शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी तिघांनी केली छुपी हातमिळवणी; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 12:36 IST

सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन

कलवाकुर्थी (तेलंगणा) : मागील १० वर्षांपासून तेलंगणमध्ये एकाच पक्षाचे सरकार आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, भाजप आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम या पक्षांनी हातमिळवणी केलेली आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी येथील प्रचारसभेत केला. आसाम, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, त्रिपुरा अशा कोणत्याही राज्यात जिथे काँग्रेसची भाजपशी थेट लढत असते तिथे एमआयएमकडून उमेदवार उभे केले जातात, असेही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले की, आम्ही स्वप्न पाहिले होते इथे जनतेचे राज्य असावे. परंतु, गेली १० वर्षांपासून इथे एकाच परिवाराची सत्ता आहे. हा परिवार मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा आहे. केसीआर सरकारने कालेश्वरम प्रकल्पाच्या नावाखाली जनतेच्या एक लाख कोटी रुपयांची चोरी केली आहे. आता त्यांची सत्तेतून जाण्याची वेळ आली आहे. जडचेरला येथील प्रचार सभेत राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यानंतर राज्यात जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले.

भाजप ओबीसी मुख्यमंत्री कसा बनविणार?

भाजपने राज्यात ओबीसी नेत्याला मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, जर भाजपला या राज्यात केवळ दोन टक्के मते मिळणार असतील तर तुम्ही मुख्यमंत्री कसा काय बनविणार ?

टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३Rahul Gandhiराहुल गांधी