शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
3
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
4
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
5
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
6
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
7
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
8
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
9
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
10
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
11
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
12
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
13
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
14
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
15
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
16
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
17
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
18
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

सात राज्यांमध्ये राज्यपाल बदलणार?; हालचालींना वेग, मंत्रिमंडळात फेरबदलाचीही चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 09:16 IST

 पाच राज्यपाल आणि दोन नायब राज्यपाल यांचा कार्यकाळ लवकरच समाप्त होणार आहे.

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली- राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुका आणि स्वातंत्र्य दिन समारंभ पार पडल्यानंतर आता राज्यपाल बदलांबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. मंत्रिमंडळात फेरबदलाचीही चर्चा आहे. मात्र पक्ष त्यासाठी आणखी वेळ घेऊ शकतो. पाच राज्यपाल आणि दोन नायब राज्यपाल यांचा कार्यकाळ लवकरच समाप्त होणार आहे. ज्येष्ठ नेत्यांना राज्यपाल आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना नायब राज्यपाल म्हणून नियुक्त करण्याला पंतप्रधान पसंती देतात. 

अलीकडेच व्ही.के.सक्सेना यांची दिल्लीत नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. ज्या नावांचा सध्या विचार केला जात आहे, त्यात माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचा समावेश आहे. राज्यपालांच्या यादीत प्रथम क्रमांकावर नाव आहे सत्यपाल मलिक यांचे. ते सध्या मेघालयात आहे. त्यांना गोव्यातून मेघालयात पाठवण्यात आले आङे. तेव्हापासून ते दिल्लीतील मेघालय भवनमध्येच आहेत. त्यांना ऑक्टोबर २०१७मध्ये बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले होते. त्यांना जम्मू-काश्मिरातही पाठविण्यात आले होते. इतिहासातील ते असे एकमेव राज्यपाल आहेत, जे सातत्याने केंद्र सरकारविरुद्ध जाहीर भाष्य करीत आलेले आहेत. तरीही पंतप्रधानांनी त्यांना बडतर्फ केले नाही. 

अरुणाचलचे बी.डी.मिश्रा, आसाम व नागालँडचे जगदीश मुखी, पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदाची जबाबदारी असलेल्या तमिलसाई सुंदरराजन आणि अंदमान-निकोबारचे डी.के. जोशी यांचा कार्यकाळ समाप्त होत आहे. बनवारीलाल पुरोहित यांना ऑक्टोबर २०१७मध्ये तामिळनाडूचे राज्यपाल करण्यात आले आणि नंतर पंजाबला स्थलांतरित करण्यात आले. त्यांना कायम ठेवले जाऊ शकते, असेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा