शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 20:46 IST

Raja Raghuvanshi Murder Case: राजा रघुवंशी आणि सोनम हे बेपत्ता झाल्यानंतर या दोघांच्याही कुटुंबीयांनी मेघालय सरकार आणि तेथील प्रशासनावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आता या प्रकरणातील सत्य माहिती समोर आल्यानंतर राजा रघुवंशी आणि सोनम यांच्या कुटुंबीयांनी मेघालयची माफी मागावी, अशी मागणी मेघालय सरकारमधील मंत्री अलेक्झँडर लालू हेक यांनी केली आहे.

लग्नानंतर मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेले राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम हे जोडपे अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, काही दिवसांनी राजा रघुवंशी याचा मृतदेह शिलाँगजवळील वेईसाडोंग फॉल्स या ठिकाणी कुजलेल्या स्थितीत सापडला होता. तसेच राजा रघुवंशी याची हत्या ही त्याची पत्नी सोनम हिनेच सुपारी देऊन केल्याची धक्कादायक माहिती तपासामधून समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी सोनम हिला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणी आता मेघालय सरकारमधील मंत्री अलेक्झँडर लालू हेक यांनी राजा रघुवंशी आणि सोनम हिच्या कुटुंबीयांना इशारा दिला आहे.

राजा रघुवंशी आणि सोनम हे बेपत्ता झाल्यानंतर या दोघांच्याही कुटुंबीयांनी मेघालय सरकार आणि तेथील प्रशासनावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आता या प्रकरणातील सत्य माहिती समोर आल्यानंतर राजा रघुवंशी आणि सोनम यांच्या कुटुंबीयांनी मेघालयची माफी मागावी, अशी मागणी मेघालय सरकारमधील मंत्री अलेक्झँडर लालू हेक यांनी केली आहे. राजा आणि सोनम यांच्या कुटुंबीयांनी मेघालय राज्य आणि येथील जनतेची प्रतिमा मलिन केली आहे. जर त्यांनी माफी मागितली नाही, तर त्यांच्याविरोधात खटला दाखल केला जाईल, असा इशारा अलेक्झँडर लालू हेक यांनी दिला आहे.

राजा रघुवंशी बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. या पत्रामधून रघुवंशी कुटुंबीयांनी मेघालयमधील पोलीस आणि सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे मंत्री अलेक्झँडर लालू हेक हे नाराज झाले आहेत. मेघालय पोलिसांनी या प्रकरणाचा त्वरित तपास करून आरोपी सोनम हिच्यासह इतर आरोपींना अटक केली आहे. या कुटुंबांनी केलेल्या आरोपांमुळे राज्याच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते, असा आरोपही मेघालयच्या मंत्र्यांनी केला. दरम्यान, हा गुन्हा मेघालयमध्ये घडला होता. त्यामुळे आरोपींना इथेच आणलं जाईल, असेही त्यांनी सांगितले.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी