शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

...तर घटू शकते तुमची पेन्शन; ईपीएफओकडून नव्या फॉर्म्युल्यावर विचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 11:03 IST

सध्या अस्तित्त्वात असलेला फॉर्म्युला बदलण्याबाबत ईपीएफओकडून गांभीर्याने विचार होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: नोकरदारवर्गाच्या पगारातून ईपीएफ खात्यातील योगदानातून पेन्शनसाठी वेगळी रक्कम जमा होते. कर्मचाऱ्यांना किती पेन्शन निश्चित होणार, यासाठी सध्या अस्तित्त्वात असलेला फॉर्म्युला बदलण्याबाबत ईपीएफओकडून गांभीर्याने विचार होत आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण पेन्शनयोग्य सेवेच्या कालावधीत मिळालेल्या सरासरी पेन्शनयोग्य पगाराच्या आधारे पेन्शन निश्चित करण्याचा प्रस्ताव आहे. एकूण मोबदल्याची रक्कम आणि जोखिमांचा आढावा घेणारा 'अॅक्च्युअरी' अहवाल प्राप्त झाल्यानंतर नव्या फॉर्म्युल्याबाबत निर्णय होऊ शकतो.६.८९ लाख कोटी रुपये पेन्शन फंडमध्ये जमा होते. २०२१-२२ आर्थिक वर्षात. ५०,६१४ कोटींचे व्याज त्यातून ईपीएफओला मिळाले होते.

सध्या पेन्शन कशी ठरते?ईपीएस-१५ नियमांनुसार, नोकरीच्या अखेरच्या ६० महिन्यांचा सरासरी पगार सध्या विचारात घेतला जातो. त्यातून पेन्शनयोग्य पगार निश्चित करून पेन्शन ठरते. सरकारने नवा फॉर्म्युला स्वीकारल्यास वाढीव पेन्शन योजना स्वीकारणाऱ्यांसह सर्वांचीच सरासरी दरमहा पेन्शन घटू शकते.

... तर असे होईल नुकसान■ सध्या नोकरीतील अखेरच्या ६० महिन्यांचा पगार विचारात घेतला जातो. पूर्ण पेन्शनयोग्य पगार विचारात घेतल्यास सरासरी पेन्शनयोग्य पगार कमी होईल.■ कारण सुरुवातीच्या वर्षांमध्ये कर्मचायांना पगार कमी असतो. साहजिकच मूळ वेतन व महागाई भत्तादेखील कमी असतो. त्यामुळे सरासरी वेतन कमी निश्चित होईल. 

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीPensionनिवृत्ती वेतन