शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Punjab Assembly Election Results 2022: ‘आप’ने कहा, ठाेकाे ताली! पंजाबात लाट नाही, त्सुनामीच आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 06:45 IST

कॅ. अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा निर्णय चुकीचा ठरला. अमरिंदर यांनी काँग्रेस सोडल्याने पक्षाचे नुकसान झाले.

-बलवंत तक्षकचंदीगड : पंजाबमध्ये यंदा झाडूच्या राजकारणाने सर्व दिग्गजांना साफ केले आहे. आम आदमी पार्टीच्या लाटेत ना काँग्रेसचा दलित मुख्यमंत्र्यांचा मुद्दा चालला, ना अकाली दल आणि भाजपचा ‘डेरा फॅक्टर’ चालला. आप पूर्ण बहुमतासह राज्यात सरकार स्थापन करणार आहे.

मान ४५ हजार मतांनी विजयीभगवंत मान ४५ हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले. तर मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू, माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल, माजी कॅबिनेट मंत्री बिक्रमसिंग मजीठिया, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग, माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्टल आणि अर्थमंत्री मनप्रीतसिंग बादल यांचा पराभव झाला आहे.

विजयी झालेल्या आम आदमी पक्षाचे मनःपूर्वक अभिनंदन. मतदारांनी दिलेला काैल आम्ही स्वीकारला आहे. आम्ही आमच्या पराभवाची मीमांसा करू. विरोधी पक्ष म्हणून पंजाबमध्ये काॅंग्रेस पक्ष यापुढील काळात  सकारात्मक काम करेल. - नवज्योतसिंग सिद्धू, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

राहुल गांधींचा निर्णय ठरला चुकीचाकॅ. अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा निर्णय चुकीचा ठरला. अमरिंदर यांनी काँग्रेस सोडल्याने पक्षाचे नुकसान झाले. अकाली दलाचा भाजपसोबतची युती तोडण्याचा निर्णयही तोट्यातला निर्णय ठरला आहे. कृषी कायद्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला माघार घेण्यास भाग पाडणाऱ्या संयुक्त किसान मोर्चालाही निवडणुकीत कोणताही लाभ झाला नाही.

चन्नी आणि सिद्धू पराभूतकाँग्रेसने चन्नी यांना हा विचार करून खुर्ची दिली की, पंजाबातील ३२ टक्के मतदारांचे समर्थन मिळेल; पण सत्ता मिळणे दूरच, चन्नी स्वत: दोन्ही जागांवर पराभूत झाले. चन्नींच्या प्रत्येक निर्णयावर बोट ठेवणारे सिद्धूही विधानसभेत पोहोचू शकले नाहीत. 

अरविंद केजरीवाल : कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा काँग्रेस पक्षत्याग आणि मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी व नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील बेबनाव हे मुद्दे आम आदमी पक्षाच्या पथ्यावर पडले. त्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना पंजाबी मतदारांसमोर आपचा पर्याय जोरदारपणे मांडता आला. त्यातच त्यांनी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून भगवंतसिंग मान यांना पेश केल्याने मतदारांनी झाडूलाच सर्वाधिक पसंती दिली. पंजाबातील बहुतांश मतदारांनी आम आदमी पक्षाचे दिल्ली प्रारूप अनुभवले असल्याने केजरीवाल यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव त्यांच्यावर पडला. म्हणूनच या पक्षाला बहुमत मिळाले. 

टॅग्स :Punjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२AAPआप