शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

'अफस्पा'वर पुनर्विचाराची योग्य वेळ अजून आलेली नाही- बिपीन रावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 22:15 IST

जम्मू-काश्मीर व पूर्वेकडच्या राज्यांमध्ये लागू असलेल्या सशस्त्र दल विशेषाधिकार अॅक्ट (अफस्पा)बाबत पुनर्विचाराची योग्य वेळ अजून आलेली नाही, असं लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी स्पष्ट केलं आहे.

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीर व पूर्वेकडच्या राज्यांमध्ये लागू असलेल्या सशस्त्र दल विशेषाधिकार अॅक्ट (अफस्पा)बाबत पुनर्विचाराची योग्य वेळ अजून आलेली नाही, असं लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी स्पष्ट केलं आहे. काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कुरापती पाहता अफस्पावर पुनर्विचाराची ही योग्य वेळ नाही. त्यामुळे त्या अॅक्टमधील अटी शिथिल करण्याची शक्यता लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी फेटाळून लावली आहे.काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा वाढता उच्छाद आणि तरुणांकडून होणा-या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांना अफस्पानुसार विशेषाधिकार बहाल करण्यात आला आहे. परंतु जम्मू-काश्मीरमध्ये सत्ताधारी पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स यांसारख्या पक्षांसह मानवाधिकार कार्यकर्तेही अफस्फा कायदा रद्द करण्याची मागणी करत आहेत. मानवाधिकारांचं उल्लंघन होऊ नये यासाठी लष्कराकडून विशेष काळजी घेतली जाते. अफस्पावर पुनर्विचार करण्याची ही योग्य वेळ नव्हे. स्थानिकांना त्रास होणार नाही, याची लष्कर पुरेपूर काळजी घेत असल्याचंही लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी स्पष्ट केलं आहे. 

काश्मिरातील सीमापार दहशतवाद आणि दहशतवादी हल्ल्यांच्या वाढत्या घटना लक्षात घेता राज्यात लागू करण्यात आलेला सशस्त्र दले विशेष अधिकार कायदा (अफस्पा) मागे घेतला जाणार नाही, असेही गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथसिंग यांनी स्पष्ट केले होते.जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी नवी दिल्लीत मोदी आणि राजनाथसिंग यांची भेट घेऊन सर्वसमावेशक विकास कार्यक्रम आणि युवक व समाजाच्या अन्य घटकांच्या अन्य समस्यांवर चर्चा केली. या चर्चेत पंतप्रधानांनी युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम आणि विविध क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यावर भर दिला. जम्मू-काश्मिरात सरकार स्थापन झाल्यानंतर सईद यांनी मोदी व राजनाथसिंग यांची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ होती.सईद यांनी मोदी व राजनाथसिंग यांना सौर आणि लघु व मोठे जल विद्युत प्रकल्प स्थापन करण्यासह राज्याच्या विकासासाठी तयार केलेले आपले ‘दृष्टिपत्र’ सादर केले. तसेच शहरी व ग्रामीण भागातील दळणवळण, पर्यटन विकास आणि लोकांसाठी गृहनिर्माण प्रकल्प या मुद्यांवरही मोदींशी चर्चा केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतJammu Kashmirजम्मू-काश्मीर