शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

...तर देशातील प्रत्येकाला नाही द्यावी लागणार कोरोनावरील लस, आयसीएमआरचं मोठं विधान

By बाळकृष्ण परब | Updated: December 1, 2020 18:24 IST

coronavirus News : कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यानंतर ती देशातील किती नागरिकांना आणि कधी दिली जाईल असी विचारणा केली जात आहे.

ठळक मुद्देकोरोनावरील लसीकरण हे लस कितपत प्रभावी आहे त्यावर अवलंबून असेलकोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडणे हे आमच्ये लक्ष्य आहे धोका असलेल्या अधिकाधिक लोकांचे लसीकरण करून कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यात यशस्वी ठरलो तर कदाचित आम्हाला देशातील संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करावे लागणार नाही

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गाने देशासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि देशातील जनतेला कोरोनावरील लस उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यानंतर ती देशातील किती नागरिकांना आणि कधी दिली जाईल असी विचारणा केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आयसीएमआरने आज कोरोनाची लस आणि लसीकरणाबाबत मोठं विधान केलं आहे.कोरोनावरील लस ही देशातील प्रत्येक नागरिकाला द्यावी लागणार नाही, असे आयसीएमआरने म्हटले आहे. याबाबत माहिती देताना आयसीएमआरने सांगितले की, कोरोनावरील लसीकरण हे लस कितपत प्रभावी आहे त्यावर अवलंबून असेल. कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडणे हे आमच्ये लक्ष्य आहे. जर आम्ही धोका असलेल्या अधिकाधिक लोकांचे लसीकरण करून कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यात यशस्वी ठरलो तर कदाचित आम्हाला देशातील संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करावे लागणार नाही.

याबाबत आरोग्य सचिवांनी सांगितले की, केंद्र सरकारने संपूर्ण देशात लसीकरण करण्याचा दावा कधीही केलेला नाही. अशा शास्त्रीय गोष्टींबाबत तथ्थ्यांच्या आधारावर बोलले गेले पाहिजे, असे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले. कोरोना लसीची वैद्यकीय चाचणी ही बहुकेंद्रित आणि अनेक ठिकाणी होते. प्रत्येक ठिकाणी एक इंस्टिट्युशन इथिक्स कमिटी असते. ती सरकार आणि उत्पादकांपासून स्वायत्त असते. लसीच्या कुठल्याही वाईट परिणामानंतर ही समिती दखल घेते आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला याचा अहवाल पाठवते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, गेल्या २४ तासांत भारतामध्ये कोरोनाचे ३१ हजार ११८ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९४ लाख ६२ हजार ८०९ एवढी झाली आहे. तर दिवसभरात ४८२ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढून १ लाख ३७ हजार ६२१ झाला आहे. देशा आतापर्यंत ८८ लाख ८९ हजार ५८५ जणांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवलं आहे. देशाचा रिकव्हरी रेट हा ९३.९४ एवढा झाला आहे. तर मृत्यूदर हा १.४५ टक्के आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य