शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली सरकारच्या नव्या कॅबिनेटचं चित्र स्पष्ट, आतिशी यांच्यासह हे ५ मंत्री घेणार शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 14:06 IST

Delhi Government News: आम आदमी पक्षामधील वरिष्ठ नेत्या आतिशी (Atishi) यांची पक्षाकडून दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आता नव्या सरकारमध्ये किती आणि कोण मंत्री असलीत याचंही चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. 

अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, आम आदमी पक्षामधील वरिष्ठ नेत्या आतिशी यांची पक्षाकडून दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आता नव्या सरकारमध्ये किती आणि कोण मंत्री असलीत याचंही चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आतिशी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळामध्ये एकूण पाच मंत्री असणार आहेत. त्यामध्ये गोपाल राय, कैलाश गहलोत, सौरभ भारद्वाज, इम्रान हुसेन आणि मुकेश अहलावत यांचा समावेश आहे. 

दरम्यान, दिल्लीच्या नायब राज्यपालांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा आणि आतिशी यांच्याकडून नव्या सरकारची स्थापना करण्यासाठी केलेल्या दाव्याचं पत्र राष्ट्रपतींकडे पाठवले आहे. केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर आतिशी यांची आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी नायब राज्यपाल व्ही. के सक्सेना यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठीचा दावा सादर केला होता. दरम्यान, नायब राज्यपालांनी नव्या सरकारच्या शपथविधीसाठी २१ सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आहे.  

टॅग्स :AAPआपdelhiदिल्ली