शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

...तर तिप्पट झाले असते तुमचे बजेट, महिलांची काळजी करणारे सरकार - पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 09:56 IST

"महिला सन्मानाची काळजी करणारे सरकार पहिल्यांदाच केंद्रात आले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे महिला संवाद कार्यक्रमात म्हटले."

महाराजगंज : काँग्रेसचे सरकार असते तर तुमच्या स्वयंपाकघरातील बजेट दोन-तीन पटीने वाढले असते. विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’ची मानसिकता महिलाविरोधी आहे. महिलांना आरक्षण देण्यास त्यांचा विरोध आहे. गेल्या १० वर्षांत पहिल्यांदाच माता, भगिनी व महिला सरकारी धोरणे आणि निर्णयांच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. महिला सन्मानाची काळजी करणारे सरकार पहिल्यांदाच केंद्रात आले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे महिला संवाद कार्यक्रमात म्हटले.

मोदी म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर नसते तर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातींना (एसटी) आरक्षण मिळू दिले नसते. भ्रष्टाचार, तुष्टीकरणाचे राजकारण व सनातनविरोधी विचारसरणी यांच्यासोबत इंडिया आघाडी उभी आहे आणि ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या सर्वांना मोठा धक्का बसेल, असा आरोपही पंतप्रधानांनी केला.मोदींनी आरोप केला की, “काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी मिळून देशाची ६० वर्षे उद्ध्वस्त केली आहेत. गरीब अधिक गरीब होत गेला. तुमचे मत केवळ खासदार निवडण्यासाठी नाही, तर तुमचे मत सशक्त भारतासाठी मजबूत पंतप्रधान निवडण्यासाठी आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

पहिल्या पाच टप्प्यांत भाजप ३१० जागा जिंकेल, अमित शाह यांचा दावा -लोकसभा निवडणुकांचे पाच टप्पे पूर्ण झाले असून, त्यात भाजप ३१० जागा जिंकेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केला. ओदिशाची ‘बाबू-राज’पासून मुक्तता करा, असे आवाहन त्यांनी त्या राज्याच्या जनतेला केले. संबलपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार व केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारसभेत शाह यांनी सांगितले की, लोकसभेच्या सहाव्या व सातव्या टप्प्यानंतर एनडीए ४००पेक्षा जास्त जागा जिंकण्याची शक्यता आहे. ओदिशामध्ये सरकारी अधिकारीच राज्य चालवत आहेत. ही स्थिती संपविण्यासाठी विधानसभा निवडणुकांतही भाजपला विजयी करा, असे आवाहन अमित शहा यांनी केले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीWomenमहिला