शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

...तर देशातील प्रत्येकाला नाही द्यावी लागणार कोरोनावरील लस, आयसीएमआरचं मोठं विधान

By बाळकृष्ण परब | Updated: December 1, 2020 18:24 IST

coronavirus News : कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यानंतर ती देशातील किती नागरिकांना आणि कधी दिली जाईल असी विचारणा केली जात आहे.

ठळक मुद्देकोरोनावरील लसीकरण हे लस कितपत प्रभावी आहे त्यावर अवलंबून असेलकोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडणे हे आमच्ये लक्ष्य आहे धोका असलेल्या अधिकाधिक लोकांचे लसीकरण करून कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यात यशस्वी ठरलो तर कदाचित आम्हाला देशातील संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करावे लागणार नाही

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गाने देशासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि देशातील जनतेला कोरोनावरील लस उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यानंतर ती देशातील किती नागरिकांना आणि कधी दिली जाईल असी विचारणा केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आयसीएमआरने आज कोरोनाची लस आणि लसीकरणाबाबत मोठं विधान केलं आहे.कोरोनावरील लस ही देशातील प्रत्येक नागरिकाला द्यावी लागणार नाही, असे आयसीएमआरने म्हटले आहे. याबाबत माहिती देताना आयसीएमआरने सांगितले की, कोरोनावरील लसीकरण हे लस कितपत प्रभावी आहे त्यावर अवलंबून असेल. कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडणे हे आमच्ये लक्ष्य आहे. जर आम्ही धोका असलेल्या अधिकाधिक लोकांचे लसीकरण करून कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यात यशस्वी ठरलो तर कदाचित आम्हाला देशातील संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करावे लागणार नाही.

याबाबत आरोग्य सचिवांनी सांगितले की, केंद्र सरकारने संपूर्ण देशात लसीकरण करण्याचा दावा कधीही केलेला नाही. अशा शास्त्रीय गोष्टींबाबत तथ्थ्यांच्या आधारावर बोलले गेले पाहिजे, असे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले. कोरोना लसीची वैद्यकीय चाचणी ही बहुकेंद्रित आणि अनेक ठिकाणी होते. प्रत्येक ठिकाणी एक इंस्टिट्युशन इथिक्स कमिटी असते. ती सरकार आणि उत्पादकांपासून स्वायत्त असते. लसीच्या कुठल्याही वाईट परिणामानंतर ही समिती दखल घेते आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला याचा अहवाल पाठवते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, गेल्या २४ तासांत भारतामध्ये कोरोनाचे ३१ हजार ११८ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९४ लाख ६२ हजार ८०९ एवढी झाली आहे. तर दिवसभरात ४८२ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढून १ लाख ३७ हजार ६२१ झाला आहे. देशा आतापर्यंत ८८ लाख ८९ हजार ५८५ जणांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवलं आहे. देशाचा रिकव्हरी रेट हा ९३.९४ एवढा झाला आहे. तर मृत्यूदर हा १.४५ टक्के आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य