शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Gyanvapi Case: ‘ज्ञानवापी परिसरातील ती वस्तू शिवलिंग नाही तर कारंजे, पण…’ काशीच्या महंतांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 19:39 IST

Gyanvapi Case: सध्या वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीवरून सुरू असलेला वाद देशभरात चर्चिला जात आहे. काशी विश्वनाथ मंदिराच्या मागे असलेल्या काशी करवत मंदिराचे महंत पंडित गणेश शंकर उपाध्याय यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.

वाराणसी - सध्या वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीवरून सुरू असलेला वाद देशभरात चर्चिला जात आहे. दरम्यान, मशिदीमध्ये झालेल्या सर्व्हेनंतर एका पक्षाने मंदिर परिसरात शिवलिंग असल्याचा दावा केला आहे. तर दुसऱ्या पक्षाने ते पाण्याचे कारंजे असल्याचे म्हटले आहे. आता याबाबत केलेल्या सर्व्हेचा रिपोर्ट कोर्टात सादर करण्यात आला असून, सर्वजण कोर्टाच्या नितालाची वाट पाहत आहे. दरम्यान, काशी विश्वनाथ मंदिराच्या मागे असलेल्या काशी करवत मंदिराचे महंत पंडित गणेश शंकर उपाध्याय यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.

पंडित गणेश शंकर उपाध्याय यांनी सांगितले की, ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग नाही आहे, तर ते पाण्याचे कारंजे आहे. गेल्या ५० वर्षांपासून आम्ही ते पाहत आहोत. मात्र हे कारंजे सुरू असल्याचे आम्ही कधी पाहिले नाही. एका पक्षाचे लोक ते शिवलिंग असल्याचे सांगत आहेत. पाहण्यामध्ये ती वस्तू शिवलिंगासारखी दिसते. पण आमच्या माहितीनुसार ते कारंजे आहे. आम्ही लहानपणापासून ते पाहतोय.

आम्ही शेकडो वेळा त्या आकृतीजवळ गेलोय. अनेक तास राहिलोय. ज्ञानवापी परिसरातील मौलवी आणि सेवादारांशीही आमचं बोलणं व्हायचं. तेथील बांधकाम आधीपासून आहे. आम्ही त्यांना विचारायचो की मध्ये काय आहे, तर ते सांगायचे की ते कारंजे आहे. तसेच ते मुघलकालीन कारंजे आहे. मात्र आम्ही ते चालू असलेले कधी पाहिले नाही, असेही त्यांनी नमूद केले.

मीडियामध्ये जो व्हिडिओ आलाय त्यात काही सफाई कर्मचारी साफसफाई करताना दिसत आहेत. त्यात वरून फोटो घेण्यात आल्याने ती वस्तू शिवलिंगासारखी दिसत आहे. दरम्यान, तेथील नंदी मशिदीकडे का बघत आहे असं विचारलं असता गणेश शंकर उपाध्याय यांनी सांगितसे की, तिथे मंदिर होते, ही बाब कटू सत्य आहे. मुघलांनी ते मंदिर तोडले आणि तिथे मशीद बांधली. मात्र मागच्या बाजूला मंदिराचा काही भाग उरलेला आहे. 

टॅग्स :Gyanvapi Mosqueज्ञानवापी मशीदVaranasiवाराणसीPoliticsराजकारण