शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

‘सुपर ओव्हर’ने होणार विजेत्याचा फैसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 05:27 IST

प्ले ऑफ, फायनलसाठी नवे निर्देश

नवी दिल्ली : पावसामुळे व्यत्यय आल्यास आणि नियमित वेळेत खेळ होऊ न शकल्यास आयपीएल १५च्या विजेत्याचा फैसला सुपरओव्हरद्वारे होईल.आयपीएल कौन्सिलने सोमवारी जाहीर केलेल्या निर्देशानुसार  एकही षटक टाकले गेले नाही तर लीगच्या सुरुवातीच्या टप्प्यातील गुणतालिकेचा आधार घेतला जाईल. याच आधारे विजेत्याचा निर्णय होईल.  हे निर्देश क्वालिफायर १, एलिमिनेटर आणि क्वालिफायर दोनसाठीही लागू राहतील. या सामन्यांसाठी कुठलाही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. २९ मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात व्यत्यय आल्यास ३० मे हा राखीव दिवस असेल. अंतिम सामना रात्री ८ वाजेपासून खेळला जाईल. 

आयपीएल प्ले ऑफमधील दोन सामने कोलकाता येथील ईडन गार्डनवर होणार आहेत.  येथे सामन्यादरम्यान खराब हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  पावसामुळे व्यत्यय येण्याची शंका लक्षात घेत आयपीएलने दिशानिर्देश जाहीर केले. मंगळवारी (दि. २४) पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातची लढत राजस्थानविरुद्ध होईल. बुधवारी याच ठिकाणी एलिमिनेटरमध्ये लखनौविरुद्ध आरसीबी ही लढत रंगणार आहे. दुसरा क्वालिफायर अहमदाबादमध्ये शुक्रवारी होईल. याच ठिकाणी रविवारी आयपीएलची अंतिम लढत रंगणार आहे.  आयपीएल निर्देशानुसार, ‘प्ले ऑफमध्ये गरजेनुसार सामन्यातील षटकांची संख्या किमान पाच षटकांपर्यंत कमी केली जाईल. 

टॅग्स :IPLआयपीएल २०२२ahmedabadअहमदाबाद