शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

"...तर आदिवासी देशद्रोही बनले असते"! मोहन भागवत यांना काय म्हणाले होते प्रणब मुखर्जी? सरसंघचालकांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 13:24 IST

मोहन भागवत यांनी दावा केला आहे की, "प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती असताना संघाच्या 'घर वापसी' कार्यक्रमाचे कौतुक केले होते आणि जर हा कार्यक्रम नसता तर काही आदिवासी समुदाय देशद्रोही बनू शकले असते, असे म्हटले होते."

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी करिअरच्या अखेरच्या टप्प्यात आपल्या राजकीय विचारांमुळे सातत्याने चर्चेत होते. ते अजूनही अनेक वेळा चर्चेत येतात. यातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांचा एक किस्सा सांगितला आहे. मोहन भागवत यांनी दावा केला आहे की, "प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती असताना संघाच्या 'घर वापसी' कार्यक्रमाचे कौतुक केले होते आणि जर हा कार्यक्रम नसता तर काही आदिवासी समुदाय देशद्रोही बनू शकले असते, असे म्हटले होते." भागवत इंदूर येथे राष्ट्रीय देवी अहिल्या पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते.  

"आदिवासी आपल्या मूळ रुपात आले, हे..." -भागवत पुढे म्हणाले, "आपण जेव्हा पहिल्यांदाच प्रणब मुखर्जी यांना भेटण्यासाठी गेलो होतो, तेव्हा संसदेत 'घर वापसी' वरून प्रचंड गदारोळ सुरू होता. तेव्हा प्रणब मुखर्जी यांनी आपल्याला विचारले होते की, आपण काही लोकांना परत आणले, तर पत्रकार परिषद का घेतली? हे राजकारण आहे आणि आपण काँग्रेसमध्ये असतो, तर आपणही संसदेत हेच केले असते. मात्र, याच वेळी,  या कार्यक्रमामुळे 30 टक्के आदिवासी समुदाय आपल्या मूळ रूपात परतला, हे चांगले आहे, असेही ते म्हणाले होते."

'धर्मांतर स्वयं प्रेरणेने झाले, तर काही वाईट नाही...' -भागवत म्हणाले, "जर धर्मांतर स्वयं प्रेरणेने झाले तर त्यात काहीही वाईट नाही. आपला विश्वास आहे की, सर्व प्रकारच्या उपासना पद्धती योग्य आहेत आणि प्रत्येकाला त्याची उपासना पद्धत निवडण्याचा अधिकार असला हवा.  मात्र, जेव्हा धर्मांतर प्रलोभन देऊन अथवा जबरदस्तीने केले जाते तेव्हा त्याचा उद्देश आध्यात्मिक प्रगती नसून प्रभाव वाढवण्यासाठी लोकांना त्यांच्या मुळांपासून तोडणे, असा असतो.

2018 मध्ये नागपूरात संघ कार्यक्रमत सहभागी झाले होते प्रणव मुखर्जी -मोहन भागवत यांचे हे विधान अतंयत महत्त्वाचे आहे. कारण प्रणव मुखर्जी २०१८ मध्ये नागपुरात संघाच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. तेव्हा याची बरीच चर्चा झाली होती. भागवतांनी त्यांच्या या निवेदनात मुखर्जी यांचे विचार नमूद केले आहेत. मात्र, प्रणव मुखर्जी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी कधीही हे विचार सार्वजनिकपणे व्यक्त केले नाहीत. पण, काही आदिवासी भागातील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी या विषयावर यापूर्वी आपले विचार व्यक्त केले होते.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतPranab Mukherjeeप्रणव मुखर्जीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHinduहिंदू