शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Air India: प्रवेश नाकारल्याने विमान ‘मिस’ झाले, महिलेला ‘पॅनिक अटॅक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 05:48 IST

नवी दिल्लीतील घटना : व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी प्रवेश नाकारल्याने एका मध्यमवर्गीय महिलेला ‘पॅनिक अटॅक’ आला आणि ती बोर्डिंग गेटसमोरच जमिनीवर पडली. गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी बोर्डिंग गेटमधून प्रवेश करू न दिल्याने घाबरल्यामुळे महिलेसोबत ही घटना घडली, असा आरोप या महिलेच्या नातेवाईकाने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये केला आहे. 

वैद्यकीय मदत नाही, उलट विमानतळावरुन जाण्यास सांगितलेमहिला आणि तिच्यासोबत असलेल्या दोन प्रवाशांना विमानतळावर सिक्युरिटी गेटमधून चेक-इन करताना काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी आधीच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांकडे वेळेत चेक-इन करण्यासाठी मदत मागितली. पण, ते आमचं काम नाही असं म्हणत कर्मचाऱ्यांनी नकार दिला. अखेरीस चेक-इन केल्यानंतर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांशी पुन्हा संपर्क साधून आमच्या सोबत हृदय आणि मधुमेहाची रुग्ण असलेली महिला आहे, त्यामुळे आम्हाला बोर्डिंग गेटपर्यंत पोहोचण्यास ५ मिनिटे लागतील असे कळवले. पण तरीही बोर्डिंग गेट बंद करण्यात आला आणि आम्हाला प्रवेश नाकारला. महिलेच्या मुलाची त्याच दिवशी अंतिम परीक्षा होती, त्याबाबत विचार करुन त्यांना पॅनिट अटॅक आला आणि त्या बेशुद्ध झाल्या. शिवाय वैद्यकीय मदत देण्याऐवजी विमानतळावरून निघून जा, असे एअर इंडियाकडून सांगण्यात आले, असा आरोप महिलेच्या नातेवाईकाने सोशल मीडिया पोस्टमध्ये केला आहे. 

बोर्डिंग गेट बंद करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा प्रवाशांच्या नावाची घोषणा केली, पण महिला आणि दोन प्रवासी गेट बंद झाल्यानंतर आले होते, असे स्पष्टीकरण एअर इंडियाने दिले आहे. 

...तर आम्ही विमानाला उशीर करू शकत नाहीn    बोर्डिंग गेट बंद करण्यापूर्वी आमच्या कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा त्या तीन प्रवाशांच्या नावाची घोषणा केली, पण ते प्रवासी गेट बंद झाल्यानंतर आले होते. n    महिलेला जमिनीवर पडल्याचं बघताच लगेचच डॉक्टरांना बोलावण्यात आले, परंतु तोपर्यंत त्यांना बरे वाटू लागले आणि त्यांनी कोणतीही वैद्यकीय किंवा व्हीलचेअर मदत नाकारली. n    एअर इंडिया नेहमीच प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देते. तथापि, एक जबाबदार विमान कंपनी म्हणून, आम्ही नियामक प्राधिकरणांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागते आणि कोणत्याही परिस्थितीत, विशेषत: सर्व प्रवासी वेळेवर आले असतील तर आम्ही विमानाला उशीर करू शकत नाही.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया