शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
2
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
3
श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्यास बंदी; पकडण्यापासून रोखल्यास २ लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
4
'मी प्रेमाने तिच्या जवळ गेलो पण...'; पहिल्या रात्रीच पत्नीचा खरा चेहरा समोर आला, घाबरलेला पती पोलिसांकडे गेला!
5
मुकेश अंबानी यांच्या आई कोकिला बेन यांची प्रकृती बिघडली; एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल
6
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
7
सावध व्हा, तुमच्यासोबतही असं घडू शकतं! अधिकारी असल्याची बतावणी करून २.३ कोटी रुपये पळवले
8
Asia Cup आधी रिंकू सिंहचा शतकी धमाका; ८ उत्तुंग षटकारासह २२५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
9
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
10
प्रेमात धोका! संतापलेली गर्लफ्रेंड थेट बॉयफ्रेंडच्या घरी पोहोचली, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का
11
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
12
"दुसऱ्या पुरुषाचा स्पर्श मला सहन झाला नसता...", राजेश खन्नांसोबतच्या अफेअरबद्दल पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री
13
Kashi Vishwanath Temple Owl: काशी विश्वनाथ मंदिरावर दिसले पांढरे घुबड; हे भारतासाठी नक्की कसले संकेत?
14
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
15
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
16
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
17
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
18
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
19
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
20
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी

"...तेव्हा आपोआप हिंदू-मुस्लीम ऐक्य होईल!"; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी CM योगींना सांगितला फॉर्म्यूला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 10:42 IST

Shankaracharya Avimukteswarananda : शंकराचार्य अविमुक्तेश्वानंद म्हणाले, 'बटेंगे तो कटेंगे' ही भविष्यकाळात होणारी क्रिया है. हा भविष्यातील शक्यतेचा इशारा आहे. याचा अर्थ आहे की, अद्याप आपल्यात फूट पडलेली नाही, मात्र याची शक्यता आहे. आपल्यात कशामुळे फूट पडेल, याचे कारण आपल्याला शोधावे लागेल.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे 'बटेंगे तो कटेंगे' विधान सातत्याने चर्चेत आहे. यातच आता शंकराचार्य अविमुक्तेश्वानंद सरस्वती यांनीही त्यांच्या विधानासंदर्भात भाष्य केले आहे. देशात ऐक्य आवश्यक असल्याचे म्हणत, यासाठी त्यांनी सरकारला एक फॉर्म्यूला देखील सांगितला आहे.

शंकराचार्य अविमुक्तेश्वानंद म्हणाले, 'बटेंगे तो कटेंगे' ही भविष्यकाळात होणारी क्रिया है. हा भविष्यातील शक्यतेचा इशारा आहे. याचा अर्थ आहे की, अद्याप आपल्यात फूट पडलेली नाही, मात्र याची शक्यता आहे. आपल्यात कशामुळे फूट पडेल, याचे कारण आपल्याला शोधावे लागेल.

सीएम योगी आणि भाजपला शंकराचार्यांचा प्रश्न -स्वामी अविमुक्तेश्वानंद सरस्वती यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजप आणि आरएसएसला प्रश्न विचारताना म्हटले आहे की, आपल्याल जर ऐक्य आणायचे असेल तर फॉर्म्युला काय? ते म्हणाले, ''गायीला राष्ट्रमाता घोषित करा, गोहत्येला गुन्हा म्हणून घोषित करा. गाय माता आहे, हे जेव्हा संपूर्ण देशाला समजेल, तेव्हा संपूर्ण देश गाय आपली माता आहे, असे म्हणेल."  अविमुक्तेश्वानंद सरस्वती पुढे म्हणाले, जेव्हा दोघांचीही माता (गाय) एक होईल, तेव्हा दोघेही आपोआप भाऊ होतील. भावा-भावात ऐक्य होईल. यालाच बंधुत्व म्हणतात. हे गायीला राष्ट्रमाता घोषित करूनच होऊ शकते. एवढेच नाही, तर जनते समोर फुटीची कारणं ठेवावी लागतील, अशेही ते म्हणाले. 

काय म्हणाले होते योगी? - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका सभेला संबोधित करताना म्हणाले होते, "जेव्हा आपण संघटित राहू, आपल्यात नैतिकता असेल, तेव्हा राष्ट्र सशक्त होईल, फूट पडली तर कापले जाऊ (बटेंगे तो कटेंगे). बांगला देशात बघत आहात, ती चूक येथे व्हायला नको. एक राहू तर सुरक्षित राहू." योगींच्या या विधानानंतर राजकारण पेटले आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथHinduहिंदूMuslimमुस्लीमcowगाय