शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

देशाला गप्प बसवून प्रश्न सुटणार नाहीत! सोनिया गांधी यांचा केंद्र सरकारवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 11:48 IST

काँग्रेस संसदीय समितीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारवर टीका केली.

नवी दिल्ली :

काँग्रेस संसदीय समितीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारवर टीका केली. देशाला गप्प बसवून देशासमोरील प्रश्नांची सोडवणूक होणार नाही, असे त्या म्हणाल्या. पंतप्रधानांनी जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवर मौन बाळगले आहे. त्यांच्या सरकारच्या कामकाजाचा कोट्यवधी लोकांच्या  जीवनावर परिणाम होताे. तथापि, मोठ्या मुद्द्यांवर जेव्हाही न्याय्य प्रश्न विचारण्यात येतो, तेव्हा पंतप्रधान त्यावर  मौन बाळगतात, असे त्यांनी म्हटले. 

एका लेखात सोनिया गांधींनी सरकारवर संसदेतील विरोधकांचा आवाज दाबणे, यंत्रणांचा गैरवापर करणे, माध्यमांचे स्वातंत्र्य संपवणे, देशात द्वेष, हिंसाचाराचे वातावरण निर्माण करणे, असे आरोप केले आहेत.

देशात द्वेष, हिंसाचाराचे वातावरणभाजप व आरएसएसच्या लोकांनी देशात द्वेष व हिंसाचाराला प्रोत्साहन दिले असून, हे प्रमाण वाढले आहे.  पंतप्रधान त्याकडे दुर्लक्ष करत आहेत, असे सोनिया गांधी म्हणाल्या. धार्मिक सण हे आता आनंदाचे व उत्सवाचे सण राहिलेले नाहीत तर इतरांना धमकाविण्याची, त्रास देण्याची संधी बनले आहेत, असेही त्या म्हणाल्या.

काँग्रेस समविचारी पक्षांशी युती करणारराज्यघटनेच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष सर्व समविचारी पक्षांसोबत काम करण्यास तयार आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या. सरकार भारतीय लोकशाहीचे तीनही स्तंभ विधिमंडळ, कार्यपालिका व न्यायपालिका नष्ट करत असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधी पक्षांची एकजूट आवश्यक असल्याचे सांगताना राज्यघटना आणि आदर्शांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस समविचारी पक्षांसोबत युती करण्यास तयार आहे, असे त्या म्हणाल्या.

मला धमकावून तुम्ही रोखू शकत नाही : राहुल गांधी‘भाजपने खासदारकीचे पद काढून घेतल्याने आपल्याला वायनाडच्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्यापासून रोखता येणार नाही किंवा धमकावून प्रश्न उपस्थित करण्यापासून रोखता येणार नाही’, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी येथे केली. वायनाड मतदारसंघातील जाहीरसभेत गांधी बोलत होते. खासदार म्हणून अपात्र झाल्यानंतर मतदारसंघात ते पहिल्यांदाच आले होते. त्यांचे नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी हजारो लोकांनी उपस्थिती होती.

‘प्रश्न विचारतात म्हणून राहुल गांधी यांच्यावर संपूर्ण भाजपने निर्दयीपणे शाब्दिक हल्ले केले आणि पंतप्रधानांनाही त्यांची बदनामी करणे योग्य वाटते, कारण ते उत्तर देऊ शकत नाहीत. प्रश्न विचारणे आणि मुद्दे मांडणे हे संसद सदस्याचे कर्तव्य असते. खासदार म्हणून त्यांचे भवितव्य न्यायालयाच्या हाती आहे; पण ते प्रश्न विचारत राहतील’, - प्रियांका गांधी, काँग्रेस सरचिटणीस

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधी