शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

महामार्गांसाठीच्या भू संपादन कायद्यात मोठा बदल होणार; मालकाच्या हातात काय राहणार? पहा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 09:37 IST

महाराष्ट्रात सध्या विविध महामार्गांच्या जमीन अधिग्रहणावरून आंदोलने पेटली आहेत. नवीन नियम आल्यास यावर काही दिलासा मिळेल की नाही हे आताच सांगणे शक्य नसले तरी रस्त्याची कामे मार्गी लागणार आहेत.

देशात रस्त्यांचे नेटवर्क वेगाने वाढविण्यासाठी जमीन अधिग्रहण कायद्यात मोठा बदल होऊ घातला आहे. यामुळे महामार्गांचे आजवर जमीनीच्या वादांमुळे रखडत आलेले काम आता वेगाने होण्याची अपेक्षा सरकारला आहे. महाराष्ट्रात सध्या विविध महामार्गांच्या जमीन अधिग्रहणावरून आंदोलने पेटली आहेत. नवीन नियम आल्यास यावर काही दिलासा मिळेल की नाही हे आताच सांगणे शक्य नसले तरी रस्त्याची कामे मार्गी लागणार आहेत. 

सरकारने हायवे बनविण्यासाठी एकदा जर का जमीन घेतली आणि पुढील पाच वर्षांत ती वापरात आली नाही तर ती जमीन त्या मालकाला परत केली जाणार आहे. हा पहिला नियम बदल आहे. जो जमीन मालकासाठी फायद्याचा ठरू शकतो. 

दुसरा नियम बदल असा आहे की, जमीनीचा मोबदला घोषित झाला की तीन महिन्यांनंतर राज्यमार्ग प्राधिकरण किंवा जमीन मालक या रकमेवर कोणत्याही प्रकारचा आक्षेप नोंदवू शकत नाही. म्हणजेच पहिल्या तीन महिन्यांतच काय असेल तो आक्षेप नोंदविता येणार आहे. 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग कायद्यात काही बदल प्रस्तावित केले आहेत. हे बदल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या परवानगीसाठी पाठविण्यात आले आहेत. महामार्ग विकास आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या सुविधांसाठी भूसंपादन जलद करणे आणि कायदेशीर वाद कमी करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. मुंबई-गोवा महामार्ग असाच गेली १५-२० वर्षे रखडला आहे. याचबरोबर रेल्वे आणि हवाई मार्गासह इतर वाहतुकीच्या साधनांसह महामार्गाच्या कोणत्याही अदलाबदलीला राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्याचा अधिकार सरकारला राहणार आहे. 

जमीन अधिग्रहणासाठी सूचना देण्यासाठी एक विशेष पोर्टल तयार करण्यात येणार आहे. यानुसार रस्त्याच्या कडेला असलेल्या सुविधा, सार्वजनिक सुविधा, टोल आणि कार्यालये यासाठी जमीन संपादित केली जाऊ शकते. भूसंपादनासाठी अधिसूचना जारी केल्यानंतर जमीन मालक या जमीनीवर कोणताही व्यवहार, बांधकाम करू शकणार नाही. जादा मोबदला मिळविण्यासाठी भूसंपादनाच्या पहिल्या अधिसूचनेनंतर जमीन मालकांनी घरे बांधली किंवा दुकाने उघडल्याचे प्रकार घडले आहेत, त्याला आळा बसणार आहे.  

टॅग्स :highwayमहामार्ग