शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
6
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
7
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
8
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
9
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
10
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
11
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
12
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
13
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
14
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
15
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
16
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
18
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
19
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
20
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद

..तर बळीराजा आत्मनिर्भर बनेल - संचेती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 03:58 IST

१९३६ साली आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते. त्या साली दुष्काळ पडला होता. त्यावेळी गावोगावी फिरून माल खरेदी करणे अडचणीचे होते

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्याच्या हिताकरिता गेल्या आठवड्यात काही ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. त्यानुसार पिकविलेला शेतमाल जो चांगल्यात चांगली किंमत देईल, अशा कोणालाही देशात कुठेही विकण्याची मुभा शेतकऱ्यांना राहणार आहे. या निर्णयामुळे ते परवानाराजमधून मुक्त होतील. शेतकºयांचा अनावश्यक खर्च वाचेल, वितरण व्यवस्था मजबूत होईल, कृषिक्षेत्रात गुंतवणूक वाढेल, एक देश एक मार्केट भावना वाढेल, कृषी उत्पादनावर सेस राहणार नाही, असा विश्वास आहे.

१९३६ साली आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते. त्या साली दुष्काळ पडला होता. त्यावेळी गावोगावी फिरून माल खरेदी करणे अडचणीचे होते. त्यासाठी बाजार समित्या तयार करण्यात आल्या. त्यावेळच्या व आताच्या परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे. परंतु कायदा तोच राहिला.जुन्या काळात शेतकºयाची फसवणूक होऊ नये या हेतूने कायदे केले गेले. त्यावेळी हातदांडीचे साखळीचे काटे होते, आता इलेक्ट्रिक काटे आले आहेत. त्यामुळे आज विचार केला तर शेतकºयाचे रक्षण होते का, अपवाद सोडला तर याचे उत्तर नकारार्थी येईल. सेस रद्द करण्याबाबत मागील सरकारबरोबर चर्चा झाली होती.महाराष्ट्रातील सेस रद्द केल्यास ३०० ते ३५० कोटी रुपयांचा भार शासनावर पडेल. अर्थसंकल्पाच्या मानाने ते नगण्य आहे. त्याची भरपाई जीएसटीमधून शासनास करता येईल, असा विश्वास आहे. बाजार समितीच्या कायद्यात बदल करण्याची जुनी मागणी होती त्यास केंद्राने प्रतिसाद दिला. या बदलांचा या घटकांना निश्चितच फायदा होईल. कायद्यात बदल झाल्यास भीती दाखविली जाते. व्यापाºयाने शेतकºयाचे पैसे बुडविले तर काय? पैसे बुडण्याचे काही कारण नाही. शेतकºयाने मालाचे पैसे बंद रोख घ्यावेत. मग बुडविण्याचा प्रश्नच येत नाही. कृषिमालाचा व्यापार करणारे व्यापारी हे फसवणूक करणारे आहेत ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. आपण फ्री इकॉनॉमी मान्य केली आहे, कुठल्याही व्यवसायावर बंधन नाही मग फक्त कृषिमालाचे व्यापारावरच बंधन का याचा देखील यानिमित्ताने विचार होणे अतिशय गरजेचे आहे.केंद्र सरकारने शेतकºयांना त्यांचे उत्पादन कोठेही विकण्याची मुभा एका वटहुकुमाव्दारे नुकतीच दिली आहे. त्यामुळे शेतकरी, कृ षी उत्पन्न बाजार समितीसह या क्षेत्राशी संबंधित घटकांवर काय परिणाम होऊ शकतात याचा घेतलेला आढावा...

टॅग्स :Farmerशेतकरी