शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

"...तेव्हा आपोआप हिंदू-मुस्लीम ऐक्य होईल!"; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी CM योगींना सांगितला फॉर्म्यूला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 10:42 IST

Shankaracharya Avimukteswarananda : शंकराचार्य अविमुक्तेश्वानंद म्हणाले, 'बटेंगे तो कटेंगे' ही भविष्यकाळात होणारी क्रिया है. हा भविष्यातील शक्यतेचा इशारा आहे. याचा अर्थ आहे की, अद्याप आपल्यात फूट पडलेली नाही, मात्र याची शक्यता आहे. आपल्यात कशामुळे फूट पडेल, याचे कारण आपल्याला शोधावे लागेल.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे 'बटेंगे तो कटेंगे' विधान सातत्याने चर्चेत आहे. यातच आता शंकराचार्य अविमुक्तेश्वानंद सरस्वती यांनीही त्यांच्या विधानासंदर्भात भाष्य केले आहे. देशात ऐक्य आवश्यक असल्याचे म्हणत, यासाठी त्यांनी सरकारला एक फॉर्म्यूला देखील सांगितला आहे.

शंकराचार्य अविमुक्तेश्वानंद म्हणाले, 'बटेंगे तो कटेंगे' ही भविष्यकाळात होणारी क्रिया है. हा भविष्यातील शक्यतेचा इशारा आहे. याचा अर्थ आहे की, अद्याप आपल्यात फूट पडलेली नाही, मात्र याची शक्यता आहे. आपल्यात कशामुळे फूट पडेल, याचे कारण आपल्याला शोधावे लागेल.

सीएम योगी आणि भाजपला शंकराचार्यांचा प्रश्न -स्वामी अविमुक्तेश्वानंद सरस्वती यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजप आणि आरएसएसला प्रश्न विचारताना म्हटले आहे की, आपल्याल जर ऐक्य आणायचे असेल तर फॉर्म्युला काय? ते म्हणाले, ''गायीला राष्ट्रमाता घोषित करा, गोहत्येला गुन्हा म्हणून घोषित करा. गाय माता आहे, हे जेव्हा संपूर्ण देशाला समजेल, तेव्हा संपूर्ण देश गाय आपली माता आहे, असे म्हणेल."  अविमुक्तेश्वानंद सरस्वती पुढे म्हणाले, जेव्हा दोघांचीही माता (गाय) एक होईल, तेव्हा दोघेही आपोआप भाऊ होतील. भावा-भावात ऐक्य होईल. यालाच बंधुत्व म्हणतात. हे गायीला राष्ट्रमाता घोषित करूनच होऊ शकते. एवढेच नाही, तर जनते समोर फुटीची कारणं ठेवावी लागतील, अशेही ते म्हणाले. 

काय म्हणाले होते योगी? - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका सभेला संबोधित करताना म्हणाले होते, "जेव्हा आपण संघटित राहू, आपल्यात नैतिकता असेल, तेव्हा राष्ट्र सशक्त होईल, फूट पडली तर कापले जाऊ (बटेंगे तो कटेंगे). बांगला देशात बघत आहात, ती चूक येथे व्हायला नको. एक राहू तर सुरक्षित राहू." योगींच्या या विधानानंतर राजकारण पेटले आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथHinduहिंदूMuslimमुस्लीमcowगाय