शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

सरकारच्या प्रस्तावात अनेक त्रुटी, अण्णांचं उपोषण लांबण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 22:05 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं उपोषण लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या प्रस्तावात अनेक त्रुटी असल्याचं अण्णांनी भेटीसाठी आलेल्या शिष्टमंडळाच्या लक्षात आणून दिलं आहे. त्यामुळे अण्णांचं उपोषण सुरूच राहणार आहे. अण्णांच्या मागण्यांवर कोणताही तोडगा न निघाल्यानं उपोषण लांबण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं उपोषण लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या प्रस्तावात अनेक त्रुटी असल्याचं अण्णांनी भेटीसाठी आलेल्या शिष्टमंडळाच्या लक्षात आणून दिलं आहे. त्यामुळे अण्णांचं उपोषण सुरूच राहणार आहे. अण्णांच्या मागण्यांवर कोणताही तोडगा न निघाल्यानं उपोषण लांबण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन अण्णांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत आहेत. अण्णा हजारे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चासुद्धा झाली आहे. केंद्रानं दिलेला प्रस्ताव गिरीश महाजनांनी अण्णा हजारेंपुढे मांडला आहे. परंतु त्या प्रस्तावात अण्णांनी ब-याच त्रुटी दाखवल्या आहेत. त्यामुळे उपोषण लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असं विधान गेल्या काही वेळापूर्वी अण्णा हजारेंनी केलं होतं. गेल्या पाच दिवसांपासून अण्णा उपोषणाला बसले आहेत. या उपोषणामुळे अण्णांचं जवळपास पाच किलो वजन घटलं आहे. सरकारकडून अद्यापही आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यानं अण्णा हजारे नाराज आहेत. सरकारकडून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असा निर्धारही अण्णांनी बोलून दाखवला आहे.आमच्या 11 मागण्या अद्यापही मान्य करण्यात आलेल्या नाहीत. 11 मागण्यांपैकी कमीत कमी चार मागण्या तरी मान्य करा. तसेच उर्वरित मागण्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही आम्हाला कालावधी निश्चित करून द्या, असंही अण्णा म्हणाले आहेत. अनेक नेते येऊन भेटत असून, आमची त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असंही अण्णांनी स्पष्ट केलं आहे. अण्णांनी उपोषण मागे घ्यावे म्हणून सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. 

२३ मार्चपासून अण्णा हजारे यांनी लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिल्लीच्या रामलीला मैदानात उपोषण सुरू केले आहे. दिल्लीत गेल्यावेळी मिळालेला तेवढा प्रतिसाद मिळत नसला तरी दिल्लीचा उन्हाळा सुरू झाला आहे. वाढत्या तापमानात अण्णांची प्रकृती जास्तच खालावली तर जनप्रक्षोभ उसळण्याची भीती आहे.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे