शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

नम्रता डामोर प्रकरणाची नव्याने चौकशी नाहीच

By admin | Updated: July 9, 2015 00:03 IST

मध्य प्रदेशातील बहुचर्चित व्यापमं घोटाळ्यातील कथित लाभार्थी नम्रता डामोर हिच्या मृत्यूप्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यावरून मध्यप्रदेश पोलीस बुधवारी काही

उज्जैन (मप्र.) : मध्य प्रदेशातील बहुचर्चित व्यापमं घोटाळ्यातील कथित लाभार्थी नम्रता डामोर हिच्या मृत्यूप्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यावरून मध्यप्रदेश पोलीस बुधवारी काही तासांतच घूमजाव करताना दिसले. नम्रता प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सकाळी सांगितले. मात्र यानंतर काही तासांतच असे कुठलेही आदेश नसल्याचे सांगत सपशेल घूमजाव केले.उज्जैनचे पोलीस अधीक्षक मनोहर सिंह वर्मा यांनी सकाळी पत्रकारांशी बोलताना नम्रता डामोर मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे सांगितले. तरानाचे एसडीओपी आर.के. शर्मा या प्रकरणाची नव्याने चौकशी करतील, अशी माहितीही त्यांनी दिली. मात्र संध्याकाळ होत नाही तोच, उज्जैन रेंजचे पोलीस महानिरीक्षक व्ही. मधुकुमार यांनी असे कुठलेही आदेश नसल्याचे स्पष्ट केले. नम्रता डामोर मृत्यू प्रकरणाचा पोलीस तपास पूर्ण झाला आहे. याचा अहवालही सादर करण्यात आला आहे. तेव्हा नव्याने चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. न्यायालय वा अन्य सक्षम संस्थेने आदेश दिले तरच एखाद्या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडली जाऊ शकते, अशी पुस्तीही त्यांनी जोडलीजानेवारी २०१२ रोजी उज्जैन जिल्ह्णातील रेल्वे रुळांनजीक नम्रताचा मृतदेह आढळून आला होता. नम्रताच्या मृत्यूप्रकरणी आधी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मात्र नंतर तिचा मृत्यू केवळ ‘अपघात’ असल्याचे सांगून या प्रकरणाची फाईल बंद करण्यात आली होती. व्यापमं घोटाळ्यातील कथित लाभार्थी असलेल्या नम्रताच्या मृत्यूचे प्रकरण त्यामुळेच विस्मृतीत गेले होते. मात्र गत शनिवारी व्यापमं घोटाळ्याचा तपास करणारे वृत्तवाहिनी पत्रकार अक्षय कुमार सिंग हे नम्रताच्या माता-पित्याची मुलाखत घ्यायला पोहोचले होते आणि या मुलाखतीनंतर लगेच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. अक्षयकुमार यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर नम्रताचे मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आले होते.व्यापमंचे धागेदोरे उत्तर प्रदेशापर्यंतलखनौ : मध्यप्रदेशातील व्यापमं घोटाळ्याचे तार उत्तर प्रदेशाशी जुळलेले असल्याचे तपासाअंती समोर आले आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील पाच वैद्यकीय महाविद्यालयांतील ३६ विद्यार्थ्यांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून, चार अन्य अद्यापही फरार आहेत.वकील अचानक अस्वस्थजबलपूर : मध्यप्रदेश उच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधिज्ञ आदर्शमुनी त्रिवेदी बुधवारी रहस्यमय स्थितीत आजारी पडल्याने व्यापमं प्रकरणाशी संबंधित प्रकरणाच्या सुनावणीस हजर राहू शकले नाहीत. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये बेकायदेशीर प्रवेश प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी जनयाचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर त्रिवेदी युक्तिवाद करणार होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्रिवेदींवर विषप्रयोग झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.त्रिवेदी मंगळवारी पहाटे कार्यालयात बसले. यावेळी त्यांच्यापुढे ‘मंगोडे’ (मसूद आणि चण्यापासून बनवलेला एक खाद्यपदार्थ) ठेवलेले होते. दररोजप्रमाणे ते घरून आले असावे वा एखाद्या भेटीसाठी आलेल्या व्यक्तीने आणले असावे असे समजून त्रिवेदींनी ते खाल्ले आणि त्यानंतर लगेच त्यांची प्रकृती बिघडली. (वृत्तसंस्था)या घटनेनंतर त्रिवेदींचा मुलगा आशीष त्रिवेदी याने घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. माझ्या वडिलांना नुकसान पोहोचविण्याच्या इराद्याने जाणीवपूर्वक त्यांना कुणीतरी ‘मंगोडे’खायला दिले गेल्याचा संशय असल्याचे त्याने सांगितले.