शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

केंद्र सरकारशी संघर्ष करण्याचा विचार नाही; ओमर अब्दुल्ला यांचे घटक पक्ष काँग्रेसलाही स्पष्ट संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 13:48 IST

काश्मीरला त्वरित राज्याचा दर्जा त्वरित बहाल करणे, ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय मागे घेणे, अशा कृती मोदी सरकारकडून केल्या जातील, असे समजणे मूर्खपणाचे आहे, असे वक्तव्य ओमर अब्दुल्ला यांनी नुकतेच केले होते.

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आघाडीला विजय मिळाला. या आघाडीचे होऊ घातलेले मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला हे भाजपप्रणीत केंद्र सरकार, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल यांच्याशी संघर्ष करण्याच्या विचारात नाहीत. त्यांनी तसे संकेत आपला घटक पक्ष काँग्रेसलाही दिले आहेत.

काश्मीरला त्वरित राज्याचा दर्जा त्वरित बहाल करणे, ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय मागे घेणे, अशा कृती मोदी सरकारकडून केल्या जातील, असे समजणे मूर्खपणाचे आहे, असे वक्तव्य ओमर अब्दुल्ला यांनी नुकतेच केले होते. प्रचारात दिलेली आश्वासने येणाऱ्या सरकारकडून पूर्ण होणे शक्य नाही, याची कबुलीच त्यांनी या वक्तव्याद्वारे दिली असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. तसेच भाजपशी माझे सरकार संघर्ष करणार नाही, असे संकेत अब्दुल्ला यांनी या उद्गारांतून काँग्रेसला दिले आहेत.

राज्याचा दर्जा द्या- जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या ९० जागांकरिता झालेल्या निवडणुकांत काँग्रेस, अपक्ष, माकप, आपच्या आमदारांनी पाठिंबा दिला असून त्या बळावर नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत मिळाले आहे.- काश्मीरच्या विकासाकरिता आमचे सरकार केंद्राला सहकार्य करणार असल्याचे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले होते.- मात्र, जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्यात यावा, ही आपली मागणी यापुढेही मांडत राहणार असल्याचेही ते म्हणाले. 

छुप्या पाठिंब्याचे काय?विधानसभा निवडणुकांनंतर ओमर अब्दुल्ला यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल भाजपने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. भाजपला काश्मीर खोऱ्यामध्ये एकही जागा जिंकता आलेली नाही. भाजपला छुपा पाठिंबा दिल्याचा आरोप असल्याच्या गुलाम नबीआझाद, इंजिनिअर राशीद, जमात, अपक्ष यांच्यामुळे त्या पक्षाला जम्मू-काश्मीर निवडणुकांत काहीही फायदा झालेला नाही. 

भाजपने पाठराखण केलेल्यांना अपयशबंदी घातलेल्या जमातचा पुनर्प्रवेश, अभियंता राशीद यांच्या अवामी इत्तेहाद पक्षाचा उदय आणि गुलाम नबी आझाद यांच्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीच्या राजकीय हालचाली लक्षवेधी ठरल्या होत्या; पण राशीदचा भाऊ वगळता त्या व अन्य काही पक्षांचे नेते अपयशी ठरले. या सर्वांना भाजपचा पाठिंबा होता अशी चर्चा होती. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीर