शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

बीआरएसच्या कचाट्यातून राज्य साेडविणार, भ्रष्ट सत्ताधारी नेत्यांना तुरुंगात टाकणार : माेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 06:52 IST

Telangana Assembly Election: तेलंगणाला भारत राष्ट्र समितीच्या कचाट्यातून भाजप साेडविणार असून सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा संकल्प भाजपने केला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी महबूबाबाद येथील प्रचारसभेत केले.

महबूबाबाद : तेलंगणाला भारत राष्ट्र समितीच्या कचाट्यातून भाजप साेडविणार असून सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा संकल्प भाजपने केला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी महबूबाबाद येथील प्रचारसभेत केले.

माेदी यांनी मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर कडाडून टीका केली. ते म्हणाले, तेलंगणातील गरीब आणि तरुणांसाेबत बीआरएसने विश्वासघात केला आहे. अशा लाेकांना साेडणार नाही. लाेकांनी केसीआर सरकारला उखडून फेकण्याचा संकल्प आधीच घेतल्याचे माेदी म्हणाले. 

घराणेशाही असलेल्या पक्षांच्या शासनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था नष्ट हाेते. काॅंग्रेस सत्तेत असताना सतत बाॅम्बस्फाेट व्हायचे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केली. ते म्हणाले, काॅंग्रेस जिथेही सध्या सत्तेत आहे, तिथे पीएफआयसारख्या दहशतवादी संघटनांना प्राेत्साहन मिळते.मी अपसेट होईन, 

टॉवरवर चढू नका...नरेंद्र मोदी यांनी निर्मल येथील जाहीर सभेत आपले भाषण थांबवून लोकांना टॉवरवरून खाली उतरण्याचे आवाहन केले आणि ते पडण्याची भीती व्यक्त केली. ‘मी अपसेट होईन, टॉवरवर चढू नका,’ असे ते म्हणाले. 

ते दाेन्ही पक्ष तेलंगणाचे दाेषीतेलंगणाला उद्ध्वस्त हाेण्यास काॅंग्रेस आणि बीआरएस हे दाेन्ही पक्ष बराेबरीचे दाेषी आहेत. तेलंगणाचे लाेक एका आजारापासून मुक्त हाेण्यासाठी दुसऱ्या राेगाचा प्रसार हाेऊ देणार नाहीत. राज्याचा पुढील मुख्यमंत्री भाजपचा असेल, असा दावाही माेदींनी यावेळी केला.

‘बीआरएस’ला ‘व्हीआरएस’ देण्याची वेळ : अमित शाह- सत्ताधारी बीआरएसला व्हीआरएस देण्याची वेळ आली आहे. तसेच त्यांची गाडी (बीआरएसचे निवडणूक चिन्ह) गॅरेजमध्ये पाठविण्याची वेळ आली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. - २०२४मध्येही नरेंद्र माेदीच हेच पंतप्रधान हाेणार असल्याचा दावाही शाह यांनी केला. हुजुराबाद येथील प्रचारसभेत ते बाेलत हाेते. अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणावरुन शाह यांनी बीआरएस, काॅंग्रेस आणि एमआयएम या तिन्ही पक्षांवर टीकास्त्र साेडले. - हैदराबाद संस्थानाचे १७ सप्टेंबर १९४८ राेजी भारतीय संघराज्यात विलीनीकरण झाले हाेते. मात्र, ओवैसींच्या भीतीमुळे केसीआर हा दिवस ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ म्हणून साजरा करत नाहीत, असा आराेपही शाह यांनी केला.

हैदराबादचे ‘भाग्यनगर’ करू : जी. किशन रेड्डी भाजपची सत्ता आल्यास हैदराबादचे नाव बदलून ‘भाग्यनगर’ करण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष जी. किशन रेड्डी यांनी स्पष्ट केले. एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, मद्रासचे नाव चेन्नई, बाॅम्बेचे मुंबई आणि कलकत्ताचे नाव काेलकाता करण्यात आले, तर हैदराबादचे नाव बदलून ‘भाग्यनगर’ करण्यात काय अडचण आहे? हैदर काेण आहे, कुठून आला, काेणाला त्याची गरज आहे, असा सवाल करून रेड्डी म्हणाले, भाजप सत्तेत आल्यास हैदर नाव हटविण्यात येईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांनीही त्यांच्या तेलंगणातील प्रचार सभांमध्ये हैदराबादचे नाव ‘भाग्यनगर’ आणि महबूबनगरचे नाव ‘पालामुरू’ करायला हवे, असे अनेकदा म्हटले आहे.

टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३Narendra Maharajनरेंद्र महाराजBJPभाजपाBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती