शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

...तर धर्माच्या आधारावर देशाचं विभाजन होण्याचा धोका; खासदार असदुद्दीन ओवैसींचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 18:59 IST

तसेच एमआयएम भारतातील धर्मनिरपेक्षता आणि संविधानासाठी लढाई लढत आहे.

हैदराबाद - एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. देशभरात एनआरसी लागू केल्यानंतर मुस्लिमांचे नागरिकत्व बादशाह सलामत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इच्छेवर निर्भर असणार आहे. त्यामुळे एनआरसी लागू केल्यानंतर त्याचे गंभीर परिणाम घडू शकतात असं त्यांनी सांगितले आहे. मात्र यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी संपूर्ण देशात एनआरसी लागू करणार असं सांगितले आहे. 

ओवैसी यांनी ट्विट करुन सांगितले आहे की, एनआरसीसाठी कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास मुस्लिमांना गैर भारतीय मानलं जाईल. मग तेव्हा नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी जर आपली कागदपत्रे मोदींना योग्य वाटली तरच ते मान्य होईल. त्यामुळे जर एनआरसी लागू झाली तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील असा दावा ओवैसींनी केला आहे. 

तर मुसलमानांचे नागरिकत्व धोक्यात जर देशात एनआरसी लागू करण्यात आली त्यात उदाहरण म्हणून समजा, कोणत्याही मुस्लीम आणि गैरमुस्लीम यांचे नाव एनआरसी यादीत आलं नाही. तर गैरमुस्लिमांना सुधारित नागरिकत्व कायद्यांतर्गत नागरिकत्व मिळू शकते. पण मुसलमानांना तो अधिकार नाही. त्यामुळे सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे अशी माहिती खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी दिली. 

तसेच एमआयएम भारतातील धर्मनिरपेक्षता आणि संविधानासाठी लढाई लढत आहे. प्रत्येक पातळीवर संविधानिक आयुधं वापरून आम्ही ही लढाई लढणार आहोत. सरकारला हा कायदा लागू करुन देशात मुस्लिमांना राष्ट्रविरहित बनवायचे आहे. देशाला धर्माच्या नावावर विभाजन करायचं आहे असा आरोप असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर केला.  

दरम्यान, अमित शहा म्हणाले की, सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे देशातील कोणत्याही अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तीवर परिणाम होणार नाही असं स्पष्ट करतो. कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही. काँग्रेसला सांगू इच्छितो की, हे नेहरु आणि लियाकत यांच्यातील कराराचा भाग आहे. मागील ७० वर्षापासून याला लागू करण्यात आलं नाही कारण काँग्रेसला धर्माचं राजकारण करायचं होतं. आमच्या सरकारने हे लागू केलं अन् लाखो, कोट्यावधी लोकांना नागरिकत्व दिलं असं त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन