शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

'अफस्पा'वर पुनर्विचाराची योग्य वेळ अजून आलेली नाही- बिपीन रावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 22:15 IST

जम्मू-काश्मीर व पूर्वेकडच्या राज्यांमध्ये लागू असलेल्या सशस्त्र दल विशेषाधिकार अॅक्ट (अफस्पा)बाबत पुनर्विचाराची योग्य वेळ अजून आलेली नाही, असं लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी स्पष्ट केलं आहे.

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीर व पूर्वेकडच्या राज्यांमध्ये लागू असलेल्या सशस्त्र दल विशेषाधिकार अॅक्ट (अफस्पा)बाबत पुनर्विचाराची योग्य वेळ अजून आलेली नाही, असं लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी स्पष्ट केलं आहे. काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कुरापती पाहता अफस्पावर पुनर्विचाराची ही योग्य वेळ नाही. त्यामुळे त्या अॅक्टमधील अटी शिथिल करण्याची शक्यता लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी फेटाळून लावली आहे.काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा वाढता उच्छाद आणि तरुणांकडून होणा-या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांना अफस्पानुसार विशेषाधिकार बहाल करण्यात आला आहे. परंतु जम्मू-काश्मीरमध्ये सत्ताधारी पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स यांसारख्या पक्षांसह मानवाधिकार कार्यकर्तेही अफस्फा कायदा रद्द करण्याची मागणी करत आहेत. मानवाधिकारांचं उल्लंघन होऊ नये यासाठी लष्कराकडून विशेष काळजी घेतली जाते. अफस्पावर पुनर्विचार करण्याची ही योग्य वेळ नव्हे. स्थानिकांना त्रास होणार नाही, याची लष्कर पुरेपूर काळजी घेत असल्याचंही लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी स्पष्ट केलं आहे. 

काश्मिरातील सीमापार दहशतवाद आणि दहशतवादी हल्ल्यांच्या वाढत्या घटना लक्षात घेता राज्यात लागू करण्यात आलेला सशस्त्र दले विशेष अधिकार कायदा (अफस्पा) मागे घेतला जाणार नाही, असेही गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथसिंग यांनी स्पष्ट केले होते.जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी नवी दिल्लीत मोदी आणि राजनाथसिंग यांची भेट घेऊन सर्वसमावेशक विकास कार्यक्रम आणि युवक व समाजाच्या अन्य घटकांच्या अन्य समस्यांवर चर्चा केली. या चर्चेत पंतप्रधानांनी युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम आणि विविध क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यावर भर दिला. जम्मू-काश्मिरात सरकार स्थापन झाल्यानंतर सईद यांनी मोदी व राजनाथसिंग यांची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ होती.सईद यांनी मोदी व राजनाथसिंग यांना सौर आणि लघु व मोठे जल विद्युत प्रकल्प स्थापन करण्यासह राज्याच्या विकासासाठी तयार केलेले आपले ‘दृष्टिपत्र’ सादर केले. तसेच शहरी व ग्रामीण भागातील दळणवळण, पर्यटन विकास आणि लोकांसाठी गृहनिर्माण प्रकल्प या मुद्यांवरही मोदींशी चर्चा केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतJammu Kashmirजम्मू-काश्मीर