शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
9
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
10
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
11
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
12
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
13
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
14
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
15
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
16
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
17
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
18
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
19
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
20
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 05:46 IST

दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवा अन्यथा ‘ऑपरेशन सिंदूर’च्यावेळी दाखवला तसा संयम पुढच्या वेळी दाखवणार नाही!

अनुपगड/जयपूर : जर पाकिस्तानला जागतिक नकाशावर टिकून राहायचे असेल, तर त्याने आपल्या भूमीवरून दहशतवाद्यांना आश्रय व पाठिंबा देणे थांबवले पाहिजे, असे खडेबोल भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शुक्रवारी पाकिस्तानला सुनावले. ‘ऑपरेशन सिंदूर १’ दरम्यान भारताने दाखवलेला संयम पुढच्या वेळी दाखवला जाणार नाही. भारतीय जवानांनो पूर्णपणे सज्ज राहा, ईश्वराची इच्छा असेल तर लवकरच संधी येईल, असेही सूचक उद्गार द्विवेदी यांनी काढले.

राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यातील अनुपगड येथे भारतीय लष्कराच्या जवानांशी संवाद साधताना द्विवेदी म्हणाले की, पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी तळांचे पुरावे भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान साऱ्या जगासमोर मांडले. भारताने ही वस्तुस्थिती उघड केली. अन्यथा पाकिस्तानने या गोष्टी दडवून ठेवल्या असत्या, असे जनरल द्विवेदी म्हणाले. 

‘आव्हाने पेलण्यास जवानांबरोबर नागरिकही सज्ज’लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की, सीमावर्ती भागात राहणारे लोक हे देखील सैनिकच आहेत. ते लोक सैन्याच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत. देशासमोर उभी ठाकणारी सर्व आव्हाने पेलण्यास लष्कराबरोबर भारतीय नागरिकही सज्ज आहेत. 

अखंडतेसाठी कोणत्याही सीमा ओलांडू शकतो भारत हैदराबाद : २०१६ सालचा सर्जिकल स्ट्राइक, २०१९ सालचा बालाकोट हवाई हल्ला आणि नुकतेच झालेले ‘ऑपरेशन सिंदूर’ अशा घटनांतून देशाची एकता व अखंडता अबाधित राखण्यासाठी भारत कोणत्याही सीमा ओलांडू शकतो, असे एनडीए सरकारने दाखवून दिल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी येथे केले. 

पाकची १२ लष्करी विमाने पाडली : हवाई दलप्रमुखनवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय हवाई दलाच्या कारवाईत पाकिस्तानची एफ-१६सह किमान १२ लष्करी विमाने भारताने पाडली, किंवा त्या विमानांची मोठी हानी झाली असल्याची माहिती हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी शुक्रवारी दिली. 

भारतीय विमाने पाडल्याचे पाकिस्तानचे दावे खोटे आहेत. जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते दाखवावेत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. ए. पी. सिंग यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये पाकिस्तानातील लष्करी ठाणी, हवाई तळांचे मोठे नुकसान झाले. 

ऑपरेशन सिंदूरनंतर विविध दहशतवादी गटांनी खैबर पख्तुनख्वा प्रांतात आपले तळ हलविले. भारतीय हवाई दलाकडे अशा तळांवर अचूक हल्ला करण्याची पूर्ण क्षमता आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये एस-४०० एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिमने उत्तम कामगिरी केली, असेही ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan will vanish if it harbors terrorists: Indian Army Chief.

Web Summary : Army Chief General Dwivedi warned Pakistan to stop harboring terrorists or face consequences. India's resolve is firm, demonstrated by past actions. Air Force reports significant damage to Pakistani military assets during Operation Sindoor. Defence Minister Rajnath Singh affirmed India's commitment to national integrity.
टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तान