मध्ये आरएसएसच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. संघाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत आरएसएसमध्ये कोणतेही मोठे बदल होणार नाहीत. जे काही मोठे बदल घडणार आहेत ते २०२४  नंतरच होतील.  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत