शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

"...तेव्हा आपोआप हिंदू-मुस्लीम ऐक्य होईल!"; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी CM योगींना सांगितला फॉर्म्यूला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 10:42 IST

Shankaracharya Avimukteswarananda : शंकराचार्य अविमुक्तेश्वानंद म्हणाले, 'बटेंगे तो कटेंगे' ही भविष्यकाळात होणारी क्रिया है. हा भविष्यातील शक्यतेचा इशारा आहे. याचा अर्थ आहे की, अद्याप आपल्यात फूट पडलेली नाही, मात्र याची शक्यता आहे. आपल्यात कशामुळे फूट पडेल, याचे कारण आपल्याला शोधावे लागेल.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे 'बटेंगे तो कटेंगे' विधान सातत्याने चर्चेत आहे. यातच आता शंकराचार्य अविमुक्तेश्वानंद सरस्वती यांनीही त्यांच्या विधानासंदर्भात भाष्य केले आहे. देशात ऐक्य आवश्यक असल्याचे म्हणत, यासाठी त्यांनी सरकारला एक फॉर्म्यूला देखील सांगितला आहे.

शंकराचार्य अविमुक्तेश्वानंद म्हणाले, 'बटेंगे तो कटेंगे' ही भविष्यकाळात होणारी क्रिया है. हा भविष्यातील शक्यतेचा इशारा आहे. याचा अर्थ आहे की, अद्याप आपल्यात फूट पडलेली नाही, मात्र याची शक्यता आहे. आपल्यात कशामुळे फूट पडेल, याचे कारण आपल्याला शोधावे लागेल.

सीएम योगी आणि भाजपला शंकराचार्यांचा प्रश्न -स्वामी अविमुक्तेश्वानंद सरस्वती यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजप आणि आरएसएसला प्रश्न विचारताना म्हटले आहे की, आपल्याल जर ऐक्य आणायचे असेल तर फॉर्म्युला काय? ते म्हणाले, ''गायीला राष्ट्रमाता घोषित करा, गोहत्येला गुन्हा म्हणून घोषित करा. गाय माता आहे, हे जेव्हा संपूर्ण देशाला समजेल, तेव्हा संपूर्ण देश गाय आपली माता आहे, असे म्हणेल."  अविमुक्तेश्वानंद सरस्वती पुढे म्हणाले, जेव्हा दोघांचीही माता (गाय) एक होईल, तेव्हा दोघेही आपोआप भाऊ होतील. भावा-भावात ऐक्य होईल. यालाच बंधुत्व म्हणतात. हे गायीला राष्ट्रमाता घोषित करूनच होऊ शकते. एवढेच नाही, तर जनते समोर फुटीची कारणं ठेवावी लागतील, अशेही ते म्हणाले. 

काय म्हणाले होते योगी? - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका सभेला संबोधित करताना म्हणाले होते, "जेव्हा आपण संघटित राहू, आपल्यात नैतिकता असेल, तेव्हा राष्ट्र सशक्त होईल, फूट पडली तर कापले जाऊ (बटेंगे तो कटेंगे). बांगला देशात बघत आहात, ती चूक येथे व्हायला नको. एक राहू तर सुरक्षित राहू." योगींच्या या विधानानंतर राजकारण पेटले आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथHinduहिंदूMuslimमुस्लीमcowगाय