शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

..तर बळीराजा आत्मनिर्भर बनेल - संचेती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 03:58 IST

१९३६ साली आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते. त्या साली दुष्काळ पडला होता. त्यावेळी गावोगावी फिरून माल खरेदी करणे अडचणीचे होते

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्याच्या हिताकरिता गेल्या आठवड्यात काही ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. त्यानुसार पिकविलेला शेतमाल जो चांगल्यात चांगली किंमत देईल, अशा कोणालाही देशात कुठेही विकण्याची मुभा शेतकऱ्यांना राहणार आहे. या निर्णयामुळे ते परवानाराजमधून मुक्त होतील. शेतकºयांचा अनावश्यक खर्च वाचेल, वितरण व्यवस्था मजबूत होईल, कृषिक्षेत्रात गुंतवणूक वाढेल, एक देश एक मार्केट भावना वाढेल, कृषी उत्पादनावर सेस राहणार नाही, असा विश्वास आहे.

१९३६ साली आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते. त्या साली दुष्काळ पडला होता. त्यावेळी गावोगावी फिरून माल खरेदी करणे अडचणीचे होते. त्यासाठी बाजार समित्या तयार करण्यात आल्या. त्यावेळच्या व आताच्या परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे. परंतु कायदा तोच राहिला.जुन्या काळात शेतकºयाची फसवणूक होऊ नये या हेतूने कायदे केले गेले. त्यावेळी हातदांडीचे साखळीचे काटे होते, आता इलेक्ट्रिक काटे आले आहेत. त्यामुळे आज विचार केला तर शेतकºयाचे रक्षण होते का, अपवाद सोडला तर याचे उत्तर नकारार्थी येईल. सेस रद्द करण्याबाबत मागील सरकारबरोबर चर्चा झाली होती.महाराष्ट्रातील सेस रद्द केल्यास ३०० ते ३५० कोटी रुपयांचा भार शासनावर पडेल. अर्थसंकल्पाच्या मानाने ते नगण्य आहे. त्याची भरपाई जीएसटीमधून शासनास करता येईल, असा विश्वास आहे. बाजार समितीच्या कायद्यात बदल करण्याची जुनी मागणी होती त्यास केंद्राने प्रतिसाद दिला. या बदलांचा या घटकांना निश्चितच फायदा होईल. कायद्यात बदल झाल्यास भीती दाखविली जाते. व्यापाºयाने शेतकºयाचे पैसे बुडविले तर काय? पैसे बुडण्याचे काही कारण नाही. शेतकºयाने मालाचे पैसे बंद रोख घ्यावेत. मग बुडविण्याचा प्रश्नच येत नाही. कृषिमालाचा व्यापार करणारे व्यापारी हे फसवणूक करणारे आहेत ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. आपण फ्री इकॉनॉमी मान्य केली आहे, कुठल्याही व्यवसायावर बंधन नाही मग फक्त कृषिमालाचे व्यापारावरच बंधन का याचा देखील यानिमित्ताने विचार होणे अतिशय गरजेचे आहे.केंद्र सरकारने शेतकºयांना त्यांचे उत्पादन कोठेही विकण्याची मुभा एका वटहुकुमाव्दारे नुकतीच दिली आहे. त्यामुळे शेतकरी, कृ षी उत्पन्न बाजार समितीसह या क्षेत्राशी संबंधित घटकांवर काय परिणाम होऊ शकतात याचा घेतलेला आढावा...

टॅग्स :Farmerशेतकरी