शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

बिहारमध्ये 'एनआरसी'चा प्रश्नच नाही; 'सीएए'वर चर्चा व्हावी : नितीश कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 15:47 IST

नागरिकता कायद्यावरून जदयूमध्ये दोन मतप्रवाह पाहायला मिळाले होते. पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांत किशार यांनी नागरिकता कायद्याला विरोध दर्शविला होता. त्यानंतर त्यांनी एनआरसीच्या मुद्दावरून प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांचे कौतुकही केले होते.

नवी दिल्ली - नागरिकता विधेयक आणि एनआरसी या संदर्भात देशभरात वादंग सुरू असताना बिहारचे मुख्यमंत्री आणि भाजपचा मित्रपक्ष असलेले जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांनी मोठे वक्तव्य केले. भाजपला घरचा आहेर देताना नितीश यांनी सीएए कायद्यावर चर्चा करणं आवश्यक असल्याचे म्हटले.

सीएए संदर्भात चर्चा आवश्यक आहे. सर्व पक्ष यावर चर्चा करण्यासाठी तयार असतील तर चर्चा व्हायलाच हवी, असं नितीश यांनी बिहार विधानसभेत म्हटले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा एनआरसी कायद्याला विरोध केला. तसेच हा कायदा बिहारमध्ये लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले. एनआरसीचा मुद्दा केवळ आसाम राज्यापुरता मर्यादीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तसं स्पष्टीकरण दिल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान नागरिकता कायद्यावरून जदयूमध्ये दोन मतप्रवाह पाहायला मिळाले होते. पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांत किशार यांनी नागरिकता कायद्याला विरोध दर्शविला होता. त्यानंतर त्यांनी एनआरसीच्या मुद्दावरून प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांचे कौतुकही केले होते. तर दुसरीकडे नितीश कुमार हे एनआरसी राज्यात लागू होणार नसल्याचे सांगत होते. आता विधानसभेत पुन्हा त्यांनी एनआरसी लागू न करण्याचा पुनरोच्चार केला आहे.