शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

Punjab Assembly Election Results 2022: ‘आप’ने कहा, ठाेकाे ताली! पंजाबात लाट नाही, त्सुनामीच आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 06:45 IST

कॅ. अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा निर्णय चुकीचा ठरला. अमरिंदर यांनी काँग्रेस सोडल्याने पक्षाचे नुकसान झाले.

-बलवंत तक्षकचंदीगड : पंजाबमध्ये यंदा झाडूच्या राजकारणाने सर्व दिग्गजांना साफ केले आहे. आम आदमी पार्टीच्या लाटेत ना काँग्रेसचा दलित मुख्यमंत्र्यांचा मुद्दा चालला, ना अकाली दल आणि भाजपचा ‘डेरा फॅक्टर’ चालला. आप पूर्ण बहुमतासह राज्यात सरकार स्थापन करणार आहे.

मान ४५ हजार मतांनी विजयीभगवंत मान ४५ हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले. तर मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू, माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल, माजी कॅबिनेट मंत्री बिक्रमसिंग मजीठिया, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग, माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्टल आणि अर्थमंत्री मनप्रीतसिंग बादल यांचा पराभव झाला आहे.

विजयी झालेल्या आम आदमी पक्षाचे मनःपूर्वक अभिनंदन. मतदारांनी दिलेला काैल आम्ही स्वीकारला आहे. आम्ही आमच्या पराभवाची मीमांसा करू. विरोधी पक्ष म्हणून पंजाबमध्ये काॅंग्रेस पक्ष यापुढील काळात  सकारात्मक काम करेल. - नवज्योतसिंग सिद्धू, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

राहुल गांधींचा निर्णय ठरला चुकीचाकॅ. अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा निर्णय चुकीचा ठरला. अमरिंदर यांनी काँग्रेस सोडल्याने पक्षाचे नुकसान झाले. अकाली दलाचा भाजपसोबतची युती तोडण्याचा निर्णयही तोट्यातला निर्णय ठरला आहे. कृषी कायद्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला माघार घेण्यास भाग पाडणाऱ्या संयुक्त किसान मोर्चालाही निवडणुकीत कोणताही लाभ झाला नाही.

चन्नी आणि सिद्धू पराभूतकाँग्रेसने चन्नी यांना हा विचार करून खुर्ची दिली की, पंजाबातील ३२ टक्के मतदारांचे समर्थन मिळेल; पण सत्ता मिळणे दूरच, चन्नी स्वत: दोन्ही जागांवर पराभूत झाले. चन्नींच्या प्रत्येक निर्णयावर बोट ठेवणारे सिद्धूही विधानसभेत पोहोचू शकले नाहीत. 

अरविंद केजरीवाल : कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा काँग्रेस पक्षत्याग आणि मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी व नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील बेबनाव हे मुद्दे आम आदमी पक्षाच्या पथ्यावर पडले. त्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना पंजाबी मतदारांसमोर आपचा पर्याय जोरदारपणे मांडता आला. त्यातच त्यांनी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून भगवंतसिंग मान यांना पेश केल्याने मतदारांनी झाडूलाच सर्वाधिक पसंती दिली. पंजाबातील बहुतांश मतदारांनी आम आदमी पक्षाचे दिल्ली प्रारूप अनुभवले असल्याने केजरीवाल यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव त्यांच्यावर पडला. म्हणूनच या पक्षाला बहुमत मिळाले. 

टॅग्स :Punjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२AAPआप