शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

महामार्गांसाठीच्या भू संपादन कायद्यात मोठा बदल होणार; मालकाच्या हातात काय राहणार? पहा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 09:37 IST

महाराष्ट्रात सध्या विविध महामार्गांच्या जमीन अधिग्रहणावरून आंदोलने पेटली आहेत. नवीन नियम आल्यास यावर काही दिलासा मिळेल की नाही हे आताच सांगणे शक्य नसले तरी रस्त्याची कामे मार्गी लागणार आहेत.

देशात रस्त्यांचे नेटवर्क वेगाने वाढविण्यासाठी जमीन अधिग्रहण कायद्यात मोठा बदल होऊ घातला आहे. यामुळे महामार्गांचे आजवर जमीनीच्या वादांमुळे रखडत आलेले काम आता वेगाने होण्याची अपेक्षा सरकारला आहे. महाराष्ट्रात सध्या विविध महामार्गांच्या जमीन अधिग्रहणावरून आंदोलने पेटली आहेत. नवीन नियम आल्यास यावर काही दिलासा मिळेल की नाही हे आताच सांगणे शक्य नसले तरी रस्त्याची कामे मार्गी लागणार आहेत. 

सरकारने हायवे बनविण्यासाठी एकदा जर का जमीन घेतली आणि पुढील पाच वर्षांत ती वापरात आली नाही तर ती जमीन त्या मालकाला परत केली जाणार आहे. हा पहिला नियम बदल आहे. जो जमीन मालकासाठी फायद्याचा ठरू शकतो. 

दुसरा नियम बदल असा आहे की, जमीनीचा मोबदला घोषित झाला की तीन महिन्यांनंतर राज्यमार्ग प्राधिकरण किंवा जमीन मालक या रकमेवर कोणत्याही प्रकारचा आक्षेप नोंदवू शकत नाही. म्हणजेच पहिल्या तीन महिन्यांतच काय असेल तो आक्षेप नोंदविता येणार आहे. 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग कायद्यात काही बदल प्रस्तावित केले आहेत. हे बदल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या परवानगीसाठी पाठविण्यात आले आहेत. महामार्ग विकास आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या सुविधांसाठी भूसंपादन जलद करणे आणि कायदेशीर वाद कमी करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. मुंबई-गोवा महामार्ग असाच गेली १५-२० वर्षे रखडला आहे. याचबरोबर रेल्वे आणि हवाई मार्गासह इतर वाहतुकीच्या साधनांसह महामार्गाच्या कोणत्याही अदलाबदलीला राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्याचा अधिकार सरकारला राहणार आहे. 

जमीन अधिग्रहणासाठी सूचना देण्यासाठी एक विशेष पोर्टल तयार करण्यात येणार आहे. यानुसार रस्त्याच्या कडेला असलेल्या सुविधा, सार्वजनिक सुविधा, टोल आणि कार्यालये यासाठी जमीन संपादित केली जाऊ शकते. भूसंपादनासाठी अधिसूचना जारी केल्यानंतर जमीन मालक या जमीनीवर कोणताही व्यवहार, बांधकाम करू शकणार नाही. जादा मोबदला मिळविण्यासाठी भूसंपादनाच्या पहिल्या अधिसूचनेनंतर जमीन मालकांनी घरे बांधली किंवा दुकाने उघडल्याचे प्रकार घडले आहेत, त्याला आळा बसणार आहे.  

टॅग्स :highwayमहामार्ग