शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
2
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
3
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
4
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
5
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
6
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
7
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
8
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
9
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
10
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
11
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
12
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
14
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
15
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
16
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
17
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
18
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
19
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
20
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल

Air India: प्रवेश नाकारल्याने विमान ‘मिस’ झाले, महिलेला ‘पॅनिक अटॅक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 05:48 IST

नवी दिल्लीतील घटना : व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी प्रवेश नाकारल्याने एका मध्यमवर्गीय महिलेला ‘पॅनिक अटॅक’ आला आणि ती बोर्डिंग गेटसमोरच जमिनीवर पडली. गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी बोर्डिंग गेटमधून प्रवेश करू न दिल्याने घाबरल्यामुळे महिलेसोबत ही घटना घडली, असा आरोप या महिलेच्या नातेवाईकाने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये केला आहे. 

वैद्यकीय मदत नाही, उलट विमानतळावरुन जाण्यास सांगितलेमहिला आणि तिच्यासोबत असलेल्या दोन प्रवाशांना विमानतळावर सिक्युरिटी गेटमधून चेक-इन करताना काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी आधीच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांकडे वेळेत चेक-इन करण्यासाठी मदत मागितली. पण, ते आमचं काम नाही असं म्हणत कर्मचाऱ्यांनी नकार दिला. अखेरीस चेक-इन केल्यानंतर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांशी पुन्हा संपर्क साधून आमच्या सोबत हृदय आणि मधुमेहाची रुग्ण असलेली महिला आहे, त्यामुळे आम्हाला बोर्डिंग गेटपर्यंत पोहोचण्यास ५ मिनिटे लागतील असे कळवले. पण तरीही बोर्डिंग गेट बंद करण्यात आला आणि आम्हाला प्रवेश नाकारला. महिलेच्या मुलाची त्याच दिवशी अंतिम परीक्षा होती, त्याबाबत विचार करुन त्यांना पॅनिट अटॅक आला आणि त्या बेशुद्ध झाल्या. शिवाय वैद्यकीय मदत देण्याऐवजी विमानतळावरून निघून जा, असे एअर इंडियाकडून सांगण्यात आले, असा आरोप महिलेच्या नातेवाईकाने सोशल मीडिया पोस्टमध्ये केला आहे. 

बोर्डिंग गेट बंद करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा प्रवाशांच्या नावाची घोषणा केली, पण महिला आणि दोन प्रवासी गेट बंद झाल्यानंतर आले होते, असे स्पष्टीकरण एअर इंडियाने दिले आहे. 

...तर आम्ही विमानाला उशीर करू शकत नाहीn    बोर्डिंग गेट बंद करण्यापूर्वी आमच्या कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा त्या तीन प्रवाशांच्या नावाची घोषणा केली, पण ते प्रवासी गेट बंद झाल्यानंतर आले होते. n    महिलेला जमिनीवर पडल्याचं बघताच लगेचच डॉक्टरांना बोलावण्यात आले, परंतु तोपर्यंत त्यांना बरे वाटू लागले आणि त्यांनी कोणतीही वैद्यकीय किंवा व्हीलचेअर मदत नाकारली. n    एअर इंडिया नेहमीच प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देते. तथापि, एक जबाबदार विमान कंपनी म्हणून, आम्ही नियामक प्राधिकरणांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागते आणि कोणत्याही परिस्थितीत, विशेषत: सर्व प्रवासी वेळेवर आले असतील तर आम्ही विमानाला उशीर करू शकत नाही.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया