शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

वर्षभरात एकही राष्ट्रीय युवा पुरस्कार नाही; उद्दिष्टाला हरताळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 06:38 IST

केंद्रीय युवा कार्य व क्रीडा मंत्रालय। युवावर्गाचा सहभाग लाभणार कसा?

सीमा महांगडे 

मुंबई : युवा आणि किशोरवयीन मुलांच्या विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाºया राष्ट्रीय युवा पुरस्काराची संख्या यंदाच्या वर्षात शून्य असल्याचे केंद्रीय मंत्रालयाच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील माहितीवरून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर देशाच्याजडणघडणीमध्ये तरुण वर्ग किंवा युवा यांचा सहभाग कसा लाभणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

देशाच्या जडणघडणीमध्ये युथ पॉवर म्हणजे तरुणाईच्या शक्तीच्या योग्य तो वापर करून घेणे ही यंदाच्या राष्ट्रीय युवा दिनाची संकल्पना आहे. मात्र, देशाच्या तरुणाईसाठी काम करणाºया विभागाकडून किंवा त्या अंतर्गत असणाºया उपक्रमाद्वारे युवावर्गाची उपेक्षा होत असेल, तर या संकल्पनेचे उद्दिष्ट कसे साध्य होणार, हा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे.

केंद्रीय मंत्रालयाच्या युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, युवा नेतृत्वासाठी जेकार्यक्रम आयोजित केले जातात, त्यांची वर्षभरातील संख्या केवळ ३,४४५ इतकी असून, त्यामध्ये २६,२९,८८२ इतके सहभागी विद्यार्थीझाले. तर सप्टेंबर-आॅक्टोबर २०१९ मध्ये एकही युथ पार्लमेंट कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता. राष्ट्रीय सेवा योजना (नॅशनल सर्व्हिस स्कीम) म्हणजेच एनएसएसमध्ये देशभरातून केवळ वर्षभरात ३९,२५,५०० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. त्यातील ४८ हजार विद्यार्थ्यांनी देशभरात झालेल्या विविध जनजागृतीपर उपक्रमांत सहभाग नोंदविल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यावरून देशाच्याजडणघडणीत विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी राज्यस्तरावर आणि केंद्रीय स्तरावर युवामंत्रालय कमी पडत असल्याचे दिसून येते.

राष्ट्रीय युवा दलामध्ये युवा स्वयंसेवक म्हणून वर्षभरातील ६,५६५ इतक्या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून, त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मात्र, देशातील केवळ ६ हजार विद्यार्थी विविध उपक्रमांसाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा दाखवित असून, ही खेदजनक बाब या आकडेवारीवरून समोर येते.