शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
2
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
3
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
5
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
6
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
7
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
9
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
10
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
11
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
12
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
13
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
14
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
15
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
16
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
17
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
18
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
19
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 05:46 IST

दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवा अन्यथा ‘ऑपरेशन सिंदूर’च्यावेळी दाखवला तसा संयम पुढच्या वेळी दाखवणार नाही!

अनुपगड/जयपूर : जर पाकिस्तानला जागतिक नकाशावर टिकून राहायचे असेल, तर त्याने आपल्या भूमीवरून दहशतवाद्यांना आश्रय व पाठिंबा देणे थांबवले पाहिजे, असे खडेबोल भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शुक्रवारी पाकिस्तानला सुनावले. ‘ऑपरेशन सिंदूर १’ दरम्यान भारताने दाखवलेला संयम पुढच्या वेळी दाखवला जाणार नाही. भारतीय जवानांनो पूर्णपणे सज्ज राहा, ईश्वराची इच्छा असेल तर लवकरच संधी येईल, असेही सूचक उद्गार द्विवेदी यांनी काढले.

राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यातील अनुपगड येथे भारतीय लष्कराच्या जवानांशी संवाद साधताना द्विवेदी म्हणाले की, पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी तळांचे पुरावे भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान साऱ्या जगासमोर मांडले. भारताने ही वस्तुस्थिती उघड केली. अन्यथा पाकिस्तानने या गोष्टी दडवून ठेवल्या असत्या, असे जनरल द्विवेदी म्हणाले. 

‘आव्हाने पेलण्यास जवानांबरोबर नागरिकही सज्ज’लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की, सीमावर्ती भागात राहणारे लोक हे देखील सैनिकच आहेत. ते लोक सैन्याच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत. देशासमोर उभी ठाकणारी सर्व आव्हाने पेलण्यास लष्कराबरोबर भारतीय नागरिकही सज्ज आहेत. 

अखंडतेसाठी कोणत्याही सीमा ओलांडू शकतो भारत हैदराबाद : २०१६ सालचा सर्जिकल स्ट्राइक, २०१९ सालचा बालाकोट हवाई हल्ला आणि नुकतेच झालेले ‘ऑपरेशन सिंदूर’ अशा घटनांतून देशाची एकता व अखंडता अबाधित राखण्यासाठी भारत कोणत्याही सीमा ओलांडू शकतो, असे एनडीए सरकारने दाखवून दिल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी येथे केले. 

पाकची १२ लष्करी विमाने पाडली : हवाई दलप्रमुखनवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय हवाई दलाच्या कारवाईत पाकिस्तानची एफ-१६सह किमान १२ लष्करी विमाने भारताने पाडली, किंवा त्या विमानांची मोठी हानी झाली असल्याची माहिती हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी शुक्रवारी दिली. 

भारतीय विमाने पाडल्याचे पाकिस्तानचे दावे खोटे आहेत. जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते दाखवावेत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. ए. पी. सिंग यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये पाकिस्तानातील लष्करी ठाणी, हवाई तळांचे मोठे नुकसान झाले. 

ऑपरेशन सिंदूरनंतर विविध दहशतवादी गटांनी खैबर पख्तुनख्वा प्रांतात आपले तळ हलविले. भारतीय हवाई दलाकडे अशा तळांवर अचूक हल्ला करण्याची पूर्ण क्षमता आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये एस-४०० एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिमने उत्तम कामगिरी केली, असेही ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan will vanish if it harbors terrorists: Indian Army Chief.

Web Summary : Army Chief General Dwivedi warned Pakistan to stop harboring terrorists or face consequences. India's resolve is firm, demonstrated by past actions. Air Force reports significant damage to Pakistani military assets during Operation Sindoor. Defence Minister Rajnath Singh affirmed India's commitment to national integrity.
टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तान