शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 07:39 IST

Air India : एकाच दिवसात एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची ही दुसरी घटना आहे.

एअर इंडिया या विमान कंपनीचे शुक्लकाष्ट संपतच नाहीये. रविवार, ३ ऑगस्ट रोजी भुवनेश्वरहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान 'एआय ५००' उड्डाणापूर्वी केबिनमधील वाढलेल्या तापमानामुळे रद्द करण्यात आले. एकाच दिवसात एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची ही दुसरी घटना आहे. नुकत्याच झालेल्या ऑडीटमध्ये विमान वाहतूक सुरक्षा नियामक डीजीसीएला टाटा समूहाद्वारे चालवल्या जाणाऱ्या एअर इंडियामध्ये १०० हून अधिक उल्लंघने आढळली आहेत, ज्यात काही गंभीर सुरक्षा धोक्यांचा समावेश आहे. हा अहवाल समोर आला असतानाच ही घटना घडली आहे.

एअर इंडियाने रद्द झालेल्या या विशिष्ट विमानातील प्रवाशांची संख्या, विमानाचा प्रकार किंवा त्याची नियोजित प्रस्थान वेळ याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइटच्या माहितीनुसार, हे विमान एअरबस ए३२१ प्रकारचे होते आणि दुपारी १२.३५ वाजता उड्डाण करून दिल्लीत दुपारी २.५५ वाजता पोहोचणार होते.

एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, "३ ऑगस्ट (रविवार) रोजी भुवनेश्वरहून दिल्लीला जाणारी फ्लाइट एआय ५०० ही तांत्रिक समस्येमुळे रद्द करण्यात आली आहे, ज्यामुळे प्रस्थानापूर्वी केबिनचे तापमान खूप जास्त झाले होते. भुवनेश्वरमधील आमची विमानतळ टीम प्रभावित प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थान अर्थात दिल्लीला जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यास मदत करत आहे. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत."

या घटनेच्या काही काळापूर्वी, एअर इंडियाची सिंगापूरहून चेन्नईला जाणारी फ्लाइट एआय ३४९ देखील प्रस्थानापूर्वी देखभालीच्या कामामुळे रद्द करण्यात आली होती, ज्यासाठी अतिरिक्त वेळेची आवश्यकता होती.

DGCA च्या तपासात धोके उघडसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने केलेल्या ऑडिट रिपोर्टमध्ये गेल्या आठवड्यात एअर इंडियाच्या प्रशिक्षण, क्रू विश्रांती आणि कर्तव्य कालावधीचे नियम, हवाई क्षेत्र पात्रता इत्यादींशी संबंधित सुमारे १०० उल्लंघने आणि निरीक्षणे आढळून आली. यापैकी सात उल्लंघने लेव्हल-१ उल्लंघने अर्थात अधिक धोकादायक नियमांचे उल्लंघन असल्याचे समोर आले आहे.

विमान कंपन्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्हगेल्या महिन्यात झालेल्या एका ऑनलाइन पॅन-इंडिया सर्वेक्षणात असे आढळून आले की, जवळजवळ ७६ टक्के प्रतिसादकर्त्यांचे मत होते की भारतातील अनेक विमान कंपन्या सुरक्षेपेक्षा प्रमोशनवर जास्त खर्च करत आहेत. लोकलसर्कलने केलेल्या या ऑनलाइन सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे की, ६४ टक्के प्रतिसादकर्त्यांनी गेल्या तीन वर्षांत किमान एकदा तरी अशा उड्डाणाचा अनुभव घेतला आहे, ज्यामध्ये टेकऑफ, लँडिंग किंवा उड्डाणादरम्यान विमानांमध्ये बिघाड झाला होता. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाdelhiदिल्ली