शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
2
"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
3
गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करणार; सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
4
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
5
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
6
Crime News : संतापजनक! महिलेला घरी सोडतो सांगून जंगलात घेऊन गेले; तिघांकडून सामुहिक बलात्कार, जळगावातील घटना
7
आजपासून IPO गुंतवणुकीसाठी खुला, लॅपटॉप रिपेअरिंगमधून कोट्यवधी कमावते कंपनी; GMP ₹१०० पेक्षाही जास्त
8
पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळीची चाचणी यशस्वी; शरीरात गेल्यावर कसं करते काम?
9
टँक फुल अन् आंबा घाटापर्यंतचा प्रवास! स्कोडा कायलॅकने चकीत केले; परत पुण्यात येताना एवढे मायलेज दिले...
10
"मी म्हटलं गणपती स्वत: मला घ्यायला येईल आणि खरंच...", संकर्षणने सांगितला गणपतीपुळ्याचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग
11
कष्टाचं फळ! हात मोडला, दीड वर्ष शाळा सोडली, स्टेशनवर राहण्याची आली वेळ; होणार डॉक्टर
12
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
13
Wife Crime: तिने पतीला घरातच पुरलं, पण एका चुकीमुळे सगळं उघडं पडलं; नालासोपारातील हत्येची Inside Story
14
टाटा, LG, PhonePe सह अनेक कंपन्यांचे IPO येणार! 'या' वर्षातील सर्वात मोठा IPO हंगाम, बंपर कमाईची संधी!
15
हे आहेत ८८ वर्षांचे माजी IPS अधिकारी, रोज सकाळी स्वच्छतेसाठी उतरतात रस्त्यावर; Video पाहून तुम्हीही भावुक व्हाल...
16
जॉब सोडला अन् शेती केली, MBA पास तरुणीची कमाल; टोमॅटो विकून करतेय कोट्यवधींची कमाई
17
"मराठीसारखं काम करु नका यार", हिंदी दिग्दर्शकाचं बोलणं ऐकून छाया कदमने शूटिंगच थांबवलं
18
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला तुमच्यावरही होऊ शकते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतकथा आणि लाभ!
19
'वृत्तपत्रातून पती-सासऱ्याची माफी मागा', पदाचा गैरवापर करणाऱ्या IPS पत्नीला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
20
Crime News : पत्नी पतीसमोर प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवायची; नाराज पतीने उचलले टोकाचे पाऊल

राजीनाम्यानंतर जगदीप धनखड यांचे निरोपाचे भाषण का झालं नाही? समोर आलं हे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 21:03 IST

उपराष्टपती पद सोडल्यानंतर जगदीप धनखड यांचा निरोप समारंभ न झाल्याने विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Jagdeep Dhankhar Farewell: भारताचे १४ वे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलैच्या रात्री आपल्या पदाचा राजीनामा दिला. जगदीप धनखड यांचा कार्यकाळ ऑगस्ट २०२७ पर्यंत होता, मात्र त्यांनी दोन वर्षे आधीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला.  प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचं जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं. मात्र राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जगदीप धनखड राज्यसभेत आले नाहीत. तसेच सभागृहाकडूनही त्यांना अधिकृत निरोप देण्यात आला नाही. यामुळे विरोधकांनी सवाल उपस्थित केले. त्यामुळे आता येणाऱ्या काळात त्यांना सरकारकडून निरोप दिला जाईल का? असा प्रश्न विचारला जात आहे.

सोमवारी रात्री उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या एका पत्रात आरोग्यासंबंधी कारणे आणि उपचार घेण्याच्या सल्ल्याची माहिती देत आपल्या पदाचा राजीनामा दिला. आरोग्य सेवेला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी, मी भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा तात्काळ राजीनामा देत आहे, असं जगदीप धनखड म्हणाले. जगदीप धनखड यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे.

जगदीप धनखड यांनी ११ ऑगस्ट २०२२ रोजी भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. उपराष्ट्रपती होण्यापूर्वी ते २०१९ पासून पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. उपराष्ट्रपती असताना त्यांनी राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून भूमिका बजावली. या भूमिकेत त्यांनी सभागृहाचे कामकाज चालवले आणि अनेकदा कायदेविषयक प्रक्रियांवर त्यांचे स्पष्ट मत व्यक्त केले होते. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात त्यांनी राजीनामा दिला.

जगदीप धनखड यांचा निरोप समारंभ न झाल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. मात्र इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, जर कोणी मध्यावधीत म्हणजेच कार्यकाळ संपण्यापूर्वी राजीनामा दिला तर निरोप भाषणाची तरतूद नाही. जेव्हा कोणी त्याचा कार्यकाळ पूर्ण करतो तेव्हाच निरोप दिला जातो. ऑगस्ट २०२२ मध्ये पदभार स्वीकारणारे ७४ वर्षीय धनखड यांचा कार्यकाळ २०२७ मध्ये पूर्ण होणार होता.

दरम्यान, संविधानाच्या कलम ६७(अ) नुसार उपराष्ट्रपतींना त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी स्वतःच्या इच्छेनुसार राजीनामा देण्याचा अधिकार आहे. या अंतर्गत, उपराष्ट्रपती आपला राजीनामा राष्ट्रपतींना लेखी स्वरूपात पाठवतात. त्यामुळे उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यानंतर, नवीन उपराष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया शक्य तितक्या लवकर सुरू केली जाणार आहे. दरम्यान, राज्यसभेचे कामकाज उपसभापती म्हणजेच हरिवंश नारायण सिंह यांच्याकडून चालवले जाणार आहे. 

टॅग्स :jagdeep dhankharजगदीप धनखडNarendra Modiनरेंद्र मोदी