शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

संपादकीय : स्वबळ वाढले, तरच काँग्रेसला २०१९च्या निवडणुका समर्थपणे लढविता येतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 09:21 IST

गठबंधन व महागठबंधन यांची भाषा बरीच बोलून झाली, पण त्यात सहभागी होण्याची शक्यता असलेले कुणीही आपल्या दाराचा उंबरठा ओलांडून बाहेर येताना दिसत नाहीत. त्यांच्यापैकी काहींची मोदींविषयीची भाषा बदललेली वा मूक झालेलीही दिसत आहे.

मायावतीनी तोंड फिरविले आहे. अखिलेशचे तोंड अजून उघडले नाही. चंद्रशेखर राव यांनी शिवीगाळ केली आहे. चंद्राबाबूंची बाजू उघड व्हायची आहे. डाव्यांचे हटवादीपण पूर्वीही अधिक कडवे आणि काँग्रेसविरोधी बनले आहे. नवीन पटनायक त्यांचे पत्ते अजून कुणाला दाखवित नाहीत आणि नितीशकुमार सरळसरळ भाजपात गेलेच आहे. ‘आप’चे बारके स्वरूप, तसेच पण अधिक कडक होताना दिसत आहेत. ममता बॅनर्जींना कुणीतरी त्यांच्या पक्षाचा दरवाजा ठोठावील, याची वाट आहे. जोगींनी पक्षांतर केले आहे. मुलायमांना महत्त्व नाही आणि शरद पवार अविश्वसनीय आहे. या स्थितीत लालूप्रसाद यादवांचा राष्ट्रीय जनता दल आणि स्टॅलिनचा द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन पक्षांखेरीज काँँग्रेससोबत जायला आज तरी दुसरा पक्ष सरळपणे तयार असल्याचे दिसत नाही. निवडणुकांना काही महिन्यांचा अवधी उरला असतानाची भाजपाविरोधकांची देशातील ही स्थिती आहे. गठबंधन व महागठबंधन यांची भाषा बरीच बोलून झाली, पण त्यात सहभागी होण्याची शक्यता असलेले कुणीही आपल्या दाराचा उंबरठा ओलांडून बाहेर येताना दिसत नाहीत. त्यांच्यापैकी काहींची मोदींविषयीची भाषा बदललेली वा मूक झालेलीही दिसत आहे. देशात एवढे प्रश्न आहेत, अर्थव्यवस्था कोसळली आहे, सेन्सेक्स हजारोंनी कोसळला आहे, बँका बुडाल्या आहेत, बेरोजगारी वाढली आहे आणि महागाई आकाशाला भिडली आहे, शिवाय घोटाळे आहेत.

राफेल घोटाळ्याची व्याप्ती वा आकार एवढा की, त्याने आजवरचे सारे घोटाळे लहान ठरवून मागे टाकले आहेत, पण त्यावर भाष्ये नाहीत. एकटे राहुल गांधी, खरगे, मनमोहन सिंग वा त्यांचे सहकारी सोडले, तर बाकीचे पुढारी देशात जणूकाही सारे ‘आॅलवेल’ असल्याच्या थाटात आहेत. या स्थितीत देश चार राज्यांतील निवडणुकांना लगेच व लोकसभेच्या निवडणुकीला काही महिन्यांत तोंड देत आहेत. भाजपाला संघटित विरोध झाला, तर त्याचा पराभव होऊ शकतो, असे सारे म्हणतात, पण ते संघटित होताना मात्र दिसत नाहीत. आपापले बळ आजमावून पाहण्याची व तसे करताना आपटी खाण्याची तयारी केलेलीच ती साऱ्यांना दिसत आहे. परिणामी, देशात समस्या वाढत असताना, त्याची काळजी करण्याऐवजी भाजपाचे पुढारी व मंत्री विरोधकांच्या न होणा-या ऐक्यामुळे आनंदात आहेत. मात्र, हा आत्मशक्तीच्या परीक्षेचा प्रकार नसून आत्महत्येचा प्रकार आहे. एक-एकटे मरणार आणि संघटना केली, तरच तरणार, अशी विरोधकांची स्थिती असल्याचे सगळ्या आकडेशास्त्र्यांचे व जाणकारांचे म्हणणे आहे. २०१४ च्या निवडणुकीत आपण निवडून येणार नाही, असे वाटल्यामुळेच आम्ही देशाला भरमसाठ आश्वासने दिली व आता ती पूर्ण होत नाहीत, असे एका ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्याने परवा म्हटले. ती खरोखरच पूर्ण होणार नाहीत. बुलेट ट्रेन वेळेत धावणार नाही, मेट्रोचे सांगाडे पूर्ण होणार नाहीत आणि नागपूरच्या नागनदीतून जहाजेही चालणार नाहीत. उद्योग बंद व्हायचे थांबत नाहीत, मिहानचे मढे जिवंत होत नाहीत, कारखाने येत नाहीत, म्हणून रामदेवबाबाला सौंदर्य प्रसाधने बनविण्यासाठी जागा द्यायला सरकारही थांबत नाही. मग या चार वर्षांत झाले काय? राममंदिर राहिले, गंगा व यमुनेतही अनेक जागी तीन-तीन फूट पाणी शिल्लक राहिले, हिवाळा आला, तरी पाण्यात शोध सुरू आहे आणि उन्हाळा दूर असतानाच विजेच्या पुरवठ्यात कपात होत आहे. मोठे घोटाळे थांबले नाहीत. विरोधक एक होत नसतील आणि स्थिती अशीच राहत असेल, तर मग राहुल गांधी आणि काँग्रेस यांनाच त्यांचे बळ वाढविणे भाग आहे. ते बळ त्यांना परवा गांधीजींनी दिल्याचे दिसले आहे. ही स्थिती ‘एकला चलो’ असे सांगणारी आहे. तुम्ही याल, तर तुमच्यासोबत नाही, तर तुमच्याशिवाय असे म्हणत पुढे जाण्याची व भाजपाला स्वबळावर तोंड देण्याची स्थिती सांगणारी ही बाब आहे. वर्षभरात काँग्रेसने बराच उत्साह जोडला आहे. त्या पक्षात नवी माणसेही आली आहेत. हे बळ वाढले, तरच २०१९च्या निवडणुका त्याला समर्थपणे लढविता येणे शक्य होणार आहे.भाजपाला संघटित विरोध झाला, तर त्याचा पराभव होऊ शकतो, असे सारे म्हणतात, पण ते संघटित होताना मात्र दिसत नाहीत. आपापले बळ आजमावून पाहण्याची व आपटी खाण्याची तयारी केलेलीच साºयांना दिसत आहे.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीmayawatiमायावतीRahul Gandhiराहुल गांधी