शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

खळबळ उडाली! हवाई दलाच्या विमानावर हवेत असतानाच मोठा हल्ला; म्यानमारला मदत नेत असताना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 11:48 IST

भारतीय हवाई दलाचे मालवाहू विमान म्यानमारला निघाले होते, पोहोचण्याच्या काही मिनिटे आधी हवेत असताना या विमानावर सायबर हल्ला करण्यात आला.

भारतीय हवाई दलासोबत धक्कादायक घटना घडली आहे. हवाई दलाचे विमान जे म्यानमारलाभूकंप पीडितांसाठी मदत घेऊन गेल होते, त्यावर सायबर हल्ला करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीत इस्रायल आपल्यावरील हल्ले चुकविण्यासाठी जीपीएस प्रणालीवर सायबर हल्ले करत असल्याचे वृत्त आले होते. तसाच हल्ला या विमानावर हवेत असताना करण्यात आला आहे. 

भारतीय हवाई दलाचे मालवाहू विमान म्यानमारला निघाले होते, पोहोचण्याच्या काही मिनिटे आधी हवेत असताना या विमानावर सायबर हल्ला करण्यात आला. याद्वारे या विमानाचा मार्ग भटकविण्यात येत होता. सायबर हल्लेखोर जर यामध्ये यशस्वी झाले असते तर भारतीय विमान वेगळ्याच मार्गावर निघाले असते. कदाचित मार्ग भटकल्यामुळे संकटातही सापडले असते. विमानांमध्ये जर इंधन कमी असले असते आणि जर असा हल्ला झाला असता तर हवेतच इंधन संपण्याचा धोका असतो. परंतू, हवाई दलाच्या पायलटनी हा सायबर हल्ला परतवून लावला आणि विमान सुरक्षित स्थळी उतरविले. 

म्यानमारच्या हवाई हद्दीत भारतीय हवाई दलाच्या विमानांवर सायबर हल्ला झाला होता. विमानांचे जीपीएस सिग्नल स्पूफ करत वेगळेच जीपीएस कोऑर्डिनेट्स दाखविले जात होते. यामागे नेमके कोण होते, हे शोधणे कठीण असले तरी गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल असे करत असल्याचा नुकताच अहवाल आला होता. यामुळे पाकिस्तान आणि जम्मू काश्मीर सीमेवर विमानांचा गोंधळ उडत आहे. अशातच हा ताजा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. 

भारताचे हवाई दलाचे विमान दुसऱ्याच देशाच्या हद्दीत घुसल्याने विचित्र परिस्थिती निर्माण होऊ शकते. पाकिस्तान, चीन किंवा तुर्की सारखे जे देश आहेत, त्या देशांमध्ये गेल्यास परिस्थिती चिघळू शकते. यामुळे हवाई दल सावध झाले आहे. म्यानमारमध्ये चीनचा प्रभाव लक्षणीयरीत्या वाढत आहे. तसेच अनेक बंडखोर संघटनादेखील आहेत. भारतीय पायलटनी जीपीएस सिग्नलमध्ये गडबड असल्याचे दिसताच लगेचच बॅकअप सिस्टीमचा वापर केला. या विमानांमध्ये नर्शियल नेविगेशन सिस्टम(INS) देखील इन्स्टॉल होती, त्याच्या आधारे हे विमान योग्य दिशेने नेण्यात आले. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलcyber crimeसायबर क्राइमMyanmarम्यानमारEarthquakeभूकंप