शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणात मोठा अडथळा, अर्थसंकल्पात संरक्षणासाठी पुरेशी तरतूदच नाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 07:41 IST

केंद्र सरकारनं संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद न केल्यानं संसदेच्या स्थायी समितीत वरिष्ठ लष्कर अधिका-यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात किरकोळ तरतुदी केल्यानं महागाई थोड्या फार प्रमाणात कमी होईल. परंतु त्याचा संरक्षण क्षेत्राला फायदा होणार नाही.

नवी दिल्ली- केंद्र सरकारनं संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद न केल्यानं संसदेच्या स्थायी समितीत वरिष्ठ लष्कर अधिका-यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात किरकोळ तरतुदी केल्यानं महागाई थोड्या फार प्रमाणात कमी होईल. परंतु त्याचा संरक्षण क्षेत्राला फायदा होणार नाही. भारतीय लष्करी जवानांची अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि जुन्या साधनांच्यादरम्यान मोठी असमानता आहे.भारतीय लष्कराकडे सामान्यरीत्या त्यांची शस्त्रास्त्रे आणि उपकरणांमध्ये 30 टक्के स्टेट-ऑफ-द-आर्ट टेक्नोलॉजी कॅटेगरी, 40 टक्के सध्याची टेक्नॉलॉजी आणि 30 टक्के विंटेज कॅटेगरी असणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे 12 लाख जवानांहून मोठ्या असलेल्या भारतीय लष्कराजवळ 8 टक्के स्टेट ऑफ द आर्ट, 24 टक्के सध्याची टेक्नॉलॉजी आणि 68 टक्के विंटेज कॅटेगरीची शस्त्रास्त्रे उपलब्ध आहेत. दुसरीकडे भारतीय लष्कराला वारंवार पाकिस्तानकडून होणारी शस्त्रसंधी आणि घुसखोरीचा सामना करावा लागतो.गेल्या वर्षी डोकलामच्या मुद्द्यावरून चीन आणि भारतामध्येही मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी आपल्याला पाकिस्तान आणि चीन या दोन आघाड्यांवर युद्ध लढावं लागलं असतं. आता ती भीतीही तशीच आहे. संसदीय समितीत लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल म्हणाले, 2018-19च्या अर्थसंकल्पानं आम्हाला निराश केलं आहे. सध्याची स्थिती पाहता संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात केलेली तरतूर पुरेशी नाही.दुसरीकडे अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी 21,338 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लष्कराला आधीपासूनच सुरू असलेल्या त्यांच्या 125 योजनांवर खर्च करण्यासाठी 29,033 कोटींची गरज आहे. गेल्या वर्षी झालेल्या उरी हल्ला आणि 2016च्या सर्जिकल स्टाइकमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र खरेदी करावी लागतायत. जेणेकरून 10 दिवस युद्धाचे परिस्थिती उद्भवल्यास गरजेची शस्त्रास्त्रं आणि दारूगोळ्याचा साठा करून ठेवावा लागेल.