शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

कधी काळी १२ लाखांच्या उत्पन्नावर ३ लाख रुपये कर द्यावा लागत होता; मोदींनी केली नेहरु-इंदिरांच्या सरकारसोबत तुलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 15:11 IST

पंतप्रधान मोदींनी सत्तर वर्षांपूर्वीपासूनच्या करांसोबत आताच्या बजेटची तुलना केली आहे. या काळात सरकारचे उत्पन्न एवढे नव्हते की त्यांना जीएसटी सारखा अप्रत्यक्ष कर मिळत जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थसंकल्पातील १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरील करमुक्तीचा मुद्दा दिल्ली विधानसभा निवडणुकीत मांडण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीतील आर के पुरममधील प्रचार सभेत कालच्या अर्थसंकल्पातील घोषणांची भारताच्या स्वातंत्र्य काळाशी तुलना केली आहे. नेहरु-इंदिरा गांधींच्या काळात १२ लाखांच्या पगारावर ३ लाख रुपये कर द्यावा लागायचा, आताच्या अर्थसंकल्पाकडे पहा, असे मोदींनी म्हटले आहे. 

पंतप्रधान मोदींनी सत्तर वर्षांपूर्वीपासूनच्या करांसोबत आताच्या बजेटची तुलना केली आहे. या काळात सरकारचे उत्पन्न एवढे नव्हते. तसेच एवढा पगारही किंवा करदात्याचे उत्पन्नही फार कमी, म्हणजे हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढ्याच लोकांचे होते. अर्थमंत्र्यांनी इन्कम टॅक्सच रद्द करावा अशीही मागणी जनतेतून होत होती. परंतू, त्यांनी नवीन कर प्रणालीकडे लोकांनी वळण्यासाठी ही १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर करमुक्तीची घोषणा केली आहे. 

प्रचारसभेत पुढे मोदींनी आपवरही निशाना साधला. 'यावेळी दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. दिल्लीच्या 'आपत्ती' पक्षाने येथे ११ वर्षे वाया घालवली. मला राज्यातील दिल्लीतील लोकांची सेवा करण्याची संधी द्यावी, अशी मी विनंती करतो', असे मोदी म्हणाले.  तुमच्या प्रत्येक समस्येचे आणि अडचणीचे निराकरण करण्यासाठी मी शक्य ते सर्व प्रयत्न करेन, अशी मी हमी देतो. सबबी सांगण्याऐवजी कामे करणारे सरकार आपल्याला स्थापन करावे लागणार आहे, अशी टीका मोदी यांनी केली. 

मतदानापूर्वीच झाडूच्या काड्या विखुरल्या जात आहेत. 'आपत्ती'मुळे जमिनीवरील लोक किती संतापले आहेत हे त्या लोकांना समजले आहे. यामुळे हे लोक सोडून जात आहेत. हा पक्ष दिल्लीतील लोकांच्या रोषाला इतका घाबरला आहे की दर तासाला वेगवेगळ्या घोषणा करत सुटला आहे. गेल्या १० वर्षांपासून ते त्याच खोट्या घोषणांवर पुन्हा पुन्हा मते मागत आहेत. आता आम्ही हे खोटेपणा सहन करणार नाही, असे मोदी म्हणाले. मोदींची हमी म्हणजे पूर्ततेची हमी. मोदी जे काही बोलतात ते करतात. गेल्या १० वर्षांत भारताची अर्थव्यवस्था १० व्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आली आहे. देशाची आर्थिक ताकद वाढत आहे. नागरिकांचे उत्पन्न वाढत आहे. जर परिस्थिती पूर्वीसारखीच असती तर देशाचे हे वाढते उत्पन्न घोटाळ्यांमध्ये गेले असते. काही लोकांनी ते हडप केले असते, अशी टीका मोदी यांनी केली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhi electionदिल्ली निवडणूक