शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

गुजरातेत भाजपाला निर्णायक बहुमत मिळण्याची शक्यता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 04:28 IST

विधानसभा निवडणुकीत निर्णायक बहुमत ना भाजपाला मिळेल ना काँग्रेसला. अपक्ष, छोटे पक्ष यांच्या मदतीने भाजपा सरकार बनवेल, असे भाकीत सुप्रसिद्ध भाषातज्ज्ञ गणेशदेवी यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.

संदीप प्रधानबडोदा : विधानसभा निवडणुकीत निर्णायक बहुमत ना भाजपाला मिळेल ना काँग्रेसला. अपक्ष, छोटे पक्ष यांच्या मदतीने भाजपा सरकार बनवेल, असे भाकीत सुप्रसिद्ध भाषातज्ज्ञ गणेशदेवी यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा पराभवाची धूळ चाखत नाहीत या मिथकाचा शेवट ही निवडणूक करेल, असा दावाही त्यांनी केला.गुजरातमधील आदिवासी व दुर्गम भागातील नष्ट होणाºया भाषांचा अभ्यास करण्यासाठी गणेशदेवींचा बडोद्यात मुक्काम असतो. निवडणुकीबाबत त्यांनी आपली रोखठोक मते व्यक्त केली. गणेशदेवी म्हणाले की, २००२नंतरच्या १५ वर्षांत गुजरातमध्ये काँग्रेसची ताकद हळूहळू वाढत आहे. महापालिका व पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही काँग्रेसला यश मिळाले. नरेंद्र मोदी यांच्या भरभराटीच्या काळात गुजरातमध्ये काँग्रेस वाढणे, हे वैशिष्ट्य आहे. मोदी पंतप्रधान झाले आणि अमित शहा यांच्याशी पटत नसल्याने आनंदीबेनना जावे लागले.गुजरातमध्ये अमित शहा व आनंदीबेन पटेल यांच्या वादातून हार्दिक पटेल या पाटीदार समाजाच्या नेत्याचा उदय झाला आहे, असा दावा गणेशदेवी यांनी केला. हार्दिकच्या मदतीखेरीज गुजरातमध्ये काँग्रेसची ताकद वाढत आहे. केंद्रात सत्तेत असल्याने दबावतंत्राचा वापर करून अपक्ष, छोटे पक्ष यांच्या मदतीने भाजपा सत्ता स्थापन करेल. मात्र अमित शहा पराभवाची धूळ चाखत नाहीत या मिथकाचा ही निवडणूक शेवट करेल. देशाच्या राजकारणाची दिशा बदलवणारी ही निवडणूक ठरेल, असे गणेशदेवी म्हणाले.राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे संकेतभावी राजकारणाचे संकेत सट्टेबाजार देत असतो. गेल्या काही दिवसांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पंतप्रधान मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी फटकून वागत आहे. सट्टाबाजार जेवढे स्पष्ट संकेत देतो तेवढेच स्पष्ट संकेत रा. स्व. संघ देतो हे विसरून चालणार नाही, अशी खोचक टिप्पणीही गणेशदेवी यांनी केली.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017BJPभाजपा