शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

खळबळ उडाली! हवाई दलाच्या विमानावर हवेत असतानाच मोठा हल्ला; म्यानमारला मदत नेत असताना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 11:48 IST

भारतीय हवाई दलाचे मालवाहू विमान म्यानमारला निघाले होते, पोहोचण्याच्या काही मिनिटे आधी हवेत असताना या विमानावर सायबर हल्ला करण्यात आला.

भारतीय हवाई दलासोबत धक्कादायक घटना घडली आहे. हवाई दलाचे विमान जे म्यानमारलाभूकंप पीडितांसाठी मदत घेऊन गेल होते, त्यावर सायबर हल्ला करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीत इस्रायल आपल्यावरील हल्ले चुकविण्यासाठी जीपीएस प्रणालीवर सायबर हल्ले करत असल्याचे वृत्त आले होते. तसाच हल्ला या विमानावर हवेत असताना करण्यात आला आहे. 

भारतीय हवाई दलाचे मालवाहू विमान म्यानमारला निघाले होते, पोहोचण्याच्या काही मिनिटे आधी हवेत असताना या विमानावर सायबर हल्ला करण्यात आला. याद्वारे या विमानाचा मार्ग भटकविण्यात येत होता. सायबर हल्लेखोर जर यामध्ये यशस्वी झाले असते तर भारतीय विमान वेगळ्याच मार्गावर निघाले असते. कदाचित मार्ग भटकल्यामुळे संकटातही सापडले असते. विमानांमध्ये जर इंधन कमी असले असते आणि जर असा हल्ला झाला असता तर हवेतच इंधन संपण्याचा धोका असतो. परंतू, हवाई दलाच्या पायलटनी हा सायबर हल्ला परतवून लावला आणि विमान सुरक्षित स्थळी उतरविले. 

म्यानमारच्या हवाई हद्दीत भारतीय हवाई दलाच्या विमानांवर सायबर हल्ला झाला होता. विमानांचे जीपीएस सिग्नल स्पूफ करत वेगळेच जीपीएस कोऑर्डिनेट्स दाखविले जात होते. यामागे नेमके कोण होते, हे शोधणे कठीण असले तरी गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल असे करत असल्याचा नुकताच अहवाल आला होता. यामुळे पाकिस्तान आणि जम्मू काश्मीर सीमेवर विमानांचा गोंधळ उडत आहे. अशातच हा ताजा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. 

भारताचे हवाई दलाचे विमान दुसऱ्याच देशाच्या हद्दीत घुसल्याने विचित्र परिस्थिती निर्माण होऊ शकते. पाकिस्तान, चीन किंवा तुर्की सारखे जे देश आहेत, त्या देशांमध्ये गेल्यास परिस्थिती चिघळू शकते. यामुळे हवाई दल सावध झाले आहे. म्यानमारमध्ये चीनचा प्रभाव लक्षणीयरीत्या वाढत आहे. तसेच अनेक बंडखोर संघटनादेखील आहेत. भारतीय पायलटनी जीपीएस सिग्नलमध्ये गडबड असल्याचे दिसताच लगेचच बॅकअप सिस्टीमचा वापर केला. या विमानांमध्ये नर्शियल नेविगेशन सिस्टम(INS) देखील इन्स्टॉल होती, त्याच्या आधारे हे विमान योग्य दिशेने नेण्यात आले. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलcyber crimeसायबर क्राइमMyanmarम्यानमारEarthquakeभूकंप