शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रेल्वेत चोरी; २ लाख ३७ हजार भरपाई; राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे रेल्वे प्रशासनाला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 06:33 IST

धावत्या रेल्वेत चोरी झाल्यास तिकीट तपासनिसाकडे तक्रार नोंदवावी. त्यांच्याकडे अशा तक्रारींसाठी विशिष्ट पुस्तक व रजिस्टर असते

खुशालचंद बाहेती 

नवी दिल्ली : धावत्या रेल्वेत झालेल्या चोरीची तक्रार तिकीट तपासनिसाकडे केल्यानंतरही कोणतीच चौकशी न केल्याबद्दल रेल्वे प्रशासनास दोषी ठरवत २ लाख ३७ हजार रुपये व्याजासह तक्रारदारास देण्याचे आदेश राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले आहेत.

१६ जुलै २०१३ रोजी राजूदेवी सूर्यवंशी आपल्या कुटुंबियासह रेल्वेने गोवा ते रतलाम प्रवास करीत होत्या. आरक्षित डब्यात त्यांचे बर्थ होते. झोपताना त्यांनी आपले सोन्या-चांदीचे दागिने व २० हजारांची रोकड पर्समध्ये घातली आणि पर्स उशीखाली ठेवली. सकाळी उठल्यानंतर उशीखाली ठेवलेली पर्स व दागिने-रोख रक्कम गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे सर्व चोरी झाल्याची खात्री पटताच त्यांनी डब्यातील तिकीट तपासनिसाकडे तोंडी तक्रार केली. नंतर त्यांनी रीतसर एफआयआरही नोंदवला. मात्र, रेल्वेने यात कोणतीच चौकशी केली नाही.सूर्यवंशी यांनी याबाबत जिल्हा ग्राहक मंचकडे नुकसानभरपाई मिळण्यासाठी तक्रार दाखल केली. आरक्षित डब्यात अनधिकृत लोकांची मुक्तपणे ये-जा होत होती आणि यामुळेच ही चोरी झाल्याचा त्यांनी दावा केला. आरक्षित डब्यात अनधिकृत लोकांना प्रवेश करण्यापासून रोखणे ही प्रवाशांच्या सेवेतील त्रुटी असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. जिल्हा ग्राहक मंचने हे मान्य करीत रेल्वेला एकूण २ लक्ष ३७ हजार रुपये १२ टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले. याविरुद्धचे रेल्वेचे अपील छत्तीसगड राज्य ग्राहक आयोगाने फेटाळले. प्रकरण राष्ट्रीय ग्राहक मंचमध्ये आल्यानंतर अध्यक्ष आर. के. अग्रवाल व सदस्य एम. श्रीशा यांनी हा निर्णय योग्य ठरवला. त्यांनी फक्त व्याजदर १२ टक्क्यांऐवजी ६ टक्के केला. धावत्या रेल्वेतील चोरीसाठी राष्ट्रीय आयोगाने रेल्वेची जबाबदारी निश्चित केल्याने देशभरातील अशा चोरीचे बळी ठरणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

धावत्या रेल्वेत चोरी झाल्यास तिकीट तपासनिसाकडे तक्रार नोंदवावी. त्यांच्याकडे अशा तक्रारींसाठी विशिष्ट पुस्तक व रजिस्टर असते. ही तक्रार पोलिसांकडे पोहोचविण्याची जबाबदारी त्यांची आहे. यावरून पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला जातो. लोकांना यासाठी प्रवास सोडून पोलीस ठाण्यात जाण्याची आवश्कता नाही. -वैभव कालुबारमे, रेल्वे पोलीस अधीक्षक, औरंगाबाद