शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 12:27 IST

अहमदाबाद येथे झालेल्या दुर्घटनेमुळे शेकडो कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

कॅप्टन नीलेश गायकवाड माजी वैमानिक

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया फ्लाइट एआय-१७१ या बोइंग ७८७ ड्रीमलाइनरच्या विमानाच्या अपघाताकडे आधुनिक नागरी विमानसेवेतील भारतातील सर्वात गंभीर दुर्घटना म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे. बोइंग ७८७ ड्रीमलाइनर हे आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज विमान असूनही ही दुर्घटना घडल्यामुळे केवळ भारतातच नव्हे तर जगभरातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आज घडीला हवाई सुरक्षेतील तंत्रज्ञान कमालीचे प्रगत झाले आहे. ‘ब्लॅक बॉस’, ‘एव्हियोनिस’, ‘ऑटोमेटेड फ्लाइट सिस्टम्स’, ‘वेदर रेडार’, ‘टीसीएएस’ (ट्रॅफिक कोलिजन अवॉइडन्स सिस्टम) यांसारख्या तंत्रांमुळे अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी झाली.  पण तरीही छोटीशी चूक किंवा हलगर्जीपणा किती महाभीषण ठरू शकतो, हे अहमदाबादच्या दुर्घटनेने दाखवून दिले आहे. हवाई अपघात केवळ तांत्रिक वा व्यवस्थापकीय त्रुटींचा परिणाम नसतो, तर तो मानवी समाजावर खोल परिणाम करणारा धक्का असतो. शेकडो कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळतो. राष्ट्राच्या मानसिकतेवर, सरकारी विश्वासार्हतेवर आणि विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम होता.

विमानाने उड्डाण केल्यानंतर काही सेकंदांतच  मेडे म्हणजेच आपत्ती कॉल दिला गेला. मात्र, त्यानंतर कोणतीही अधिकृत माहिती किंवा सिग्नल मिळाला नाही.  विमान उंची गाठण्यात अडचण येत होती असे बचावलेल्या एका प्रवाशाने सांगितले आहे. कोणत्याही विमानाला उड्डाण करण्यासाठी वैमानिकाला लिफ्ट जनरेट करावी लागते. म्हणजेच सुरुवातीला खूप वेगानं विमान वर न्यावं लागतं. प्रत्येक विमानाच्या प्रकारानुसार, आकारानुसार हा वेग ठरत असतो. या विशिष्ट वेगापर्यंत पोहोचल्यानंतर पुढील उड्डाणासाठी निर्धारित वेग मिळाला तर विमान वरच्या दिशेला झेपावते. आताच्या दुर्घटनाग्रस्त ड्रीमलायनरमध्ये लिफ्ट न मिळाल्यामुळे ते पडले की निर्धारित वेग मिळाला नाही, त्यादरम्यान वैमानिकाचं टॉवरसोबत काय बोलणं झालं या सर्व बाबींवर ब्लॅकबॉक्समधील डेटाचे अवलोकन केल्यानंतर प्रकाश पडेल. पण प्रामुख्याने वेग कमी होणे किंवा इंजिनमधील क्षमता कमी पडणे या गोष्टी कारणीभूत असू शकतात. लिफ्ट ही एअरोडायनॅमिक शक्ती असते. विमानाच्या पंखांवरून हवा वेगाने वाहिल्याने ती निर्माण होते आणि तीच विमानाला हवेत उचलून नेते. ही नैसर्गिक लिफ्ट बर्नोलीचे तत्त्व आणि न्यूटनचे गती नियम यावर आधारित असते.  

मुद्द्याची गोष्ट : अहमदाबाद येथे घडलेल्या भीषण विमान अपघाताची नोंद इतिहासात होईल. कारण अत्यंत उच्च तंत्रज्ञान असलेल्या अत्याधुनिक अशा विमानाचा हा असा पहिलाच अपघात होता. बोइंगच्या विमानांकडे यामुळे संशयाने बघितले जात आहे. आता अपघाताच्या कारणाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. नेमका अपघात का झाला? हा ‘ड्रीम’ प्रश्न कायम आहे.

