शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

पर्याय नसल्यामुळे आम्ही गांजाची लागवड करतो, हमीभावाची शेतकऱ्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 06:56 IST

गांजाची लागवड करणाऱ्यांना नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टॅन्सेस ॲक्ट, १९८५ मध्ये कठोर दंडाची तरतूद असल्याची माहिती असतानाही ग्रामस्थांनी प्रशासनापुढे ही अट ठेवली. 

मलकानगिरी (ओडिशा) : मलकानगिरी जिल्ह्यातील ग्रामस्थांनी सर्व सरकारी कल्याणकारी कार्यक्रम आमच्या वसाहतींत अमलात आणले, तर आम्ही गांजाची लागवड करणे थांबवू, असे म्हणत रस्त्यांवर निदर्शने केली. गांजाची लागवड करणाऱ्यांना नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टॅन्सेस ॲक्ट, १९८५ मध्ये कठोर दंडाची तरतूद असल्याची माहिती असतानाही ग्रामस्थांनी प्रशासनापुढे ही अट ठेवली. रालेगाडा ग्रामपंचायतींच्या ३५ खेड्यांतील सुमारे १० हजार रहिवासी गांजाची लागवड थांबवण्याची अट सांगण्यासाठी सोमवारी धुलिपूट येथे एकत्र जमले होते. त्यांनी आपल्या १९ मागण्याही यावेळी मांडल्या. “आम्हाला आमच्या कृषी उत्पादनाला प्रत्यक्ष हवा तसा भाव मिळत नाही. रालेगाडा आणि त्या परिसरातील ग्रामपंचायतीचे बहुसंख्य ग्रामस्थ हे गांजाच्या लागवडीवर अवलंबून आहेत. गांजाच्या लागवडीतून मिळणाऱ्या पैशांमुळे आम्ही आमची मुले दूर अंतरावरील ठिकाणी शिक्षणासाठी पाठवू शकतो,” असे रालेगाडाचे रहिवासी कामुलू हंताल म्हणाले.

जमिनीचे वाद सोडवावेतराष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आणि पंतप्रधान आवास योजनेखाली सगळ्या घरांना सामावून घ्यावे, वन हक्क कायद्याखाली जमिनीचे वाद सोडवावेत आणि सर्व कृषी उत्पादनांना किमान आधारभूत किमत द्यावी, अशा या आंदोलक ग्रामस्थांच्या मागण्या आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीDrugsअमली पदार्थOdishaओदिशा