शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

मंदिरातील विहिरीचे छत कोसळले; ४० फूट खोल पाण्यात १४ बुडाले, मृतांत १० महिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 06:01 IST

इंदूरमधील आनंदाेत्सव क्षणात बदलला दु:खात, मृतांत १० महिला

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर शहरात बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात रामनवमीचा आनंदोत्सव एका क्षणात दु:खात बदलला. मंदिरातील एका विहिरीवरील छत अचानक कोसळून त्यावर उभे असलेले ३० भाविक ४० फूट खोल पाण्यात पडले. त्यातील १४ जणांचा बुडून मृत्यू झाला असून त्यामध्ये १० महिलांचा समावेश आहे.

राष्ट्रपती द्राैपदी मुर्मु आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनाग्रस्तांना शक्य ती सर्व मदत तातडीने करण्याचा आदेश शिवराजसिंह चौहान यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून दिला. हे मंदिर ६० वर्षे जुने आहे. छत काेळल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या रक्षकांनी व नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. विहिरीतील पाण्याचा पंपांद्वारे उपसा करण्याचे कामही हाती घेण्यात आले होते. (वृत्तसंस्था)

...म्हणून घडला अपघात

रामनवमीनिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमात बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरामध्ये मोठ्या संख्येने भाविक आले होते. त्यातील काही भाविक या मंदिरातील विहिरीवर असलेल्या छतावर उभे होते. मात्र हे छत इतके वजन पेलू न शकल्याने कोसळले व ३० भाविक विहिरीत पडले. त्यामुळेच गोंधळ उडाला.

मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी ५ लाखांची मदत

विहिरीत कोसळून पाण्यात बुडून मृत्यू झालेल्यांच्या वारसदारांना प्रत्येकी पाच लाख रुपये व जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश त्यांनी दिले.

आंध्रच्या मंदिरातील मंडप जळून खाक

आंध्र प्रदेशमधील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील वेणुगोपाल मंदिरातील मंडपाला रामनवमीच्या दिवशी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यामध्ये हा मंडप जळून खाक झाला व मंदिराच्या वास्तूचेही नुकसान झाले आहे. रामनवमीनिमित्त मंदिरात भाविकांची गर्दी उसळली असतानाच ही घटना घडली. त्यामुळे जीव वाचविण्यासाठी व मंदिरातून बाहेर पडण्याकरिता भाविकांनी धावपळ सुरू केली. त्यामुळे मंदिरात काही वेळ विलक्षण गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सुदैवाने या आगीत प्राणहानी झालेली नाही. 

टॅग्स :Deathमृत्यूRam Navamiराम नवमी