वैमानिक शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत होते... पण अनर्थ घडलाचकाही विशिष्ट अवस्थांमध्ये विशेषतः विमानाच्या उड्डाण व लँडिंगच्या वेळी लिफ्ट वाढविण्याची गरज भासते. अशावेळी विमानांमध्ये काही विशेष प्रणाली वापरली जाते. त्यांना आर्टिफिशियल लिफ्ट सिस्टम म्हणतात. यामध्ये मुख्यत्वेकरून हाय-लिफ्ट डिव्हाइसेस म्हणजे उड्डाणाच्या वेळी अतिरिक्त लिफ्ट निर्माण करणारी यंत्रणा महत्त्वाची असते. यामध्ये फ्लॅप्स आणि स्लॅट्स असतात. फ्लॅप्स पंखांच्या मागील बाजूस असतात.

उड्डाण किंवा लँडिंगवेळी हे फ्लॅप्स खाली व पुढे सरकवले जातात, ज्यामुळे पंखांचा पृष्ठभाग आणि वक्रता वाढून अधिक लिफ्ट निर्माण होते. दुसरीकडे, स्लॅट्स हे पंखांच्या पुढील टोकाला असतात. ते उघडल्यावर पंखाभोवती हवा अधिक सुरळीत वाहू लागते व स्टॉल (विमान हवेत स्थिर होणे) टाळता येतो. बोइंग ७८७ ड्रीमलाइनरसारख्या जेटलाइनर विमानांमध्ये क्रूगर फ्लॅप्स हे विशेष प्रकारचे स्लॅट्सदेखील वापरले जातात. 

ते पंखांच्या पुढील भागातून बाहेर येतात आणि टेकऑफच्या वेळी लिफ्ट वाढवतात. असे असूनही हे विमान कोसळले, याचा अर्थ हायड्रोलिक फ्लॅपमध्ये काही तरी बिघाडच किंवा समस्या निर्माण झालेली असण्याची शक्यता आहे. सदर विमान खाली कोसळताना त्याचे नोज म्हणजेच पुढील भाग वर होता आणि टेल म्हणजेच मागील भाग खाली होता. यावरून वैमानिक शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत होते हे लक्षात येते.  

...तर पायलटला वेळच मिळत नाहीबोइंग ७८७ मध्ये दोन स्वतंत्र इंजिन्स असतात. एक इंजिन बंद पडले तरी दुसरे इंजिन विमान उडवू शकते. मात्र, जर दोन्ही इंजिनचे कार्य एकाचवेळी बंद पडले, तर परिस्थिती गंभीर बनते. अहमदाबाद दुर्घटनेत असे घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. टेकऑफनंतर काही सेकंदांतच जर इंजिनमध्ये ‘पॉवर लॉस’ झाला असेल, तर पायलटला प्रतिसाद देण्याचा वेळच मिळत नाही. कधी कधी इंधन वितरण प्रणालीतील बिघाडामुळे इंजिनला योग्य प्रमाणात इंधन न मिळाल्याने इंजिन बंद पडते. बोइंग ७८७ मध्ये अत्यंत सुस्पष्ट फ्यूएल मीटरिंग प्रणाली असते.

पण जर ती ब्लॉक झाली,  तर इंजिन शटडाऊन होऊ शकते. तापमानामुळे इंजिन बंद पडले असू शकते का? काही जणांनी अहमदाबादमध्ये अपघाताच्या दिवशी तापमान ४० डिग्री सेल्सियस होते, याचा संबंध दुर्घटनेशी जोडला आहे; परंतु  ड्रीमलाइनरचे इंजिन स्वतः २००० अंश तापमान झेलण्यास सक्षम असते, त्यामुळे फक्त तापमानामुळे इंजिन बंद पडले असण्याची शक्यता दिसत नाही. उड्डाणानंतर काही वेळात लँडिंग गिअर फोल्ड केले जातात. मात्र या अपघातावेळी ते उघडे होते.  

या अपघातामागे नेमकी कोणती गोष्ट कारणीभूत आहे हे पुढील काही दिवसांमध्ये ब्लॅकबॉक्स डेटा आणि फ्लाइट रेकॉर्डरच्या विश्लेषणातून समोर येईल. तूर्त, हा विमान अपघात भावनिक आणि धोरणात्मक दृष्टिकोनातूनही भारतासाठी आणि आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण उद्योगासाठी एक मोठा धक्का आहे.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबाद