शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

बीआरएसच्या कचाट्यातून राज्य साेडविणार, भ्रष्ट सत्ताधारी नेत्यांना तुरुंगात टाकणार : माेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 06:52 IST

Telangana Assembly Election: तेलंगणाला भारत राष्ट्र समितीच्या कचाट्यातून भाजप साेडविणार असून सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा संकल्प भाजपने केला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी महबूबाबाद येथील प्रचारसभेत केले.

महबूबाबाद : तेलंगणाला भारत राष्ट्र समितीच्या कचाट्यातून भाजप साेडविणार असून सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा संकल्प भाजपने केला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी महबूबाबाद येथील प्रचारसभेत केले.

माेदी यांनी मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर कडाडून टीका केली. ते म्हणाले, तेलंगणातील गरीब आणि तरुणांसाेबत बीआरएसने विश्वासघात केला आहे. अशा लाेकांना साेडणार नाही. लाेकांनी केसीआर सरकारला उखडून फेकण्याचा संकल्प आधीच घेतल्याचे माेदी म्हणाले. 

घराणेशाही असलेल्या पक्षांच्या शासनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था नष्ट हाेते. काॅंग्रेस सत्तेत असताना सतत बाॅम्बस्फाेट व्हायचे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केली. ते म्हणाले, काॅंग्रेस जिथेही सध्या सत्तेत आहे, तिथे पीएफआयसारख्या दहशतवादी संघटनांना प्राेत्साहन मिळते.मी अपसेट होईन, 

टॉवरवर चढू नका...नरेंद्र मोदी यांनी निर्मल येथील जाहीर सभेत आपले भाषण थांबवून लोकांना टॉवरवरून खाली उतरण्याचे आवाहन केले आणि ते पडण्याची भीती व्यक्त केली. ‘मी अपसेट होईन, टॉवरवर चढू नका,’ असे ते म्हणाले. 

ते दाेन्ही पक्ष तेलंगणाचे दाेषीतेलंगणाला उद्ध्वस्त हाेण्यास काॅंग्रेस आणि बीआरएस हे दाेन्ही पक्ष बराेबरीचे दाेषी आहेत. तेलंगणाचे लाेक एका आजारापासून मुक्त हाेण्यासाठी दुसऱ्या राेगाचा प्रसार हाेऊ देणार नाहीत. राज्याचा पुढील मुख्यमंत्री भाजपचा असेल, असा दावाही माेदींनी यावेळी केला.

‘बीआरएस’ला ‘व्हीआरएस’ देण्याची वेळ : अमित शाह- सत्ताधारी बीआरएसला व्हीआरएस देण्याची वेळ आली आहे. तसेच त्यांची गाडी (बीआरएसचे निवडणूक चिन्ह) गॅरेजमध्ये पाठविण्याची वेळ आली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. - २०२४मध्येही नरेंद्र माेदीच हेच पंतप्रधान हाेणार असल्याचा दावाही शाह यांनी केला. हुजुराबाद येथील प्रचारसभेत ते बाेलत हाेते. अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणावरुन शाह यांनी बीआरएस, काॅंग्रेस आणि एमआयएम या तिन्ही पक्षांवर टीकास्त्र साेडले. - हैदराबाद संस्थानाचे १७ सप्टेंबर १९४८ राेजी भारतीय संघराज्यात विलीनीकरण झाले हाेते. मात्र, ओवैसींच्या भीतीमुळे केसीआर हा दिवस ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ म्हणून साजरा करत नाहीत, असा आराेपही शाह यांनी केला.

हैदराबादचे ‘भाग्यनगर’ करू : जी. किशन रेड्डी भाजपची सत्ता आल्यास हैदराबादचे नाव बदलून ‘भाग्यनगर’ करण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष जी. किशन रेड्डी यांनी स्पष्ट केले. एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, मद्रासचे नाव चेन्नई, बाॅम्बेचे मुंबई आणि कलकत्ताचे नाव काेलकाता करण्यात आले, तर हैदराबादचे नाव बदलून ‘भाग्यनगर’ करण्यात काय अडचण आहे? हैदर काेण आहे, कुठून आला, काेणाला त्याची गरज आहे, असा सवाल करून रेड्डी म्हणाले, भाजप सत्तेत आल्यास हैदर नाव हटविण्यात येईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांनीही त्यांच्या तेलंगणातील प्रचार सभांमध्ये हैदराबादचे नाव ‘भाग्यनगर’ आणि महबूबनगरचे नाव ‘पालामुरू’ करायला हवे, असे अनेकदा म्हटले आहे.

टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३Narendra Maharajनरेंद्र महाराजBJPभाजपाBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती