शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कधी काळी १२ लाखांच्या उत्पन्नावर ३ लाख रुपये कर द्यावा लागत होता; मोदींनी केली नेहरु-इंदिरांच्या सरकारसोबत तुलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 15:11 IST

पंतप्रधान मोदींनी सत्तर वर्षांपूर्वीपासूनच्या करांसोबत आताच्या बजेटची तुलना केली आहे. या काळात सरकारचे उत्पन्न एवढे नव्हते की त्यांना जीएसटी सारखा अप्रत्यक्ष कर मिळत जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थसंकल्पातील १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरील करमुक्तीचा मुद्दा दिल्ली विधानसभा निवडणुकीत मांडण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीतील आर के पुरममधील प्रचार सभेत कालच्या अर्थसंकल्पातील घोषणांची भारताच्या स्वातंत्र्य काळाशी तुलना केली आहे. नेहरु-इंदिरा गांधींच्या काळात १२ लाखांच्या पगारावर ३ लाख रुपये कर द्यावा लागायचा, आताच्या अर्थसंकल्पाकडे पहा, असे मोदींनी म्हटले आहे. 

पंतप्रधान मोदींनी सत्तर वर्षांपूर्वीपासूनच्या करांसोबत आताच्या बजेटची तुलना केली आहे. या काळात सरकारचे उत्पन्न एवढे नव्हते. तसेच एवढा पगारही किंवा करदात्याचे उत्पन्नही फार कमी, म्हणजे हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढ्याच लोकांचे होते. अर्थमंत्र्यांनी इन्कम टॅक्सच रद्द करावा अशीही मागणी जनतेतून होत होती. परंतू, त्यांनी नवीन कर प्रणालीकडे लोकांनी वळण्यासाठी ही १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर करमुक्तीची घोषणा केली आहे. 

प्रचारसभेत पुढे मोदींनी आपवरही निशाना साधला. 'यावेळी दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. दिल्लीच्या 'आपत्ती' पक्षाने येथे ११ वर्षे वाया घालवली. मला राज्यातील दिल्लीतील लोकांची सेवा करण्याची संधी द्यावी, अशी मी विनंती करतो', असे मोदी म्हणाले.  तुमच्या प्रत्येक समस्येचे आणि अडचणीचे निराकरण करण्यासाठी मी शक्य ते सर्व प्रयत्न करेन, अशी मी हमी देतो. सबबी सांगण्याऐवजी कामे करणारे सरकार आपल्याला स्थापन करावे लागणार आहे, अशी टीका मोदी यांनी केली. 

मतदानापूर्वीच झाडूच्या काड्या विखुरल्या जात आहेत. 'आपत्ती'मुळे जमिनीवरील लोक किती संतापले आहेत हे त्या लोकांना समजले आहे. यामुळे हे लोक सोडून जात आहेत. हा पक्ष दिल्लीतील लोकांच्या रोषाला इतका घाबरला आहे की दर तासाला वेगवेगळ्या घोषणा करत सुटला आहे. गेल्या १० वर्षांपासून ते त्याच खोट्या घोषणांवर पुन्हा पुन्हा मते मागत आहेत. आता आम्ही हे खोटेपणा सहन करणार नाही, असे मोदी म्हणाले. मोदींची हमी म्हणजे पूर्ततेची हमी. मोदी जे काही बोलतात ते करतात. गेल्या १० वर्षांत भारताची अर्थव्यवस्था १० व्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आली आहे. देशाची आर्थिक ताकद वाढत आहे. नागरिकांचे उत्पन्न वाढत आहे. जर परिस्थिती पूर्वीसारखीच असती तर देशाचे हे वाढते उत्पन्न घोटाळ्यांमध्ये गेले असते. काही लोकांनी ते हडप केले असते, अशी टीका मोदी यांनी केली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhi electionदिल्ली निवडणूक