शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी आणि मी कायम मित्र राहू..."; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
2
ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक कौतुक करताच पंतप्रधान मोदी यांनीही मानले आभार! म्हणाले...
4
कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदली, लाल किल्ल्यात मौल्यवान वस्तूवर चोरट्याचा डल्ला, कोट्यवधीमध्ये आहे किंमत   
5
राष्ट्रसंत मोरारी बापू यांना राज्य सरकारकडून अतिथी दर्जा!
6
OBC Reservation: ओबीसी आरक्षण संपविणारा काळा कागद म्हणजे सरकारचा मराठा जीआर!
7
१ लाख रुपयांचे झाले १ कोटी, या स्टॉकनं केलं मालामाल; मोटरसायकल आणि थ्री व्हिलर बनवते कंपनी, तुमच्याकडे आहे का?
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा रद्द, आता एस. जयशंकर करणार UNGA मध्ये भारताचं प्रतिनिधित्व
9
"घाबरू नका, प्रत्येक समस्येचे निराकरण होईल"; CM योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना दिला धीर
10
केवळ ₹१५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; तयार होईल ₹५९,०३,२५३ चा फंड, नफा पाहून विश्वासच बसणार नाही
11
"पाठीत खंजीर खुपसणारे..."; विराट कोहली-युवराज मैत्रीबाबत युवीच्या वडिलांचे धक्कादायक विधान
12
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा
13
कॉलेजमधली एक भेट, फेसबुकवर मेसेज अन् मग...; संजू सॅमसनला असा मिळाला 'आयुष्याचा जोडीदार'
14
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ६०० चिनी जहाजांसह परप्रांतीय बोटींची घुसखोरी
15
Donald Trump: 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो'
16
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
17
Blood Moon: रविवारी आकाशात असेल ‘ब्लड मून’ची मेजवानी
18
पंजाबमध्ये पुरामुळे मोठं नुकसान, धावून आला अक्षय कुमार; नुकसानग्रस्तांसाठी ५ कोटींची मदत
19
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
20
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज

जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 07:56 IST

सोमवारी संध्याकाळी ६ वाजता जगदीप धनखड यांनी विरोधी पक्षातील खासदारांची भेट घेतली. त्यावेळीही धनखड यांनी तब्येतीबाबत काही उल्लेख केला नाही. परंतु त्यानंतर ३ तासांत धनखड यांनी पदाचा राजीनामा दिला.

नवी दिल्ली - जगदीप धनखड यांनी सोमवारी संध्याकाळी प्रकृतीच्या कारणास्तव अचानक उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. धनखड यांचा राजीनामा अशावेळी आला जेव्हा संसदेचे पावसाळी अधिवेशनाचा १ दिवस झाला होता. त्यात तब्येतीचं कारण देत राजीनामा देण्याची बाब अनेक राजकीय विश्लेषकांना पटली नाही. उपराष्ट्रपती यांच्या राजीनाम्याचे टायमिंग पाहून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

काहींच्या मते, उपराष्ट्रपती धनखड आणि सरकार यांच्यात सर्वकाही ठीक नाही. ही नाराजी इतकी वाढली की धनखड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला तर मध्यंतरी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर सरकारच्या भूमिकेशी उपराष्ट्रपती धनखड सहमत नव्हते. हा मुद्दा त्यांनी जाहीर व्यासपीठावरही मांडला होता. त्यातून झालेल्या संघर्षातून धनखड यांनी राजीनामा दिला असं काहींचे म्हणणे आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जगदीप धनखड सक्रियतेने कामकाजात पाहायला मिळाले. संसदेत त्यांनी अनेक बैठकाही घेतल्या. सोमवारी संध्याकाळी ६ वाजता जगदीप धनखड यांनी विरोधी पक्षातील खासदारांची भेट घेतली. त्यावेळीही धनखड यांनी तब्येतीबाबत काही उल्लेख केला नाही. परंतु त्यानंतर ३ तासांत धनखड यांनी पदाचा राजीनामा दिला.

इतकेच नाही तर जगदीप धनखड यांचा हा निर्णय न पटण्याचं कारण म्हणजे त्यांचे पूर्वनियोजित दौरे, २३ जुलैला धनखड राजस्थानच्या जयपूर दौऱ्यावर जाणार होते. जिथे उपराष्ट्रपती रिअल इस्टेट डेव्हलपर्स संघाशी संवाद साधणार होते. उपराष्ट्रपती सचिवालयाकडून या कार्यक्रमाची पत्रिकाही प्रसिद्ध करण्यात आली होती. राजकीय विश्लेषक आशुतोष सांगतात की, धनखड यांचा राजीनामा तब्येतीच्या कारणाने झाला नाही हे मी पूर्ण जबाबदारीने सांगू शकतो. मागील काही दिवसांपासून जे घडत होते त्यामुळे ते व्यथित झाले होते. धनखड सरकारच्या भूमिकेमुळे नाराज होते. त्यांनी बऱ्याचदा त्यांची नाराजी काही लोकांसमोर बोलून दाखवली असं त्यांनी म्हटलं. त्याशिवाय पुढील २-४ दिवसांत सर्व काही स्पष्ट होईल असंही ते म्हणाले. 

दरम्यान, आणखी एका ज्येष्ठ पत्रकारानेही यावर प्रतिक्रिया दिली. मी दीर्घ काळापासून जगदीप धनखड यांना ओळखतो. त्यांच्या कार्यशैलीबाबत मला बरीच माहिती आहे. ते भारताचे सर्वात स्पष्टवक्ते उपराष्ट्रपती राहिलेत, ते फायटर आहेत आणि हार मानणारे नाहीत. त्यामुळे त्यांनी दिलेला राजीनामा तब्येतीच्या कारणावरून नक्कीच नाही. यामागे खूप मोठे कारण दडले आहे. प्रकृतीच्या कारणांचा हवाला दिला जात आहे परंतु तब्येतीबाबत एका दिवसांतच कळालं हे पटत नाही. त्यात पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यावरच राजीनामा देणे, ही वेळ काहीतरी वेगळेच सांगते असं पत्रकार विजय त्रिवेदी यांनी म्हटलं. 

काँग्रेस खासदारांनाही बसला धक्का

काँग्रेसचे राज्यसभा खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांनी म्हटलं की, ही बातमी आमच्यासाठी शॉकिंग आहे कारण संध्याकाळी ५.४५ वाजता मी त्यांच्या केबिनमधून बाहेर पडलो होतो. माझ्यासोबत जयराम रमेश, प्रमोद तिवारीही होते. आमची न्या. वर्माविरोधात महाभियोगाच्या मुद्द्यावर चर्चाही झाली. परंतु त्यावेळी उपराष्ट्रपतींची तब्येत खराब आहे असं दिसले नाही. ते निष्पक्षतेने सभागृह चालवण्याचा प्रयत्न करायचे. त्यांचा राजीनामा देशातील राजकारणात एक धक्का मानला जात आहे असं सांगितले. तर उपराष्ट्रपतींचा राजीनामा रहस्यमय आहे. संध्याकाळी ५ पर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. त्यानंतर संध्याकाळी ७.३० वाजता माझे त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले. धनखड यांनी त्यांच्या तब्येतीला प्राधान्य दिले पाहिजे यात दुमत नाही परंतु त्यांच्या राजीनाम्यामागे बरेच काही लपलंय असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सांगितले.  

टॅग्स :Indiaभारतjagdeep dhankharजगदीप धनखड