शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
2
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
3
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
4
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
5
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
6
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
7
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
8
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
9
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
10
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
11
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
12
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
13
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
14
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
15
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
16
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
17
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
18
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
19
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?

तत्त्वाला काही बूड आहे की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 02:45 IST

स्वातंत्र्यप्राप्तीपासून अगदी आजवर भाषाविषयक भारतीय (म्हणजे नेमके काय, हाही प्रश्नच आहे.) धोरण व त्याची कार्यवाही याबाबतीत एकूण उल्हासच आहे.

वसंत केशव पाटील, ज्येष्ठ साहित्यिक, अनुवादकार - सांगली.स्वातंत्र्यप्राप्तीपासून अगदी आजवर भाषाविषयक भारतीय (म्हणजे नेमके काय, हाही प्रश्नच आहे.) धोरण व त्याची कार्यवाही याबाबतीत एकूण उल्हासच आहे. भाषा म्हटली की, मातृभाषा, राष्ट्रभाषा, राजभाषा, कार्यालयीन भाषा, विविध माध्यमांची भाषा, ज्ञानभाषा, कूटभाषा, पोटभाषा, बोलीभाषा अशी तिची अनेक रूपे किंवा स्तर समोर येतात. भारत हा बहुभाषिक देश आहे. त्यामुळे एखाद्या भाषेला राष्ट्रभाषा म्हणत तिची सतत भलावण करणे हास्यास्पद आहे. भाषा म्हणजे अभिव्यक्ती आणि ती कशी करायची हा व्यक्तीचा अधिकार आहे. हे एवढे लक्षात घेतले तर वाद व्हायचे कारणच नाही. पण अलिकडे कुणी काय खावे आणि काय खाऊ नये, हे नेते ठरवू लागले आहेत. भाषेच्या बाबतीत तेच सुरू आहे.नेत्यांचा विषय निघाला आहे तर, महात्मा गांधी, विनोबा, नेहरू, राजेंद्रप्रसाद, काका कालेलकर, मामा वरेरकर, राजगोपालाचारी, कृपलाणी, सुब्रमण्यम भारती, राम मनोहर लोहिया, नरेंद्र देव, के. डी. मालवीय, के. एम. मुन्शी, जमनालाल बजाज, केशवचंद्र सेन, गणेश शंकर विद्यार्थी, पुरषोत्तम टंडन, दयानंद सरस्वती, भारतेंदु, माखनलाल चतुर्वेदी आदींचे भाषाविषयक विचार तरी आजच्या किती नेत्यांनी वाचले असतील याबाबत शंकाच आहे.