शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

गुडन्यूज! भोपाळमध्ये पाळणा हलला; सायाया मादीने दिला बछड्यांना जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 11:39 IST

साशाच्या जाण्याचे दु:ख असतानाचा आता कुनोमधून गुडन्यूज आली आहे.

भोपाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात चित्ता संगोपन आणि संरक्षणाची मोहिम हाती घेतली होती. त्यानुसार, गतवर्षी त्यांच्या जन्मदिनी आफ्रिकेतील नामिबिया येथून नर आणि मादी अशा ८ चित्त्यांचे भारतात आगमन झाले होते. मोठ्या जल्लोषात या वन्य जीवांचे भारतात स्वागत करण्यात आले, त्यानंतर, मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये त्यांना सोडण्यात आले. मात्र, या ८ पैकी एक असलेल्या साशा नामक मादी चित्त्याचे २७ मार्च रोजी निधन झाले. साशाच्या जाण्याचे दु:ख असतानाचा आता कुनोमधून गुडन्यूज आली आहे. कारण, येथील एका माती चित्त्याने ४ बछड्यांना जन्म दिलाय. 

नामिबियातून भारतात आणलेल्या एका मादी चित्ता सियायाने चार पिल्लांना जन्म दिल्यामुळे देशात त्यांचा कुटुंब-कबिला वाढू लागला आहे. सोमवारीच 'साशा' या मादी चित्त्याने जगाचा निरोप घेतल्यानंतर निराशेचे मळभ चार पिल्लांच्या जन्मामुळे हटले. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे द्विट शेअर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ही आनंददायक बातमी दिली आहे. त्यामुळे, कुनोमधील चित्त्यांची संख्या आणखी वाढली असून आता या पिलांच्या संगोपनाकडे लक्ष द्यावे लागणार आहे.  नामिबियातून भारतात आणलेल्या ८ चित्त्यांपैकी साशा ही मादी चित्ता २२ मार्च रोजी एकदम सुस्त पडल्याचे आढळून आले. वन विभागातील मॉनिटरींग टीमने तात्काळ क्वारंटाईन करुन तिची तपासणी केली. त्यावेळी, साशाच्या किडनीत संक्रमण असल्याचे समजले. त्यानंतर, तिच्यावर उपचारही सुरू झाले. मात्र, भारतात आणण्यापूर्वीच साशाला किडनीचा विकार होता, हे तपासात समोर आले. उपचारादरम्यान साशाचा सोमवारी कुनो येथील नॅशनल पार्कमध्येच मृत्यू झाला. दरम्यान, गतवर्षी आणखी १२ चित्त्यांचा ग्रुप भारतात आणण्यात आला, त्यामध्ये, ७ नर आणि ५ मादा चित्ता आहेत. त्यांनाही कुनो येथील राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात ठेवण्यात आलंय. आता, यात आणखी ४ बछड्यांची भर पडलीय. 

सोलर कुंपणातून होतेय चित्त्यांची निगराणी

गवताळ प्रदेशात राहणारा चित्ता हा बिबट्यासारखा दिसत असला तरी तो बिबट्या पेक्षा चपळ आणि हटके आहे. १९५२ मध्ये शेवटचा चित्ता राजस्थानातून  नष्ट झाल्याचे केंद्र शासनाने घोषीत केले होते. त्यानंतर भारतात चित्ता आणण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. सर्वोच्च न्यायालयाने सन २०२० मध्ये अफ्रिकन चित्ता भारतात आणण्याची परवानगी दिली. दोन वर्षानंतर आफ्रिकन चित्ता मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पामध्ये आणून सोडण्यात आले आहेत. हा प्रकल्प समृद्ध गवताळ प्रदेश असून त्या भागात आफ्रिकन चित्ता वास्तव्य करत आहे. तेथे सोलर कुंपण करुन त्या चित्त्यावर निगराणी ठेवली जात आहे. 

टॅग्स :bhopal-pcभोपाळTigerवाघNarendra Modiनरेंद्र मोदी