शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
4
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
5
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
6
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
7
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
8
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
9
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
11
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
12
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
13
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
14
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
15
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
16
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
17
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
18
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
19
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
20
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश

महामार्गांसाठीच्या भू संपादन कायद्यात मोठा बदल होणार; मालकाच्या हातात काय राहणार? पहा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 09:37 IST

महाराष्ट्रात सध्या विविध महामार्गांच्या जमीन अधिग्रहणावरून आंदोलने पेटली आहेत. नवीन नियम आल्यास यावर काही दिलासा मिळेल की नाही हे आताच सांगणे शक्य नसले तरी रस्त्याची कामे मार्गी लागणार आहेत.

देशात रस्त्यांचे नेटवर्क वेगाने वाढविण्यासाठी जमीन अधिग्रहण कायद्यात मोठा बदल होऊ घातला आहे. यामुळे महामार्गांचे आजवर जमीनीच्या वादांमुळे रखडत आलेले काम आता वेगाने होण्याची अपेक्षा सरकारला आहे. महाराष्ट्रात सध्या विविध महामार्गांच्या जमीन अधिग्रहणावरून आंदोलने पेटली आहेत. नवीन नियम आल्यास यावर काही दिलासा मिळेल की नाही हे आताच सांगणे शक्य नसले तरी रस्त्याची कामे मार्गी लागणार आहेत. 

सरकारने हायवे बनविण्यासाठी एकदा जर का जमीन घेतली आणि पुढील पाच वर्षांत ती वापरात आली नाही तर ती जमीन त्या मालकाला परत केली जाणार आहे. हा पहिला नियम बदल आहे. जो जमीन मालकासाठी फायद्याचा ठरू शकतो. 

दुसरा नियम बदल असा आहे की, जमीनीचा मोबदला घोषित झाला की तीन महिन्यांनंतर राज्यमार्ग प्राधिकरण किंवा जमीन मालक या रकमेवर कोणत्याही प्रकारचा आक्षेप नोंदवू शकत नाही. म्हणजेच पहिल्या तीन महिन्यांतच काय असेल तो आक्षेप नोंदविता येणार आहे. 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग कायद्यात काही बदल प्रस्तावित केले आहेत. हे बदल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या परवानगीसाठी पाठविण्यात आले आहेत. महामार्ग विकास आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या सुविधांसाठी भूसंपादन जलद करणे आणि कायदेशीर वाद कमी करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. मुंबई-गोवा महामार्ग असाच गेली १५-२० वर्षे रखडला आहे. याचबरोबर रेल्वे आणि हवाई मार्गासह इतर वाहतुकीच्या साधनांसह महामार्गाच्या कोणत्याही अदलाबदलीला राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्याचा अधिकार सरकारला राहणार आहे. 

जमीन अधिग्रहणासाठी सूचना देण्यासाठी एक विशेष पोर्टल तयार करण्यात येणार आहे. यानुसार रस्त्याच्या कडेला असलेल्या सुविधा, सार्वजनिक सुविधा, टोल आणि कार्यालये यासाठी जमीन संपादित केली जाऊ शकते. भूसंपादनासाठी अधिसूचना जारी केल्यानंतर जमीन मालक या जमीनीवर कोणताही व्यवहार, बांधकाम करू शकणार नाही. जादा मोबदला मिळविण्यासाठी भूसंपादनाच्या पहिल्या अधिसूचनेनंतर जमीन मालकांनी घरे बांधली किंवा दुकाने उघडल्याचे प्रकार घडले आहेत, त्याला आळा बसणार आहे.  

टॅग्स :highwayमहामार्ग