शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

सत्तेसाठी तिघांनी केली छुपी हातमिळवणी; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 12:36 IST

सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन

कलवाकुर्थी (तेलंगणा) : मागील १० वर्षांपासून तेलंगणमध्ये एकाच पक्षाचे सरकार आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, भाजप आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम या पक्षांनी हातमिळवणी केलेली आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी येथील प्रचारसभेत केला. आसाम, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, त्रिपुरा अशा कोणत्याही राज्यात जिथे काँग्रेसची भाजपशी थेट लढत असते तिथे एमआयएमकडून उमेदवार उभे केले जातात, असेही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले की, आम्ही स्वप्न पाहिले होते इथे जनतेचे राज्य असावे. परंतु, गेली १० वर्षांपासून इथे एकाच परिवाराची सत्ता आहे. हा परिवार मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा आहे. केसीआर सरकारने कालेश्वरम प्रकल्पाच्या नावाखाली जनतेच्या एक लाख कोटी रुपयांची चोरी केली आहे. आता त्यांची सत्तेतून जाण्याची वेळ आली आहे. जडचेरला येथील प्रचार सभेत राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यानंतर राज्यात जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले.

भाजप ओबीसी मुख्यमंत्री कसा बनविणार?

भाजपने राज्यात ओबीसी नेत्याला मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, जर भाजपला या राज्यात केवळ दोन टक्के मते मिळणार असतील तर तुम्ही मुख्यमंत्री कसा काय बनविणार ?

टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३Rahul Gandhiराहुल गांधी