शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 23:44 IST

Pakistan News: बलुचिस्तान नॅशनल पार्टीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अख्तर मेंगल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानी सैन्याने १९७१ च्या युद्धात झालेला लाजीरवाणा पराभव आणि ९० हजार सैनिकांनी केलेल्या आत्मसमर्पणाला विसरता कामा नये. केवळ त्यांची शस्त्रास्त्रेच नाही तर त्यांचे पायजमेसुद्धा आज तिथेच टांगलेले आहेत.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढला आहे. तसेच भारताने आक्रमक कारवाईचा इशारा दिल्यानंतर पाकिस्तानी लष्कराकडून मोठी धावपळ सुरू झालेली आहे. एकीकडे भारताचं आव्हान असतानाच दुसरीकडे अंतर्गत बंडखोरांनीही पाकिस्तानच्या लष्कराचा जेरीस आणलं आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी देशांतर्गत बंडखोरांना इशारा देताना बलुचिस्तान हा पाकिस्तानचा मुकुटमणी असून, पुढच्या १० पिढ्या सुद्धा त्याला वेगळा करू शकणार नाहीत, असे म्हटले होते.

त्याला आता बलुचिस्तान नॅशनल पार्टीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अख्तर मेंगल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानी सैन्याने १९७१ च्या युद्धात झालेला लाजीरवाणा पराभव आणि ९० हजार सैनिकांनी केलेल्या आत्मसमर्पणाला विसरता कामा नये. केवळ त्यांची शस्त्रास्त्रेच नाही तर त्यांचे पायजमेसुद्धा आज तिथेच टांगलेले आहेत.

त्यांनी सांगितले की, पाकिस्तानी लष्कर बलुचींना १० पिढ्यांपर्यंत शिक्षा देण्याचा इशारा देत आहे. मात्र पाकिस्तानी सैन्याच्या किती पिढ्या बंगाल्यांकडून झालेल्या त्या ऐतिहासिक पराभवाला आठवणीत ठेवत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अख्तर मेंगल पुढे म्हणाले की, बलूच जनता मागच्या ७५ वर्षांपासून पाकिस्तानी लष्कर आणि सरकारचे अत्याचार सहन करत आहे. आम्ही असे लोक आहोत जे तुमच्याकडून झालेल्या प्रत्येक अत्याचाराची आठवण ठेवणारे आहोत. तसेच तुमच्या कुठल्याही धमक्यांना आम्ही घाबरत नाही, असा इशाराही मेंगल यांनी दिला.  

 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानBangladeshबांगलादेशIndiaभारत