शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

सात राज्यांमध्ये राज्यपाल बदलणार?; हालचालींना वेग, मंत्रिमंडळात फेरबदलाचीही चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 09:16 IST

 पाच राज्यपाल आणि दोन नायब राज्यपाल यांचा कार्यकाळ लवकरच समाप्त होणार आहे.

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली- राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुका आणि स्वातंत्र्य दिन समारंभ पार पडल्यानंतर आता राज्यपाल बदलांबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. मंत्रिमंडळात फेरबदलाचीही चर्चा आहे. मात्र पक्ष त्यासाठी आणखी वेळ घेऊ शकतो. पाच राज्यपाल आणि दोन नायब राज्यपाल यांचा कार्यकाळ लवकरच समाप्त होणार आहे. ज्येष्ठ नेत्यांना राज्यपाल आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना नायब राज्यपाल म्हणून नियुक्त करण्याला पंतप्रधान पसंती देतात. 

अलीकडेच व्ही.के.सक्सेना यांची दिल्लीत नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. ज्या नावांचा सध्या विचार केला जात आहे, त्यात माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचा समावेश आहे. राज्यपालांच्या यादीत प्रथम क्रमांकावर नाव आहे सत्यपाल मलिक यांचे. ते सध्या मेघालयात आहे. त्यांना गोव्यातून मेघालयात पाठवण्यात आले आङे. तेव्हापासून ते दिल्लीतील मेघालय भवनमध्येच आहेत. त्यांना ऑक्टोबर २०१७मध्ये बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले होते. त्यांना जम्मू-काश्मिरातही पाठविण्यात आले होते. इतिहासातील ते असे एकमेव राज्यपाल आहेत, जे सातत्याने केंद्र सरकारविरुद्ध जाहीर भाष्य करीत आलेले आहेत. तरीही पंतप्रधानांनी त्यांना बडतर्फ केले नाही. 

अरुणाचलचे बी.डी.मिश्रा, आसाम व नागालँडचे जगदीश मुखी, पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदाची जबाबदारी असलेल्या तमिलसाई सुंदरराजन आणि अंदमान-निकोबारचे डी.के. जोशी यांचा कार्यकाळ समाप्त होत आहे. बनवारीलाल पुरोहित यांना ऑक्टोबर २०१७मध्ये तामिळनाडूचे राज्यपाल करण्यात आले आणि नंतर पंजाबला स्थलांतरित करण्यात आले. त्यांना कायम ठेवले जाऊ शकते, असेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा