शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

केजरीवालांच्या नव्या कॅबिनेटमध्ये बदल नाही; जुन्याच मंत्र्यांनी घेतली शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 14:21 IST

केजरीवाल यांच्यासहित 6 मंत्र्यांनी शपथ घेतली असून, ज्यात मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इमरान हुसैन, राजैन्द्र पाल गौतम यांचा समावेश आहे.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात रविवारी पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झालं. केजरीवाल यांच्यासोबत दिल्ली सरकारच्या ६ मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली. मात्र या नव्या मंत्रीमंडळात जुन्याच मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा जुनुच मंत्रीमंडळ पाहायला मिळालं.

दिल्ली विधानसभेत जुन्या मंत्र्यांनी पुन्हा एकदा मंत्रीपदाची शपथ घेतली. आम आदमी पक्षाचे सर्व कॅबिनेटमंत्री दिल्ली विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजयी झाले आहेत. आपच्या नवीन मंत्रीमंडळात नवीन चेहऱ्यांचा समावेश होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. या नव्या चेहऱ्यांमध्ये राघव चढ्ढा आणि आतिशी मार्लेना यांच्या नावांचा समावेश होता. मात्र आज झालेल्या शपथविधीत पुन्हा एकदा जुन्याच मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.

केजरीवाल यांच्यासहित 6 मंत्र्यांनी शपथ घेतली असून, ज्यात मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इमरान हुसैन, राजैन्द्र पाल गौतम यांचा समावेश आहे. सिसोदिया यांच्याकडे गेल्यावेळी उपमुख्यमंत्री पदाची जवाबदारी होती. तर 2015 मध्ये स्थापन झालेल्या केजरीवाल सरकारमध्ये सत्येंद्र जैन यांच्याकडे आरोग्य खात्याची जवाबदारी देण्यात आली होती.

त्याचबरोबर गोपाल राय यांना परिवहन, कैलाश गहलोत यांना गृहमंत्री आणि इतर महत्वाचे खाते, राजैन्द्र पाल गौतम यांनी पाणीपुरवठा आणि पर्यावरण सारखे खाते तर इमरान हुसैन यांच्याकडे अन्न पुरवठा मंत्री पदाची जवाबदारी देण्यात आली होती.