शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

पुन्हा नोटबंदी? जेटलींचं मौन आणि चर्चेला उधाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 20:47 IST

मोदी सरकारने  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यास सांगितलंय का? हा प्रश्न बुधवारी समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी राज्यसभेत विचारला.

ठळक मुद्देरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली असल्याची माहिती असून चालू आर्थिक वर्षात नव्या नोटा बाजारात आणल्या जाणार नाहीत.दोनशे आणि पाचशे रूपयांच्या पुरेशा नोटा उपलब्ध झाल्यानंतर सरकार 2 हजारांच्या नोटा बंद करू शकते असं म्हटलं जात आहे. 2 हजारांच्या नोटा बंद केल्यामुळे सामान्य जनतेला त्याचा जास्त त्रास होणार नाही. त्यानंतर दोन हजार रूपयांची साठवणूक करणा-यांवर सरकार कठोर कारवाई करू शकते अशी जोरदार चर्चा आहे. 

नवी दिल्ली, दि. 26 - मोदी सरकारने  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यास सांगितलंय का? हा प्रश्न बुधवारी समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी राज्यसभेत विचारला. दुसरीकडे कॉंग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद  यांनी 1000, 500 आणि 200 रूपयांची नवी नाणी बाजारात येणार असल्याची जोरदार चर्चा असल्याचंही म्हटलं. त्यावर विरोधी पक्षांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. मात्र, जेटलींनी यावर काहीही उत्तर देण्यापेक्षा मौन धारण केलं.  नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली असल्याची माहिती असून चालू आर्थिक वर्षात नव्या नोटा बाजारात आणल्या जाणार नाहीत. त्यामुळेच सरकार दोनशे रूपयांच्या नव्या नोटा आणणार असल्याची जोरदार चर्चा आहे. दोनशे आणि पाचशे रूपयांच्या पुरेशा नोटा उपलब्ध झाल्यानंतर सरकार 2 हजारांच्या नोटा बंद करू शकते असं म्हटलं जात आहे. 2 हजारांच्या नोटा बंद केल्यामुळे सामान्य जनतेला त्याचा जास्त त्रास होणार नाही. त्यानंतर दोन हजार रूपयांची साठवणूक करणा-यांवर सरकार कठोर कारवाई करू शकते अशी जोरदार चर्चा आहे. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार,सध्या जे प्रिंटिंग सुरु आहे त्यामध्ये 90 टक्के 500 च्या नोटांचा समावेश आहे. 500 रुपयांच्या जवळपास 14 अब्ज नोटांची छपाई आतापर्यंत पुर्ण झाली आहे. हा आकडा नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर चलनातून बाद झालेल्या 500 च्या जुन्या नोटांच्या आकड्याच्या आसपास आहे. 500 रुपयांच्या 15.7 अब्ज नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. म्हैसूरमध्ये 200 रुपयांच्या नव्या नोटांची छपाई सुरु असून पुढील महिन्यात या नोटा बाजारात येतील अशी अपेक्षा आहे. 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली असली तरी 500 च्या नोटांची छपाई सुरु आहे. त्यामुळे 2000 च्या नोटांचा तुडवडा 500 च्या नोटा भरुन काढतील असं सांगण्यात आलं आहे. 20 जुलै रोजी इकॉनॉमिक टाईम्सने देशातील काही शहरांमध्य़े 2000 च्या नोटांचा तुडवडा भासत असल्याचं वृत्त दिलं होतं. 'गेल्या 40 दिवसांपासून आरबीआयने 500 रुपयांच्या नोटांचा पुरवठा सुरु केला असल्याने दोन महिन्यांपुर्वी जाणवणारा नोटांचा तुडवडा भरुन निघाला आहे', अशी माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाचे उप-व्यवस्थापकीय संचालक निरज व्यास यांनी दिली आहे. मात्र यादरम्यान 2000 रुपयांच्या पुरवठ्यात घट झाल्याचंही निदर्शनास आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.