शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 23:44 IST

Pakistan News: बलुचिस्तान नॅशनल पार्टीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अख्तर मेंगल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानी सैन्याने १९७१ च्या युद्धात झालेला लाजीरवाणा पराभव आणि ९० हजार सैनिकांनी केलेल्या आत्मसमर्पणाला विसरता कामा नये. केवळ त्यांची शस्त्रास्त्रेच नाही तर त्यांचे पायजमेसुद्धा आज तिथेच टांगलेले आहेत.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढला आहे. तसेच भारताने आक्रमक कारवाईचा इशारा दिल्यानंतर पाकिस्तानी लष्कराकडून मोठी धावपळ सुरू झालेली आहे. एकीकडे भारताचं आव्हान असतानाच दुसरीकडे अंतर्गत बंडखोरांनीही पाकिस्तानच्या लष्कराचा जेरीस आणलं आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी देशांतर्गत बंडखोरांना इशारा देताना बलुचिस्तान हा पाकिस्तानचा मुकुटमणी असून, पुढच्या १० पिढ्या सुद्धा त्याला वेगळा करू शकणार नाहीत, असे म्हटले होते.

त्याला आता बलुचिस्तान नॅशनल पार्टीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अख्तर मेंगल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानी सैन्याने १९७१ च्या युद्धात झालेला लाजीरवाणा पराभव आणि ९० हजार सैनिकांनी केलेल्या आत्मसमर्पणाला विसरता कामा नये. केवळ त्यांची शस्त्रास्त्रेच नाही तर त्यांचे पायजमेसुद्धा आज तिथेच टांगलेले आहेत.

त्यांनी सांगितले की, पाकिस्तानी लष्कर बलुचींना १० पिढ्यांपर्यंत शिक्षा देण्याचा इशारा देत आहे. मात्र पाकिस्तानी सैन्याच्या किती पिढ्या बंगाल्यांकडून झालेल्या त्या ऐतिहासिक पराभवाला आठवणीत ठेवत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अख्तर मेंगल पुढे म्हणाले की, बलूच जनता मागच्या ७५ वर्षांपासून पाकिस्तानी लष्कर आणि सरकारचे अत्याचार सहन करत आहे. आम्ही असे लोक आहोत जे तुमच्याकडून झालेल्या प्रत्येक अत्याचाराची आठवण ठेवणारे आहोत. तसेच तुमच्या कुठल्याही धमक्यांना आम्ही घाबरत नाही, असा इशाराही मेंगल यांनी दिला.  

 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानBangladeshबांगलादेशIndiaभारत