शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 08:32 IST

ग्रामविकास मंत्रालयाच्या मते, २०१६ मध्ये योजना सुरू झाल्यापासून मंजूर झालेल्या ४०.८२ लाख घरांपैकी केवळ १३.८० लाख घरे पूर्ण झाली आहेत.

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०२२ पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला पक्के घर देण्याचे आश्वासन मुदत संपून तीन वर्षे उलटूनही महाराष्ट्रात अजूनही पूर्ण झालेले नाही. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (पीएमएवाय-जी) अंतर्गत मंजूर केलेली २७ लाखांहून अधिक घरे राज्यात अजूनही अपूर्ण आहेत.

ग्रामविकास मंत्रालयाच्या मते, २०१६ मध्ये योजना सुरू झाल्यापासून मंजूर झालेल्या ४०.८२ लाख घरांपैकी केवळ १३.८० लाख घरे पूर्ण झाली आहेत. प्रत्येक तीन घरांपैकी जवळजवळ दोन घरे अपूर्ण राहिली आहेत. या अपूर्ण घरांमध्ये यवतमाळ व नांदेड हे जिल्हे सर्वात मागे आहेत. यवतमाळमध्ये मंजूर २.३८ लाख घरांपैकी केवळ ६२,७८५ घरे पूर्ण झाली असून सुमारे १.७५ लाख घरे अजूनही रखडली आहेत. नांदेडमध्ये मंजूर २.७५ लाख घरांपैकी केवळ ६३,८१९ घरेच पूर्ण झाली आहेत.

सरकारने २०२८-२९ पर्यंत या योजनेचा विस्तार केला. यात आणखी दोन कोटी घरांची भर पडली आहे. तरीही महाराष्ट्रात अंमलबजावणी समाधानकारक नाही. ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांची ओळख निश्चित करण्यासाठी मोबाइल ॲप वापरून एक नवीन सर्वेक्षण सुरू केले आहे. मात्र लाखो ग्रामीण कुटुंबांसाठी पक्के घर हे स्वप्न फक्त स्वप्नच राहिले आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण गृहनिर्माण संकट हे केवळ संख्येपुरते मर्यादित नाही. तर, ही चुकलेल्या वेळेची, दुर्गम भागातील वाढत्या निराशेची कहाणी आहे.

चिंता कुठे ?बीड, परभणी, बुलढाणा आणि नाशिक यांसारख्या जिल्ह्यांमध्येही चिंताजनक आकडेवारी आहे, प्रत्येक जिल्ह्यात एक लाखाहून अधिक घरे अद्याप अपूर्ण आहेत. याउलट, नंदुरबार जिल्ह्यात सर्वोत्तम कामगिरी झाली आहे. त्यांनी २.५१ लाख मंजूर घरांपैकी १.१५ लाख घरे पूर्ण केली आहेत. म्हणजेच घरे पूर्ण होण्याची टक्केवारी ४५ टक्के इतकी आहे.

 

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना