शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘छुप्या’ कारभाराला सर्वोच्च न्यायालयाने लावला चाप, ऊठसूट ‘आरटीआय’चीही गरज नाही...

By अविनाश साबापुरे | Updated: August 23, 2023 11:04 IST

सरकारी कार्यालयांचा ‘आरसा’ आता सर्वांनाच होणार खुला, न्यायालयाचे आदेश

अविनाश साबापुरे, लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: सर्वसामान्य नागरिकांसाठी आवश्यक असलेली प्रत्येक सरकारी कार्यालयातील कामकाजाशी संबंधित माहिती वेबसाइटवर टाकावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने १७ ऑगस्टला दिले. त्यामुळे १७ वर्षांपासून सुरू असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या छुप्या कारभाराला चाप लागणार आहे, तर दुसरीकडे नागरिकांनाही अशी माहिती मिळविण्यासाठी ऊठसूट आरटीआय टाकावा लागणार नाही.

सर्व शासकीय प्राधिकरणांनी ‘केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम २००५ कलम ४ (१) (ख)’मधील तरतुदीनुसार आपल्या कार्यालयाच्या १७ बाबींची माहिती वेबसाइटवर टाकणे बंधनकारक आहे. त्यातून नागरिकांना त्या प्राधिकरणाबाबत संपूर्ण माहिती मिळेल. या १७ बाबी म्हणजे त्या प्राधिकरणाचा आरसा असतो. ही माहिती वर्षातून दोन वेळा म्हणजेच १ जानेवारी आणि १ जुलैला अपडेट करायची असते. भारत सरकारच्या कार्मिक प्रशिक्षण विभागानेही (डीओपीटी) १५ एप्रिल २०१३ रोजी या तरतुदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत सर्व राज्य सरकार, केंद्रीय माहिती आयोग व राज्य माहिती आयोगाला मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. मात्र, कायदा पारित होऊन १७ वर्षे झाली तरी या तरतुदीकडे दुर्लक्ष होत आहे. 

या १७ बाबी कराव्या लागतील उघड

कार्यालयाची रचना, कार्य, कर्तव्ये, कार्यालयाचे अधिकार, कर्मचाऱ्यांचे अधिकार, कर्तव्ये, कार्यालयाच्या कामासाठी ठरवलेली मानके, कामासाठी वापरले जाणारे नियम, विनियम, सूचना, नियमपुस्तिका, अभिलेख, अधिकारी, कर्मचाऱ्याला मिळणारे मासिक वेतन तसेच नुकसानभरपाईची पद्धती यासह एकूण १७ बाबी उघड कराव्या लागणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे आता सर्व सार्वजनिक प्राधिकरणांना १७ बाबींची अद्ययावत माहिती वेबसाइटवर अपलोड करणे बंधनकारक आहे. त्याचे पालन न केल्यास थेट न्यायालयाच्या आदेशाचा अवमान समजला जाईल. त्यामुळे त्या प्राधिकरणाला कारवाईला सामोरे जावे लागेल.- विशाल ठाकरे, माहिती अधिकार, कार्यकर्ते तथा प्रशिक्षक

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताRight to Information actमाहिती अधिकार