शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

... तर अख्खा देश अंधारात बुडेल; हेमंत सोरेन यांचा केंद्र सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 10:07 IST

झारखंड मुक्ती मोर्चाच्या ५३ व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित सभेत त्यांनी हा इशारा दिला आहे. 

केंद्र सरकारने झारखंडच्या वाट्याचे १.३६ लाख कोटी रुपये दिले नाहीत तर अख्खा देश अंधारात जाईल, अशी निर्वाणीचा इशारा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दिला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या ५३ व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित सभेत त्यांनी हा इशारा दिला आहे. 

राज्याचा पैसा मिळण्यासाठी सध्या पत्रव्यवहार सुरु आहे. संदेशही पाठविलेला आहे. आमच्या हक्काचा पैसा दिला नाही तर केंद्र सरकारविरोधात आम्ही कायदेशीर लढाई लढणार आहोत. याचबरोबर कोळसा खाणी देखील बंद करू. यामुळे संपूर्ण देश अंधारात बुडेल. केंद्र सरकारकडून सापत्न वागणूक आता झारखंड सहन करणार नाही, असा इशाराच सोरेन यांनी दिला आहे. 

काही दिवसांपूर्वी कोळसा मंत्री झारखंडमध्ये आले होते. त्यांच्याशी चर्चा झाली. झारखंडमध्ये जमिनीचा दर जास्त आहे, तो कमी केला पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. यावर मी त्यांना खडसावले, जमीन आमची आहे तर आम्हाला जेवढा दर वाटेल तेवढाच राहिल. कोळसा कंपन्यांनी ज्या खाणींमधून उत्खनन बंद केले आहे त्या जमिनी मालकांना परत द्याव्यात, अशीही मागणी केल्याचे सोरेन म्हणाले. 

या जमिनी परत दिल्या नाहीत तर आम्ही त्या जमिनींवर कब्जा करू, केंद्राने अर्थसंकल्पात झारखंडला काही दिलेले नाही. मनरेगाची रक्कम कमी केली आहे. ५० लाख कोटींच्या बजेटमध्ये केंद्राला १२ लाख कोटी रुपये व्याजासह परत करावे लागणार आहेत, अशी टीकाही सोरेन यांनी केली. 

कोळसा क्षेत्रात उत्खनन करणाऱ्या आउटसोर्सिंग कंपन्या कोळशाची लूट करत आहेत. स्थानिकांना रोजगार दिला जात नाही. इतर राज्यातील लोक काम करत आहेत आणि स्वतःला झारखंडचे मालक मानत आहेत, अशी टीका मंत्री हाफिजुल हसन यांनी केली. 

टॅग्स :JharkhandझारखंडNarendra Modiनरेंद्र मोदीelectricityवीज