शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

Bharat Jodo Yatra : 'काश्मीरमधील स्थिती चांगली, तर लाल चौकात पायी का जात नाही'? राहुल गांधींच अमित शाहंना खुलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 23:52 IST

चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादावरूनही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले.

काँग्रेसचीभारत जोडो यात्रा रविवारी श्रीनगर येथे पोहोचली आहे. येथे यात्रेचे संयोजक राहुल गांधी यांनी तिरंगा ध्वज फडकावला. यानंतर, पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी राहुल गांधी यांनी गृह मंत्री अमित शाह यांना खुले आव्हान दिले.  ते म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग आणि ब्लास्ट होत आहेत. जर सुरक्षा व्यवस्था एवढी चांगली असेल, तर भाजप, लाल चौकातून जम्मूपर्यंत यात्रा का करत नाही. गृह मंत्री अमित शाह जम्मू ते काश्मीरपर्यंत पदयात्रा का करत नाहीत? येथील सुरक्षा व्यवस्था ठीक आहे, असे मला वाटत नाही.

चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादावरूनही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. राहुल गांधी म्हणाले की, मी निवृत्त सैनिक आणि लडाखमधील जनतेची भेट घेतली. ते म्हणाले की चीनने आपली 2000 चौरस किमी जमीन घेतली आहे. भारतातील अनेक पेट्रोलियम केंद्रांवरही चीनने ताबा घेतला आहे. सरकारने या गोष्टी नाकारणे अत्यंत धोकादायक आहे. यामुळे चीनचे मनोबल आणखी वाढेल.

यावेळी राहुल गांधींनी विरोधकांच्या एक्यासंदर्भातही भाष्य केले. विरोधी पक्षांमध्ये जी एकता येते, ती बोलण्यातून येते. विरोधक विखुरले आहेत असे म्हणणे योग्य नाही. विरोधकांमध्ये मतभेद नक्कीच आहेत, पण विरोधक एकत्र लढतील. ही विचारधारेची लढाई आहे. एका बाजूला आरएसएस-भाजप आहे, तर दुसऱ्या बाजूला बिगर आरएसएस-भाजपवाले आहेत, असेही राहुल यांनी म्हटले आहे.

यात्रा येथेच संपत नाही, ही तर सुरुवात - यावेळी राहुल गांधी यांनी 'भारत जोडो' यात्रेसंदर्भातील आपले अनुभवही सांगितले. ते म्हणाले, या यात्रेचा भारतीय राजकारणावर प्रभाव पडेल, पण  हा काय असेल हे मी सांगू शकत नाही. ते म्हणाले, या यात्रेतून बरेच काही शिकायला मिळाले. लोकांना एकत्र आणणे आणि द्वेष संपवणे, असा या यात्रेचा उद्देश होता. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. एवढेच नाही तर हा माझ्या आयुष्यातील सर्वात सर्वोत्तम अनुभव आहे. यात्रा येथेच संपत नाही, तर हे पहिले पाऊल आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीरSrinagarश्रीनगर