शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय : स्वबळ वाढले, तरच काँग्रेसला २०१९च्या निवडणुका समर्थपणे लढविता येतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 09:21 IST

गठबंधन व महागठबंधन यांची भाषा बरीच बोलून झाली, पण त्यात सहभागी होण्याची शक्यता असलेले कुणीही आपल्या दाराचा उंबरठा ओलांडून बाहेर येताना दिसत नाहीत. त्यांच्यापैकी काहींची मोदींविषयीची भाषा बदललेली वा मूक झालेलीही दिसत आहे.

मायावतीनी तोंड फिरविले आहे. अखिलेशचे तोंड अजून उघडले नाही. चंद्रशेखर राव यांनी शिवीगाळ केली आहे. चंद्राबाबूंची बाजू उघड व्हायची आहे. डाव्यांचे हटवादीपण पूर्वीही अधिक कडवे आणि काँग्रेसविरोधी बनले आहे. नवीन पटनायक त्यांचे पत्ते अजून कुणाला दाखवित नाहीत आणि नितीशकुमार सरळसरळ भाजपात गेलेच आहे. ‘आप’चे बारके स्वरूप, तसेच पण अधिक कडक होताना दिसत आहेत. ममता बॅनर्जींना कुणीतरी त्यांच्या पक्षाचा दरवाजा ठोठावील, याची वाट आहे. जोगींनी पक्षांतर केले आहे. मुलायमांना महत्त्व नाही आणि शरद पवार अविश्वसनीय आहे. या स्थितीत लालूप्रसाद यादवांचा राष्ट्रीय जनता दल आणि स्टॅलिनचा द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन पक्षांखेरीज काँँग्रेससोबत जायला आज तरी दुसरा पक्ष सरळपणे तयार असल्याचे दिसत नाही. निवडणुकांना काही महिन्यांचा अवधी उरला असतानाची भाजपाविरोधकांची देशातील ही स्थिती आहे. गठबंधन व महागठबंधन यांची भाषा बरीच बोलून झाली, पण त्यात सहभागी होण्याची शक्यता असलेले कुणीही आपल्या दाराचा उंबरठा ओलांडून बाहेर येताना दिसत नाहीत. त्यांच्यापैकी काहींची मोदींविषयीची भाषा बदललेली वा मूक झालेलीही दिसत आहे. देशात एवढे प्रश्न आहेत, अर्थव्यवस्था कोसळली आहे, सेन्सेक्स हजारोंनी कोसळला आहे, बँका बुडाल्या आहेत, बेरोजगारी वाढली आहे आणि महागाई आकाशाला भिडली आहे, शिवाय घोटाळे आहेत.

राफेल घोटाळ्याची व्याप्ती वा आकार एवढा की, त्याने आजवरचे सारे घोटाळे लहान ठरवून मागे टाकले आहेत, पण त्यावर भाष्ये नाहीत. एकटे राहुल गांधी, खरगे, मनमोहन सिंग वा त्यांचे सहकारी सोडले, तर बाकीचे पुढारी देशात जणूकाही सारे ‘आॅलवेल’ असल्याच्या थाटात आहेत. या स्थितीत देश चार राज्यांतील निवडणुकांना लगेच व लोकसभेच्या निवडणुकीला काही महिन्यांत तोंड देत आहेत. भाजपाला संघटित विरोध झाला, तर त्याचा पराभव होऊ शकतो, असे सारे म्हणतात, पण ते संघटित होताना मात्र दिसत नाहीत. आपापले बळ आजमावून पाहण्याची व तसे करताना आपटी खाण्याची तयारी केलेलीच ती साऱ्यांना दिसत आहे. परिणामी, देशात समस्या वाढत असताना, त्याची काळजी करण्याऐवजी भाजपाचे पुढारी व मंत्री विरोधकांच्या न होणा-या ऐक्यामुळे आनंदात आहेत. मात्र, हा आत्मशक्तीच्या परीक्षेचा प्रकार नसून आत्महत्येचा प्रकार आहे. एक-एकटे मरणार आणि संघटना केली, तरच तरणार, अशी विरोधकांची स्थिती असल्याचे सगळ्या आकडेशास्त्र्यांचे व जाणकारांचे म्हणणे आहे. २०१४ च्या निवडणुकीत आपण निवडून येणार नाही, असे वाटल्यामुळेच आम्ही देशाला भरमसाठ आश्वासने दिली व आता ती पूर्ण होत नाहीत, असे एका ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्याने परवा म्हटले. ती खरोखरच पूर्ण होणार नाहीत. बुलेट ट्रेन वेळेत धावणार नाही, मेट्रोचे सांगाडे पूर्ण होणार नाहीत आणि नागपूरच्या नागनदीतून जहाजेही चालणार नाहीत. उद्योग बंद व्हायचे थांबत नाहीत, मिहानचे मढे जिवंत होत नाहीत, कारखाने येत नाहीत, म्हणून रामदेवबाबाला सौंदर्य प्रसाधने बनविण्यासाठी जागा द्यायला सरकारही थांबत नाही. मग या चार वर्षांत झाले काय? राममंदिर राहिले, गंगा व यमुनेतही अनेक जागी तीन-तीन फूट पाणी शिल्लक राहिले, हिवाळा आला, तरी पाण्यात शोध सुरू आहे आणि उन्हाळा दूर असतानाच विजेच्या पुरवठ्यात कपात होत आहे. मोठे घोटाळे थांबले नाहीत. विरोधक एक होत नसतील आणि स्थिती अशीच राहत असेल, तर मग राहुल गांधी आणि काँग्रेस यांनाच त्यांचे बळ वाढविणे भाग आहे. ते बळ त्यांना परवा गांधीजींनी दिल्याचे दिसले आहे. ही स्थिती ‘एकला चलो’ असे सांगणारी आहे. तुम्ही याल, तर तुमच्यासोबत नाही, तर तुमच्याशिवाय असे म्हणत पुढे जाण्याची व भाजपाला स्वबळावर तोंड देण्याची स्थिती सांगणारी ही बाब आहे. वर्षभरात काँग्रेसने बराच उत्साह जोडला आहे. त्या पक्षात नवी माणसेही आली आहेत. हे बळ वाढले, तरच २०१९च्या निवडणुका त्याला समर्थपणे लढविता येणे शक्य होणार आहे.भाजपाला संघटित विरोध झाला, तर त्याचा पराभव होऊ शकतो, असे सारे म्हणतात, पण ते संघटित होताना मात्र दिसत नाहीत. आपापले बळ आजमावून पाहण्याची व आपटी खाण्याची तयारी केलेलीच साºयांना दिसत आहे.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीmayawatiमायावतीRahul Gandhiराहुल गांधी